शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

लोहा, कंधार, नायगाव तालुक्यांत पुन्हा ‘गारपीट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:58 IST

सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील हिमायतनगर, लोहा, कंधार, मुखेड, हदगाव, धर्माबाद, नायगाव, उमरी तालुक्यात ‘गारपिटी’ने थैमान घातले. वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीने गहू, हरभरा आदी प्रमुख पिके आडवी पडली. शेतक-यांवर एकापाठोपाठ एक संकटाची मालिकाच सुरुच आहे.

ठळक मुद्देकिनवट तालुक्यात ३ हजार तर धर्माबादेत १२०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील हिमायतनगर, लोहा, कंधार, मुखेड, हदगाव, धर्माबाद, नायगाव, उमरी तालुक्यात ‘गारपिटी’ने थैमान घातले. वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीने गहू, हरभरा आदी प्रमुख पिके आडवी पडली. शेतक-यांवर एकापाठोपाठ एक संकटाची मालिकाच सुरुच आहे.लालवंडी (ता.नायगाव) येथे झाडावरील ५० बगळे गारपिटीच्या तडाख्यात सापडून दगावले. उर्वरित ५० जखमी झाले. तालुक्यातील तलबीड, कोलंबी, मांजरम, पळसगाव, टाकळगाव, गोदमगाव, अंचोली, लालवंडी, देगाव, कुंटूर, नरगंल आदी गावांतील शेतीचे मोठे नुकसान झाले. देगाव येथे आ. वसंतराव चव्हाण, ना. तहसीलदार नंदकिशोर भोसीकर, मंडळाधिकारी कळकेकर, तलाठी बालाजी राठोड यांनी भेट दिली.

वहाबोद्दीन शेख।लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव बाजार: तालुक्यात लालवंडी, ताकबीड, तलबीड, कुंटूर , पळसगाव, देगाव, नायगाव आदी भागात गारपीट झाली़ तालुक्यात एकूण १६़६ मि़मी़ पाऊस झाला. सर्कलनिहाय पाऊस याप्रमाणे- नायगाव २८ मि़मी़, कुंटूर २० मि़मी़, बरबडा २५ मि़मी़, मांजरम ७ मि़मी़, नरसी ३ मि़मी़ असे एकूण १६़६ मि़मी़ सरासरी पाऊस झाला़सुनील चौरे।लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव: तालुक्यात २५ ते ३० गावे बाधित झाली. मंगळवारी आ़ नागेश पाटील, तहसीलदार संदीप कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर, विवेक देशमुख आदींनी तळणी, निवळा, कोळी, उंचेगाव, शिबदरा, मनाठा, केदारगुडा, उमरी (दर्या़), ल्याहरी, डोरली, तळेगावला भेट देवून पाहणी केली. तामसा मंडळातील कोंडूर, चिकाळा, नाव्हा, ठाकरवाडी, तळणी, उंचेगाव, मरडगा, कोळी, मारतळा, वरुला, आमगव्हाण, वाकी, मनाठा, सावरगाव, वरवट, गायतोंड, जगापुरात पिकांचे मोठे नुकसान झाले.१२०० हेक्टर पिकांचे नुकसानलक्ष्मण तुरेराव।लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद: तालुक्यात सोमवारी रात्री वादळीवारे, पाऊस, गारपिटीने झोडपल्याने हरभरा, ज्वारी, भाजीपाल्याचे झाले असून हजार ते बाराशे हेक्टर पिकांचे नुकसान झाले. पाटोदा(खु), पाटोदा (थडी), चोंडी, रोशनगाव, शेळगाव, माष्टी, बाभळी(ध), मोकली, रत्नाळी, बाळापूर, रामेश्वर, रामपूर, सिरसखोड, आतकूर, मंगनाळी, बेल्लूर (खु) आदी गावांना वादळी वारा, पाऊस आणि गारांचा तडाखा बसल्याने पाचशे ते सहाशे हेक्टर ज्वारी, तीनशे ते चारशे हेक्टर गारपिटीने हरभ-याचे गाठी फुटून चुराडा झाला. भाजीपाला व टरबूज आंब्याचा मोहोर, गव्हाचेही नुकसान झाले. कारेगाव, आटाळा, करखेली, बाचेगाव, पांगरी परिसरात गारपीट झाली नाही.तोंडाला आलेला घास हिरावून घेतल्याचे शेतकरी देवराव पाटील नरवाडे, मारोती पाटील जाधव यांनी तर अवकाळी पावसाने शेतकºयांवर संकट ओढवल्याचे जी.पी. मिसाळे, शिवाजी पाटील, माधव पाटील चोंडीकर, शंकर पाटील, विनोद पाटील, शंकर पाटील, संजय पा. शेळगावकर, पिराजी पाटील, साईनाथ पाटील, दिगंबर पाटील, बंडू पाटील आदींनी सांगितले. नायब तहसीलदार सय्यद उमर, तलाठी नारायण गाजेवार व कर्मचारी नुकसानीची प्राथमिक पाहणी करीत आहेत. उद्यापासून पंचनामे करणार असल्याचे तहसीलदार ज्योती चव्हाण यांनी सांगितले.प्रदीपकुमार कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कमंगळवारी दुपारी अनेक गावे व परिसरात गारपीट होवून रबीसह फळबागांचे नुकसान झाले़ आडगाव, पांगरी, बोरगाव, पेनूरसह इतर गावांना गारपिटीचा फटका बसला. गहू, ज्वारी आडवी पडली तर हरभ-याचेही नुकसान झाले़ वादळी वाºयाने आंब्याचे मोठे नुकसान झाले. गारपिटीमुळे टोमाटो, वांगी, मिरचीसह फळे, भाजेपाल्याचेही मोठे नुकसान झाले़ तसेच अनेक झाडे उन्मळून पडली़ पत्रे उडाले. बहुतांश गावांतील वीज गुल झाली़रात्री ८.३० च्या दरम्यान पेनूर, अंतेश्वर, भारसवाडा परिसरात गारपीट झाली. मागील तीन दिवसात तालुक्यात वीज पडल्याने तीन जनावरे दगावली.

तीन हजार हेक्टर क्षेत्र झाले बाधितगोकुळ भवरे।लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यात सुमारे ९५ गावांतील ८ कोटी ५ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान झाले. सारखणी, दहेली, बोथ, पळशी, कनकी, मिनकी, टेंभीरायपूर, लिंगी, बोधडी, भुलजा, शनिवारपेठ, कमठाला, आंदबोरी, येंदापेंदा, दहेगाव, खैरगुडा, मलकवाडी, चिखली बु, उनकेश्वर आदी गावांना फटका बसला. यात ८ जनावरे दगावली. गव्हाचे १ हजार ५१, ज्वारी ५६८ हेक्टर, मका २११ हेक्टर, हरभरा १ हजार ५६१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. सहा. जिल्हाधिकारी अजित कुंभार,तहसीलदार नरेंद्र देशमुख, कृषी अधिकारी कायेंदे यांनी विविध गावांना भेटी दिल्या.कंधार तालुक्यास गारपीट, पावसाचा फटकागंगाधर तोगरे।लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : कंधार तालुक्याला सलग दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले आहे. यात रबी हंगामातील सर्वच पिकांना याचा फटका बसला.यावर्षी हरभरा सर्वाधिक ११७५ हेक्टरवर पेरण्यात आला. गहू ४१५ हेक्टर, चारापाणी २२१ हे., करडई ५० हेक्टर आदी २४६६ हेक्टरवर रबी लागवड करण्यात आली, मात्र वादळी पाऊस व गारपिटीने खरीप हंगामाची कसर निघत नसली तरी थोडासा आर्थिक हातभार लागतो. तालुक्यातील काटकळंबा, बारुळ, गऊळ, पानशेवडी, कुरुळा, हाडोळी (ब्र.), हिप्परगा, उम्रज, बोळका, हटक्याळ, कंधार, बहाद्दरपुरा, नेहरुनगर, वहाद, महालिंगी, बाभूळगाव, गंगनबीड आदींसह विविध गावांतील पिकांना याचा फटका बसला. काटकळंबा येथे रघुनाथ चोंडे यांची दीड एकर टोमॅटोची बाग आडवी झाली. शिवाजी चोंडे यांचे एक एकरवरील भेंडी-दोडकाही आडवे झाले.बारुळ मंडळातंर्गत उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, जि.प.सदस्य प्रवीण पाटील, मंडळाधिकारी मेथे, तलाठी मारोती कदम, सरोदे यांनी तर गऊळ, पानशेवडीतील पिकांची पाहणी अरुणा संगेवार यांनी केली. यावेळी माणिक पानपट्टे, तुकाराम बसवदे, शिवाजी चोंडे, गुडाराम तेलंग, साईनाथ कोळगिरे, मोहन पवार, गोविंद वाकोरे, हणमंतराव पानपट्टे, नवाद सय्यद आदींनी नुकसानीची व्यथा मांडली.बिलोली तालुक्यात नऊ गावांना फटकाराजेश गंगमवार।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : सोमवारी रात्री सव्वाआठच्या दरम्यान झालेल्या अर्धा तासाच्या वादळीवारे व गारपीटचा फटका नऊ गावांना बसल्याचे प्रशासनाच्या पाहणीत पुढे आले.महाशिवरात्रीची सार्वजनिक सुटी असतानाही बिलोली महसूल प्रशासनाने मंगळवारी दिवसभर विविध गावांची पाहणी केली़ रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा पाठोपाठ तंबाखू तसेच भाजीपाला पिकाचे नुकसान झाले़तालुक्यात सोमवारी रात्री गुजरी, कोळगाव, कांगठी, खपराळा, तोरणा, हरनाळा, कुंभारगाव, कांगठी, डौर अशा ९ गावांत गारपिटीचा तडाखा बसला़ जवळपास २५ ते ३० मिनिटे असे भयावह वातावरण होते, असे त्या गावातील शेतकºयांनी सांगितले़मंगळवारी बिलोलीचे उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड, तहसीलदार विनोद गुंडमवार, नायब तहसीलदार संजय नागमवाड यांनी मंडळ अधिकारी व गावच्या तलाठींना घेऊन नुकसानीचा आढावा घेतला़नुकसानग्रस्त शेतकºयांना धीर दिला़ यावेळी विक्रम साबणे, विश्वनाथ समन, बाबाराव रोकडे, शंभर मावलगे, व्यंकट गुजरवाड आदी उपस्थित होते़