शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिवाजीनगरात आगीत जळून फर्निचरचे दुकान खाक; व्यापाऱ्याचे लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 15:24 IST

१८ मे रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास या दुकानातून आगीचे लोट बाहेर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले.

नांदेड : शहरातील शिवाजीनगर भागातील एका फर्निचरच्या दुकानाला आग लागल्याची घटना १८ मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यात दुकानातील फर्निचर जळून खाक झाले. शिवाजीनगर भागात एमआयडीसीची औद्योगिक वसाहत असून, या ठिकाणी जमीर अहमद सागर अहमद यांचे जमीर फर्निचर वर्क्स हे दुकान आहे. १८ मे रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास या दुकानातून आगीचे लोट बाहेर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. ही माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली.

अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक विभागाचे घोरपडे, साजिद, लांडगे, खेडकर, बादेवाड, सावळे, सूर्यवंशी, ठाकूर, ताटे, टारपे, शिरेवार आदी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पाच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, अशी माहिती अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांनी दिली. या आगीत सागवानाच्या फळ्या, साजवानी लाकडे जळून एकूण सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.

गुरुवारी आगीचे आणखी एक घटना घडली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर भागातीलच आधार हॉस्पिटल येथे आग लागली होती. अग्निशमन विभागाने या आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत दवाखान्यातील एसी जळून खाक झाला आहे.

टॅग्स :fireआगNandedनांदेडFire Brigadeअग्निशमन दल