शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चार एकर शेतीत घेतले चार लाखांचे उत्पन्न; बिलोलीच्या आधुनिक शेतकऱ्याची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 20:26 IST

बिलोलीच्या महसूल सेवकाने मागच्या ४० वर्षापासून स्वत:च्या मेहनतीने कृतीशील शेती करण्याचा ध्येयवेडा प्रयोग केला आहे़ अवघ्या चार एकर शेतीमध्ये तीन पिकांचे चार लाखांचे उत्पादन दरवर्षी काढून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे़

- राजेश गंगमवार  

बिलोली (नांदेड ) : एखादी लहान-सहान नोकरी लागली की शेतीला जोड व्यवसाय करून शेती केली जाते़ घरात कमावते झाले की शेती दुसऱ्याला करण्यासाठी किंवा पडीक ठेवण्याची अनेक उदाहरणे आहेत़ पण बिलोलीच्या महसूल सेवकाने मागच्या ४० वर्षापासून स्वत:च्या मेहनतीने कृतीशील शेती करण्याचा ध्येयवेडा प्रयोग केला आहे़ अवघ्या चार एकर शेतीमध्ये तीन पिकांचे चार लाखांचे उत्पादन दरवर्षी काढून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे़

येथील माधवराव अंकुशकर १९८० च्या दशकात कोतवाल पदावर रूजू झाले़ सध्या बिलोली तहसील कार्यालयात सेवक म्हणून कार्यरत आहेत़ तुटपुंज्या पगारातच त्यांनी काटकसरीने कुटुंब चालवले़ एका मुलाला एमडी मेडीसीन, तर दुसऱ्याला आयकर अधिकारी बनवले़ दोघेही आज कमावते झाले़ पण लहानपणापासून शेतीचा छंद असलेल्या माधवरावांनी तरूण वयापासूनच नोकरीची सेवा करीत करीत शेतीकडेही लक्ष दिले़ वडिलोपार्जित मिळालेल्या चार एकर कोरडवाहू शेतीचे बागायतीमध्ये रुपांतर केले़ 

बिलोलीच्या शहरालगत असलेल्या सावळी मार्गावरच्या ४ एकर शेतीमधून आठ महिन्यात तीन वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन ते घेत असतात़ पावसाळी व उन्हाळी भात पीक, गहू तसेच उन्हाळी भुईमुगाची लागवड करून स्वत: मेहनत करण्यात पहाटे ५ पासून शेतात सतत राबराबत असतात़ म्हणूनच अवघ्या ४ एकरमध्ये ४ लाखांचे दरवर्षी उत्पादन घेत आले आहेत़ याच मार्गावरून जाताना शेतीकडे नजर टाकल्यास उन्हाळ्यातही हिरवेगार-निसर्गरम्य परिसर दिसून येतो़ शेतीची आवड, दररोजची मेहनत, वेळेवर पाणीपुरवठा, शेतीची सर्व कामे करताना वयाच्या ५६ व्या वर्षातही कधीच डगमगत नाहीत़ पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तिन्ही हंगामात वेगवेगळी पिके घेऊन शेतीप्रधान भारताचे नागरिक असल्याचे उत्तम उदाहरण त्यांच्याकडे पाहून दिसते़ आजही त्यांच्या शेतात तिन्ही पिके डोलत आहेत़ 

एका जबाबदारीने दररोजचे शासन टपाल, समन्स अगदी वेळेवर देऊन संबंधितांची पोच कार्यालयात देणे असा दररोजचा नित्य क्रम आहे़ पण सेवक असूनही मुले अधिकारी झाल्याचा आविर्भाव कधीही दाखवत नाहीत़ चार एकर शेतीमधून चार लाखांचे उत्पादन आठ महिन्यात घेणारे क्वचितच शेतकरी आहेत़ पण शासकीय नोकरी करीत करीत पहाटे पाच पासून तीन तास शेती कामे व नंतर आपली ड्युटी असे करणारे लोक  अपवाद आहेत़ 

कठोर श्रमामुळे मुले उच्च पदावरमुलं उच्च पदावर असली तरी कोणताही मोठेपणा त्यांच्यात दिसून येत नाही़ स्वत:ची शेती करताना लाज कसली असा प्रश्न ते करीत असतात़ आजही महसूल कार्यालयात सेवक पदावर असून खेड्यापाड्यात शासकीय टपाल पोहोचवण्याची त्यांची ड्युटी आहे़ शेतीकडे लक्ष दिल्याने कर्तव्यात कसूर कधीच करीत नाहीत़ कार्यालयीन वेळेत हजर व आपले जवाबदारीचे काम वेळेत पूर्ण असा त्यांचा नियम आहे़ 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रmarket yardमार्केट यार्डMONEYपैसा