शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

ध्येयवेड्या शिक्षकांमुळे वरवट जि़प़ शाळेला चांगले दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:43 IST

एकाच वर्षी नवोदय विद्यालयात या शाळेचे २५ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले. यावरुन शाळेची गुणवत्ता लक्षात यावी. जिल्हा परिषद शाळेचे रुपडे दिवसेंदिवस बदलत आहे. खाजगी शाळा, इंग्रजी शाळांचे वेड आता कमी होत चालले आहे. शाळेच्या नावावर अमाप पैसा पालकांकडून लुटणाऱ्या शाळांच्या निकालाची टक्केवारी घसरली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थीसंख्या वाढलीजिल्हास्तरीय स्काऊट मेळाव्यात विद्यार्थ्यांची कामगिरी

सुनील चौरे।हदगाव : एकाच वर्षी नवोदय विद्यालयात या शाळेचे २५ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले. यावरुन शाळेची गुणवत्ता लक्षात यावी. जिल्हा परिषद शाळेचे रुपडे दिवसेंदिवस बदलत आहे. खाजगी शाळा, इंग्रजी शाळांचे वेड आता कमी होत चालले आहे. शाळेच्या नावावर अमाप पैसा पालकांकडून लुटणाऱ्या शाळांच्या निकालाची टक्केवारी घसरली आहे. प्राथमिक शिक्षण बोलीभाषेतूनच द्यावे, असे शिक्षणतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ज्ञांचे मत असल्यामुळे पालकांचा कल बदलला आहे.जिल्हा परिषद शाळांना काही ध्येयवेड्या शिक्षकांमुळे चांगले दिवस आले आहेत. वेगवेगळे प्रयोग शाळेत करुन घटलेली विद्यार्थीसंख्या वाढविली. गुणवत्ता वाढविली. अशीच मनाठा केंद्रातील वरवट या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळा. आज प्रयोगशील शाळा म्हणून तालुक्यात नावारुपाला आली आहे.जानेवारीमध्ये जिल्हास्तरीय स्काऊट मेळावा हदगावमध्ये झाला. यामध्ये या शाळेच्या विद्यार्थ्याने चार पारितोषिक मिळविले. ज्ञानरचनाकार, सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक व सामाजिक उपक्रम शाळेत वर्षभर राबविले जातात. फेसबूकवर या वरवटची शाळा म्हणून अकाऊंट सुरु करण्यात आले आहे. येथे शाळेच्या उपक्रमाची माहिती व फोटो अपलोड केले जातात. तत्कालीन जिल्हाधिकारी परदेशी यांच्या प्रयत्नातून शिष्यवृत्तीचा पॅटर्न राबविण्यात आला़ त्यावेळी शाळेने त्यामध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला़ त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांना स्वत:च्या स्वाक्षरीनिशी अभिनंदनपत्रे पाठविली होती. यामुळे शिक्षकांचा हुरुपही वाढला होता.ध्यास शिष्यवृत्तीचा पॅटर्न राबविला२०१३-१४ मध्ये ध्यास शिष्यवृत्तीचा हा पॅटर्न राबविला होता. त्यासाठी जिल्ह्यातून उपक्रमशील शिक्षकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये वरवटच्या शाळेतील शिक्षक जयस्वाल यांची निवड झाली होती. जिल्ह्यातील टॉपच्या शिक्षकांनी तालुक्याच्या ठिकाणी जावून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले होते.शाळेचे मुख्याध्यापक म्हणून शाळेचे रुपडे बदलण्यासाठी शिक्षकांची मेहनत आहे़ त्याचप्रमाणे विद्यार्थी व पालकांचेही सहकार्य आहे़ त्यांना दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करतात़ मेहनत व जिद्दीमुळे आज आमची शाळा उपक्रमशील शाळा म्हणून नावारुपाला आली आहे़ - खंडू जोशी

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाEducationशिक्षण