शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी पाणी न सोडल्याने माजी आमदाराचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 17:01 IST

पूर्ण क्षमतेने भरलेल्या उर्ध्व मानार व विष्णुपुरी प्रकल्पातुन रब्बीसाठी पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. यामुळे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध करत माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी नांदेड पाटबंधारे मंडळात आक सकाळी ठिय्या आंदोलन केले.

नांदेड : पूर्ण क्षमतेने भरलेल्या उर्ध्व मानार व विष्णुपुरी प्रकल्पातुन रब्बीसाठी पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. यामुळे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध करत माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी नांदेड पाटबंधारे मंडळात आक सकाळी ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांना निवेदन देवून दोन दिवसात पाणी सोडण्याची मागणी केली.     

मागील चार वर्षापासून दुष्काळाचा सामना करणार्‍या कंधार व लोहा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या हातून यंदाही खरीप हंगाम गेल्यामुळे नुकसान झाले आहे. या भागात सरासरीच्या 55 टक्के पाऊस पडला आहे. तर तालुक्यातील लाभ क्षेत्र असलेल्या उर्ध्व मानार व विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने 15 ऑक्टोंबर पुर्वी रब्बीच्या पाणी पाळ्याचे नियोजन करून पाणी सोडणे अपेक्षीत होते. मात्र, याबाबत पाटबंधारे कार्यालयाकडून कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. यामुळे दिलीप धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकर्‍यांनी 30 ऑक्टोंबर रोजी  आंदोलन करत 5 नोव्हेंबरपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली होती.

यावरही पाणी सोडण्यात आले नसल्याने आज माजी आमदार  शंकरअण्णा धोंडगे यांनी सकाळी अकरा वाजता पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सुरुवातीला त्यांनी अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांना निवेदन दिले यावेळी सब्बीनवार व कार्यकारी अभियंता पत्तेवार यांनी  त्यांच्याशी चर्चा केली. या आंदोलनात राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पवार, माजी सभापती संजय कर्‍हाळे, जि.प.सदस्य अ‍ॅड. विजय धोंडगे, प्रल्हाद पाटील फाजगे, ज्ञानेश्‍वर चोंडे, विष्णु कल्याणकर, छत्रपती स्वामी, शिवराज पवार आदींचा समावेश आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीWaterपाणीwater transportजलवाहतूक