शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

निधी वळवला 'लाडक्या बहिणी'कडे; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतही मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 19:03 IST

गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने छदामही दिला नाही हे वास्तव आहे. 

- सचिन मोहिते

नांदेड : बेभरवशी निसर्ग, शेतीमालाचे पडलेले भाव, कर्जाचा वाढता डोंगर आणि संसारगाडा चालविण्याच्या विवंचनेत शेतकरी आत्महत्यांचे सत्रच सुरू आहे. २०१४ पासून गेल्या बारा वर्षांत जिल्ह्यात तब्बल १ हजार ५७३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून एक लाखाचा धनादेश देऊन तोंडाला पाने पुसण्यात येतात; परंतु या कुटुंबाची कधीही भरून न येणारी हानी या तुटपुंज्या मदतीत कशी भरून निघणार. त्यातच गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने छदामही दिला नाही हे वास्तव आहे. 

विदर्भातील महागाव तालुक्यातील एका कुटुंबाने १९८६ मध्ये नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. देशातील शेतकरी आत्महत्येची ही पहिली नोंद झाली होती. त्यानंतर गेली ४१ वर्षे राज्यात हजारो शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणामुळे मृत्यूचा फास कवटाळला. राज्यात या काळात सत्तेत आलेल्या पक्ष्यांनी पीक विमा, कर्जमाफी, खत खरेदीत सवलत अशी वरवरची मलमपट्टी केली; परंतु शेतकऱ्यांची मूळ अडचण मात्र अद्यापही धोरणकर्त्यांना कळालीच नाही. परिणामी जगाचा पोशिंदा आज तिळ-तिळ मरत आहे.

एकट्या नांदेड जिल्ह्यातच गेल्या बारा वर्षात १ हजार ५७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात सर्वाधिक १९० आत्महत्या या २०१५ या वर्षात झाल्या आहेत. त्या खालोखाल २०१६ मध्ये १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यातही सर्वाधिक आत्महत्या या पावसाळ्यातील ऑगस्ट महिन्यात झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे या एका महिन्यात गेल्या बारा वर्षांत १६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून एक लाख रुपयांची मदत दिली जाते. परंतु ही मदत मिळविण्यासाठी शेतकरी कुटुंबाला अग्निदिव्यातून जावे लागते. जिल्हा परिषद, पोलिस, कृषी विभाग आणि आरोग्य विभागाकडून मदतीसाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतरच ही मदत दिली जाते.

ऑक्टोबरपासून छदामही मिळाला नाहीआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदतीसाठी शासनाकडे सव्वा कोटी रुपये थकीत आहेत. त्यापैकी जिल्हा प्रशासनाने ९० लाखांची मागणी केली आहे; परंतु ऑक्टोबर २०२४ पासून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी शासनाकडून छदामही आला नाही. लाडकी बहीण योजनेमुळे शासनाने इतर योजनांचा निधी वळविला आहे. त्याचा फटका कर्ता पुरुष गेलेल्या लाडक्या बहिणींच्या मदतीलाही बसला आहे.

कोणत्या वर्षात किती आत्महत्याजिल्ह्यात २०१४ मध्ये ११९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. २०१५- १९०, २०१६-१८०, २०१७-१५३, २०१८-९८, २०१९-१२२, २०२०-७७, २०२१-११९, २०२२- १४७, २०२३-१७५, २०२४- १६७ आणि २०२५ या वर्षात आतापर्यंत २६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

शेतकऱ्यांचा अन्नत्याग दिन१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केली होती. स्वातंत्र्यानंतर शेतकरी आत्महत्येची ही पहिली घटना म्हणून नोंद झाली होती. तेव्हापासून शेतकरी आत्महत्येचे हे सत्र सुरुच आहे. या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शासनाचे शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी १९ मार्च रोजी शेतकरी एक दिवस अन्नत्याग करतात. तसेच राज्यपालांना पत्र पाठवून शेतकऱ्यांच्या वेदना कळवितात. अशी माहिती संयोजक अशोक वानखेडे आणि डॉ.राजेश माने यांनी दिली.

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाNandedनांदेडfarmer suicideशेतकरी आत्महत्या