शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

भुईकोट किल्ल्याच्या बुरुजाला पडल्या भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:20 IST

ऐतिहासिक राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ला वास्तू देखणी अन् नजरेत भरणारी आहे. पर्यटक, इतिहासप्रेमींना भुरळ घालणारा बाराशे वर्षांचा किल्ला नवीन समस्येने ग्रासला आहे. बाहेरील चारही दिशेने किल्ला- बुरूजाला उभ्या भेगा पडल्या असल्याचे समोर आले आहे. ऐतिहासिक प्रसिद्ध ठेवा भुईसपाट होण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक वास्तू भुईसपाट होण्याचा धोका

गंगाधर तोगरे।कंधार : ऐतिहासिक राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ला वास्तू देखणी अन् नजरेत भरणारी आहे. पर्यटक, इतिहासप्रेमींना भुरळ घालणारा बाराशे वर्षांचा किल्ला नवीन समस्येने ग्रासला आहे. बाहेरील चारही दिशेने किल्ला- बुरूजाला उभ्या भेगा पडल्या असल्याचे समोर आले आहे. ऐतिहासिक प्रसिद्ध ठेवा भुईसपाट होण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.कंधारला समृद्ध असा वैभवशाली ऐतिहासिक वारसा लाभला आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या शहराला राष्ट्रकुटकालीन राजानी देखणी किल्ला वास्तू, निर्माण केली. तसेच अनेक राजे व किल्लेदारांनी किल्ल्यात नवीन वास्तूची भर टाकली. राष्ट्रकुट राजा या नगराला नटवले. जवळ आले तरच नजरेला दिसणारे कंधार एक जाज्वल्य इतिहास जागवते. वर्षाला लाखो पर्यटक याचा अनुभव घेतात. भुईकोट किल्ला सतत पर्यटक, विद्यार्थ्यांनी गजबजलेला असतो. किल्ल्यातील नानाविध वास्तू पाहताना तो रममाण होतो.यापूर्वी किल्ला बुरूज ढासळले होते. त्याची पुनर्बांधणी करून वारसा जतन करण्याचा प्रश्न ‘लोकमत’ने ऐरणीवर आणला. यासाठी निधी उपलब्ध झाला व दुरूस्ती झाली. परंतु आजस्थितीत पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर या दिशेला बाहेरील किल्ला-बुरूजाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे किल्ला ढासळण्याचा पुन्हा धोका वाढला आहे.कोट्यवधीचा निधी खर्च करून विकासकामे झाली. तरीही अनेक सुविधांची मोठी वाणवा आहे. पिण्याचे पाणी, विद्युत रोषणाई, बगीचा, गाईड, मनुष्यबळ, कोरडा खंदक, पोलीस चौकी, खंदकात झाडा झुडपाचे वाढलेले प्रमाण, किल्ल्यावरील वृक्षाचे समूळ उच्चाटन आदी समस्यांने किल्ला हा पर्यटक, इतिहासप्रेमी, नागरिक, संशोधक, विद्यार्थ्यांत सतत चर्चेत असतो. आता बुरूजाला पडलेल्या उभ्या भेगा तात्काळ दुरूस्ती करत वास्तू ,जतन करण्याची गरज आहे. अन्यथा किल्ला भुईसपाट होण्याचा धोका आहे. किल्ल्यातील अनेक वास्तुना झळाळी आली आहे. त्यामुळे पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. तसा बुरूज दुरूस्तीने द्यावा. अन्यथा या भेगा अधिक रूंदावत जातील. आणि किल्ला खिळखिळा होऊन भुईसपाट होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.अनेक वास्तूंचे काळाच्या ओघात भग्नावशेषकिल्ल्यात असलेल्या अनेक वास्तूंचे काळाच्या ओघात भग्नावशेष झाले. तरीही अनेक वास्तू मात्र तग धरून आहेत.विविध योजनेतून किल्ल्यात मोठी डागडुजी केली. आणि किल्ला पूर्ववैभवात नेण्यासाठी प्रयत्न झाले. यासाठी गत दीड दशकांपेक्षा अधिक काळ ‘लोकमत’ यासाठी सातत्याने संबंधित विभागाचे लक्ष वेधते. मोठ्या निधीतून किल्ला परिसर व आतील अनेक वास्तूचे सौंदर्य जतन केले. अनेक वास्तूची डागडुजी, रस्ते आदी कामांवर खर्च केला. त्यामुळे किल्ला विकासात भर पडली.

टॅग्स :NandedनांदेडFortगडArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण