शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोहा, कंधार, नायगाव तालुक्यांत पुन्हा ‘गारपीट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:58 IST

सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील हिमायतनगर, लोहा, कंधार, मुखेड, हदगाव, धर्माबाद, नायगाव, उमरी तालुक्यात ‘गारपिटी’ने थैमान घातले. वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीने गहू, हरभरा आदी प्रमुख पिके आडवी पडली. शेतक-यांवर एकापाठोपाठ एक संकटाची मालिकाच सुरुच आहे.

ठळक मुद्देकिनवट तालुक्यात ३ हजार तर धर्माबादेत १२०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील हिमायतनगर, लोहा, कंधार, मुखेड, हदगाव, धर्माबाद, नायगाव, उमरी तालुक्यात ‘गारपिटी’ने थैमान घातले. वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीने गहू, हरभरा आदी प्रमुख पिके आडवी पडली. शेतक-यांवर एकापाठोपाठ एक संकटाची मालिकाच सुरुच आहे.लालवंडी (ता.नायगाव) येथे झाडावरील ५० बगळे गारपिटीच्या तडाख्यात सापडून दगावले. उर्वरित ५० जखमी झाले. तालुक्यातील तलबीड, कोलंबी, मांजरम, पळसगाव, टाकळगाव, गोदमगाव, अंचोली, लालवंडी, देगाव, कुंटूर, नरगंल आदी गावांतील शेतीचे मोठे नुकसान झाले. देगाव येथे आ. वसंतराव चव्हाण, ना. तहसीलदार नंदकिशोर भोसीकर, मंडळाधिकारी कळकेकर, तलाठी बालाजी राठोड यांनी भेट दिली.

वहाबोद्दीन शेख।लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव बाजार: तालुक्यात लालवंडी, ताकबीड, तलबीड, कुंटूर , पळसगाव, देगाव, नायगाव आदी भागात गारपीट झाली़ तालुक्यात एकूण १६़६ मि़मी़ पाऊस झाला. सर्कलनिहाय पाऊस याप्रमाणे- नायगाव २८ मि़मी़, कुंटूर २० मि़मी़, बरबडा २५ मि़मी़, मांजरम ७ मि़मी़, नरसी ३ मि़मी़ असे एकूण १६़६ मि़मी़ सरासरी पाऊस झाला़सुनील चौरे।लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव: तालुक्यात २५ ते ३० गावे बाधित झाली. मंगळवारी आ़ नागेश पाटील, तहसीलदार संदीप कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर, विवेक देशमुख आदींनी तळणी, निवळा, कोळी, उंचेगाव, शिबदरा, मनाठा, केदारगुडा, उमरी (दर्या़), ल्याहरी, डोरली, तळेगावला भेट देवून पाहणी केली. तामसा मंडळातील कोंडूर, चिकाळा, नाव्हा, ठाकरवाडी, तळणी, उंचेगाव, मरडगा, कोळी, मारतळा, वरुला, आमगव्हाण, वाकी, मनाठा, सावरगाव, वरवट, गायतोंड, जगापुरात पिकांचे मोठे नुकसान झाले.१२०० हेक्टर पिकांचे नुकसानलक्ष्मण तुरेराव।लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद: तालुक्यात सोमवारी रात्री वादळीवारे, पाऊस, गारपिटीने झोडपल्याने हरभरा, ज्वारी, भाजीपाल्याचे झाले असून हजार ते बाराशे हेक्टर पिकांचे नुकसान झाले. पाटोदा(खु), पाटोदा (थडी), चोंडी, रोशनगाव, शेळगाव, माष्टी, बाभळी(ध), मोकली, रत्नाळी, बाळापूर, रामेश्वर, रामपूर, सिरसखोड, आतकूर, मंगनाळी, बेल्लूर (खु) आदी गावांना वादळी वारा, पाऊस आणि गारांचा तडाखा बसल्याने पाचशे ते सहाशे हेक्टर ज्वारी, तीनशे ते चारशे हेक्टर गारपिटीने हरभ-याचे गाठी फुटून चुराडा झाला. भाजीपाला व टरबूज आंब्याचा मोहोर, गव्हाचेही नुकसान झाले. कारेगाव, आटाळा, करखेली, बाचेगाव, पांगरी परिसरात गारपीट झाली नाही.तोंडाला आलेला घास हिरावून घेतल्याचे शेतकरी देवराव पाटील नरवाडे, मारोती पाटील जाधव यांनी तर अवकाळी पावसाने शेतकºयांवर संकट ओढवल्याचे जी.पी. मिसाळे, शिवाजी पाटील, माधव पाटील चोंडीकर, शंकर पाटील, विनोद पाटील, शंकर पाटील, संजय पा. शेळगावकर, पिराजी पाटील, साईनाथ पाटील, दिगंबर पाटील, बंडू पाटील आदींनी सांगितले. नायब तहसीलदार सय्यद उमर, तलाठी नारायण गाजेवार व कर्मचारी नुकसानीची प्राथमिक पाहणी करीत आहेत. उद्यापासून पंचनामे करणार असल्याचे तहसीलदार ज्योती चव्हाण यांनी सांगितले.प्रदीपकुमार कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कमंगळवारी दुपारी अनेक गावे व परिसरात गारपीट होवून रबीसह फळबागांचे नुकसान झाले़ आडगाव, पांगरी, बोरगाव, पेनूरसह इतर गावांना गारपिटीचा फटका बसला. गहू, ज्वारी आडवी पडली तर हरभ-याचेही नुकसान झाले़ वादळी वाºयाने आंब्याचे मोठे नुकसान झाले. गारपिटीमुळे टोमाटो, वांगी, मिरचीसह फळे, भाजेपाल्याचेही मोठे नुकसान झाले़ तसेच अनेक झाडे उन्मळून पडली़ पत्रे उडाले. बहुतांश गावांतील वीज गुल झाली़रात्री ८.३० च्या दरम्यान पेनूर, अंतेश्वर, भारसवाडा परिसरात गारपीट झाली. मागील तीन दिवसात तालुक्यात वीज पडल्याने तीन जनावरे दगावली.

तीन हजार हेक्टर क्षेत्र झाले बाधितगोकुळ भवरे।लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यात सुमारे ९५ गावांतील ८ कोटी ५ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान झाले. सारखणी, दहेली, बोथ, पळशी, कनकी, मिनकी, टेंभीरायपूर, लिंगी, बोधडी, भुलजा, शनिवारपेठ, कमठाला, आंदबोरी, येंदापेंदा, दहेगाव, खैरगुडा, मलकवाडी, चिखली बु, उनकेश्वर आदी गावांना फटका बसला. यात ८ जनावरे दगावली. गव्हाचे १ हजार ५१, ज्वारी ५६८ हेक्टर, मका २११ हेक्टर, हरभरा १ हजार ५६१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. सहा. जिल्हाधिकारी अजित कुंभार,तहसीलदार नरेंद्र देशमुख, कृषी अधिकारी कायेंदे यांनी विविध गावांना भेटी दिल्या.कंधार तालुक्यास गारपीट, पावसाचा फटकागंगाधर तोगरे।लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : कंधार तालुक्याला सलग दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले आहे. यात रबी हंगामातील सर्वच पिकांना याचा फटका बसला.यावर्षी हरभरा सर्वाधिक ११७५ हेक्टरवर पेरण्यात आला. गहू ४१५ हेक्टर, चारापाणी २२१ हे., करडई ५० हेक्टर आदी २४६६ हेक्टरवर रबी लागवड करण्यात आली, मात्र वादळी पाऊस व गारपिटीने खरीप हंगामाची कसर निघत नसली तरी थोडासा आर्थिक हातभार लागतो. तालुक्यातील काटकळंबा, बारुळ, गऊळ, पानशेवडी, कुरुळा, हाडोळी (ब्र.), हिप्परगा, उम्रज, बोळका, हटक्याळ, कंधार, बहाद्दरपुरा, नेहरुनगर, वहाद, महालिंगी, बाभूळगाव, गंगनबीड आदींसह विविध गावांतील पिकांना याचा फटका बसला. काटकळंबा येथे रघुनाथ चोंडे यांची दीड एकर टोमॅटोची बाग आडवी झाली. शिवाजी चोंडे यांचे एक एकरवरील भेंडी-दोडकाही आडवे झाले.बारुळ मंडळातंर्गत उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, जि.प.सदस्य प्रवीण पाटील, मंडळाधिकारी मेथे, तलाठी मारोती कदम, सरोदे यांनी तर गऊळ, पानशेवडीतील पिकांची पाहणी अरुणा संगेवार यांनी केली. यावेळी माणिक पानपट्टे, तुकाराम बसवदे, शिवाजी चोंडे, गुडाराम तेलंग, साईनाथ कोळगिरे, मोहन पवार, गोविंद वाकोरे, हणमंतराव पानपट्टे, नवाद सय्यद आदींनी नुकसानीची व्यथा मांडली.बिलोली तालुक्यात नऊ गावांना फटकाराजेश गंगमवार।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : सोमवारी रात्री सव्वाआठच्या दरम्यान झालेल्या अर्धा तासाच्या वादळीवारे व गारपीटचा फटका नऊ गावांना बसल्याचे प्रशासनाच्या पाहणीत पुढे आले.महाशिवरात्रीची सार्वजनिक सुटी असतानाही बिलोली महसूल प्रशासनाने मंगळवारी दिवसभर विविध गावांची पाहणी केली़ रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा पाठोपाठ तंबाखू तसेच भाजीपाला पिकाचे नुकसान झाले़तालुक्यात सोमवारी रात्री गुजरी, कोळगाव, कांगठी, खपराळा, तोरणा, हरनाळा, कुंभारगाव, कांगठी, डौर अशा ९ गावांत गारपिटीचा तडाखा बसला़ जवळपास २५ ते ३० मिनिटे असे भयावह वातावरण होते, असे त्या गावातील शेतकºयांनी सांगितले़मंगळवारी बिलोलीचे उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड, तहसीलदार विनोद गुंडमवार, नायब तहसीलदार संजय नागमवाड यांनी मंडळ अधिकारी व गावच्या तलाठींना घेऊन नुकसानीचा आढावा घेतला़नुकसानग्रस्त शेतकºयांना धीर दिला़ यावेळी विक्रम साबणे, विश्वनाथ समन, बाबाराव रोकडे, शंभर मावलगे, व्यंकट गुजरवाड आदी उपस्थित होते़