शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

महामार्ग भूसंपादनाचा सरसकट मावेजा द्या : अशोकराव चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:57 IST

नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या बुटीबोरी ते तुळजापूर या ३६१ क्रमांकाच्या महामार्गासाठी सध्या भूसंपादनाचे काम सुरु आहे. हे भूसंपादन करताना ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील जमिनीस कमी मावेजा देण्यात येत आहे़ तसेच ग्रामीण भागातील शेतमालकांना शंभर टक्के मावेजा देण्याऐवजी वेगवेगळे टप्पे पाडण्यात आले आहेत. त्यामुळे भूसंपादनाच्या मावेजातील तफावत दूर करुन सरसकट मावेजा देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या बुटीबोरी ते तुळजापूर या ३६१ क्रमांकाच्या महामार्गासाठी सध्या भूसंपादनाचे काम सुरु आहे. हे भूसंपादन करताना ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील जमिनीस कमी मावेजा देण्यात येत आहे़ तसेच ग्रामीण भागातील शेतमालकांना शंभर टक्के मावेजा देण्याऐवजी वेगवेगळे टप्पे पाडण्यात आले आहेत. त्यामुळे भूसंपादनाच्या मावेजातील तफावत दूर करुन सरसकट मावेजा देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केली़या तिन्ही शहरांतील जमीन किंवा प्लॉटचे भाव ग्रामीण भागापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. परंतु मावेजा कमी मिळत आहे. जमीनमालकास सद्य:स्थितीतील बाजारभावाप्रमाणे जास्तीचा भाव मिळणे आवश्यक आहे. २०१६ च्या बाजारमूल्य तक्त्यातील त्रुटी दूर करुन अधार्पूर, हदगाव व लोहा शहरातील जमीन आणि प्लॉटमालकास रास्त मावेजा देण्यात यावा.शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील शेतक-यांची जमीन संपादित करताना मोबदला निश्चितीमध्ये मार्गदर्शक सूचना क्रमांक २९ (ब) चा अंमल केला जातो.यामुळे जमीनमालकास शंभर टक्के मोबदला न मिळता सुरुवातीच्या ५०० चौरस मीटर क्षेत्राकरिता शंभर टक्के, ५०१ ते १५०० पर्यंत ७० टक्के, १५०१ ते २५०० चौ.मी.पर्यंत ४० टक्के, २५०१ ते ४ हजार चौ.मी. पर्यंत ३० टक्के व त्यानंतर प्रतिेहेक्टरी दर निश्चित करण्यात आला आहे.त्यामुळे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील जमीनमालकावर सद्धा मोठा अन्याय होत आहे. मार्गदर्शक सूचना क्र. २९ (ब) व मार्गदर्शक सूचना क्र.१६ (ब) यामुळे भूसंपादन क्षेत्रास सरसकट मावेजा मिळत नाही.त्यामुळे यातील त्रुटी दूर करुन शहरी भागासाठी १ ऐवजी २ गुणक मंजूर करावा तसेच ग्रामीण भागातील सर्व संपादित केलेल्या जमिनीसाठी सरसकट शंभर टक्के मावेजा देण्याचे आदेश द्यावेत असे निवेदनात नमूद आहे़ग्रामीण भागापेक्षा कमी मोबदला- खा. चव्हाण४३६१ या राष्ट्रीय महामार्गावर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव व लोहा ही तीन शहरे येत आहेत. यासाठी लागणाºया जमिनीचे संपादन करताना बाजारमूल्य तक्त्यानुसार त्यांना १ गुणक देण्यात आला. २०१६ च्या बाजारमूल्य तक्त्यातील त्रुटीमुळे शहरी भागास १ गुणक तर ग्रामीण भागात २ गुणक मंजूर करण्यात येत असल्यामुळे या तिन्ही शहरांतील जमीनधारकांना ग्रामीण भागापेक्षा कमीच मोबदला मिळत आहे- अशोकराव चव्हाण, खासदार तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणhighwayमहामार्ग