शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

हदगाव, मुदखेड, नायगाव, उमरीत पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:11 IST

नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी सर्वदूर पाऊस झाला काही ठिकाणी पावसाचा जोर होता, काही ठिकाणी नव्हता. पावसासह वादळी वाºयाने मुदखेड ...

ठळक मुद्देनांदेड जिल्ह्यात पाऊस वादळी वाऱ्याने केळीची बाग आडवीचारा, वैरण, गोठ्यावरील पत्रे, ताडपत्रीही उडाली

नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी सर्वदूर पाऊस झाला काही ठिकाणी पावसाचा जोर होता, काही ठिकाणी नव्हता. पावसासह वादळी वाºयाने मुदखेड तालुक्यात केळीची बाग आडवी झाली. हदगाव तालुक्यात चारा, वैरण, गोठ्यावरील पत्रे, ताडपत्रे उडाल्याने शेतकऱ्यांची दैना झाली.मनाठा, तामसा मंडळातवादळी वारा, पाऊसहदगाव: तालुक्यात शुक्रवारी अचानक सायंकाळी वादळी वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावली़ अर्धा तास धुंवाधार पाऊस झाला़ सखल भागात पाणी साचले़ तर शेतामध्ये चरीभरून पाणी वाहिले़ यामुळे शेतकरी सुखावला़ पण चारा, वैरण, गोठे यावरील पत्रे, ताडपत्रे उडाल्याने त्याची दैना झाली़ गतवर्षी ३ ते १० जूनपर्यंत संपूर्ण तालुक्यात पेरणी झाली होती़ गतवर्षी आॅगस्ट, सप्टेंबरपासून पावसाने डोळे वटारले होते़ त्यामुळे रबी पिकासह पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर झाला होता़ यावर्षी तापमान प्रचंड वाढल्यामुळे पावसाळा मोठा व वेळेवर होईल असा अंदाज शेतकºयासह हवामान खात्यानेही पूर्वी वर्तविला होता़ परंतु चक्री वादळामुळे मान्सून येण्यास विलंब झाला़मुदखेड तालुक्यातही हजेरीमुदखेड : शुक्रवारी सायंकाळी मुदखेड तालुक्यातही पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पेरणीसाठी जोरदार पावसाची गरज आहे.बारुळ, कौठा परिसरातमध्यम स्वरुपाचा पाऊसबारुळ/कौठा : कंधार तालुक्यातील बारुळ, कौठा परिसरात मध्यमस्वौपाचा पाऊस झाला. कौठ्यात वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयाने नेहमीप्रमाणे वीज खंडित झाली. पावसामुळे वातावरणात बदल झाला़नरसी, कुंटूरमध्ये पाऊसनरसीफाटा/ कुंटूर : नरसी येथे जवळपास १ तास पाऊस झाला. पावसाने शेतकºयांच्या चेहºयावर हास्य फुलवले, काही जणांच्या मते अजून जोरदार पावसाची गरज आहे. कुंटूर येथेही पावसाने हजेरी लावली.उमरी तालुक्यातही हजेरीउमरी : तालुक्यात सायंकाळी ५.३० च्या दरम्यान पावसाने सर्वदूर हजेरी लावली. पावसामुळे रस्ते काही प्रमाणात का होईना भीजले होते.पावसाने शेतकºयांना मिळाला दिलासापार्डी : अर्धापूर शहर, परिसरात शुक्रवारी सायंकाळी मोसणीपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला असून तापमाणात मोठी घट झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने वातावरण थंड झाले़ शेतकºयांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे़एक दोन दिवसात मोठा पाऊस झाला तर खरिपाच्या पेरणीला सुरुवात होईल, असे शेतकºयांत चर्चा होऊ लागली. पेरणीसाठी लागणाºया साहित्याची जुळवाजुळव करून ठेवली.बी-बियाणे खाते खरेदी करून ठेवली. मोठ्या पावसामुळे जमिनीतील उष्णता कमी होऊन जमिनीत ओलावा तयार झाल्यास खरीप पेरणीसाठी पोषक वातावरण राहील या करिता शेतकºयांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे़पेरणी योग्य पाऊस होताच शेतकरी खरीप पेरणीला सुरुवात होईल खरीप पेरणीसाठी शेतकरी हातात तिफन घेऊन सज्ज आहे़वादळी वाºयाने केळीबागेला फटकाबारड : शिवारातील शेतकरी दीपक देशमुख यांच्या गठ नंबर ५१७मध्ये केळीबाग होती. जोराच्या वाºयाने केळीबागेचे नुकसान झाले. शेतकरी केळीबाग जोपासना करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतो उत्पन्न निघण्या साठी या केळी बागावरती मशागत, लागवड, खते, फवारण्या यासाठी लाखो रुपयाचा खर्च करून केळी बाग जोपासतो़ मात्र निसर्गासमोर कुणाचेही चालत नाही, असे म्हणण्याची वेळ संबंधितांवर आली.

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसFarmerशेतकरी