शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीचा निकाल १० जूनपूर्वी लावण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 14:28 IST

सर्व जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्तांना शासनाचे ४ मे रोजी आदेश 

ठळक मुद्देउत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना संचारबंदी शिथिल

- सुनील जोशी 

नांदेड : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) तथा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १० जूनपूर्वी लावण्याच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत. परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अन्य कर्मचाऱ्यांना संचारबंदी शिथिल करण्यात यावी, असे आदेश सर्व जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्तांना शासनाने ४ मे रोजी दिले आहेत. 

यंदा बारावीची परीक्षा १८ मार्च रोजी संपली. दहावीचीपरीक्षा २३ मार्चला संपणार होती. परंतु २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. पुढे त्यात आणखी वाढ झाल्याने बोर्डाने दहावीचा शेवटचा भूगोलचा पेपरही रद्द केला. सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला. या दरम्यान कोरोना पॉझिटिव्हची वाढती संख्या लक्षात घेता १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला.  लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल कधी लागतो? याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण, उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत होती. जवळपास ८० टक्के बारावीच्या उत्तरपत्रिका तर दहावीच्या ७० टक्के  उत्तरपत्रिका बोर्डात पोहोचल्या होत्या. उर्वरित उत्तरपत्रिका परीक्षकाकडेच पडल्या आहेत. परीक्षक तपासून मॉडरेटरकडे सादर करतो. लॉकडाऊनमुळे त्या मॉडरेटरकडे पोहोचल्याच नाहीत. पुढे बोर्डातही गेल्या नाहीत. त्यामुळे निकाल रखडतो की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती.

नियमानुसार दहावी व बारावीचा परीक्षेचा निकाल १० जूनपूर्वी घोषित करणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी ४ मे रोजी सर्व जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांच्या नावे आदेश काढून उपरोक्तप्रमाणे सूचना दिल्या                    आहेत. यासाठी काही अटी व शर्थी लागू करुन सूट देण्यात यावी किंवा प्रवासाकरिता परवानगी/पास देण्यात यावा, असे नमूद केले आहे. 

कामाचे स्वरूप : १) उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रावरुन किंवा माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांकडे पाठविणे. २) शिक्षक अथवा शिपायामार्फत उत्तरपत्रिका शाळेतून परीक्षकांच्या घरी घेऊन जाणे. ३) परीक्षकाकडून मॉडरेटरकडे उत्तरपत्रिका पोहोचविणे. ४) मॉडरेटरकडील उत्तरपत्रिका संबंधित विभागीय मंडळाकडे जमा करणे. ५) परीक्षेतील गैरमार्गप्रकरणी चौकशी करण्यासाठी शिक्षण मंडळाच्या नियुक्त अधिकाऱ्यांनी प्रवास करणे

अटी व शर्तीप्रवास करताना संबंधितांनी त्या कामासाठी मंडळाने दिलेले लेखी आदेश व स्वत:चे ओळखपत्र जवळ बाळगणे व संबंधित अधिकाऱ्यांनी मागणी केल्यास त्यांना दाखविणे वर नमूद कामासाठी अधिनस्त असलेल्या नऊ मंडळातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांना प्रवास करता येईल. च्त्यासाठी खाजगी/ सार्वजनिक वाहन वापरता येईल. अथवा वाहतुकीसाठी मंडळाच्या मान्य ठेकेदाराकडील वाहने भाडेतत्त्वावर वापरता येईल. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराकडून मिळालेले ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. तसेच ठेकेदाराकडून अशा कर्मचाऱ्यांची स्वाक्षरीत यादी संबंधित कार्यालयाने प्रमाणित करुन घेणे बंधनकारक राहील. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा