शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी पाणी न सोडल्याने माजी आमदाराचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 17:01 IST

पूर्ण क्षमतेने भरलेल्या उर्ध्व मानार व विष्णुपुरी प्रकल्पातुन रब्बीसाठी पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. यामुळे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध करत माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी नांदेड पाटबंधारे मंडळात आक सकाळी ठिय्या आंदोलन केले.

नांदेड : पूर्ण क्षमतेने भरलेल्या उर्ध्व मानार व विष्णुपुरी प्रकल्पातुन रब्बीसाठी पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. यामुळे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध करत माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी नांदेड पाटबंधारे मंडळात आक सकाळी ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांना निवेदन देवून दोन दिवसात पाणी सोडण्याची मागणी केली.     

मागील चार वर्षापासून दुष्काळाचा सामना करणार्‍या कंधार व लोहा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या हातून यंदाही खरीप हंगाम गेल्यामुळे नुकसान झाले आहे. या भागात सरासरीच्या 55 टक्के पाऊस पडला आहे. तर तालुक्यातील लाभ क्षेत्र असलेल्या उर्ध्व मानार व विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने 15 ऑक्टोंबर पुर्वी रब्बीच्या पाणी पाळ्याचे नियोजन करून पाणी सोडणे अपेक्षीत होते. मात्र, याबाबत पाटबंधारे कार्यालयाकडून कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. यामुळे दिलीप धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकर्‍यांनी 30 ऑक्टोंबर रोजी  आंदोलन करत 5 नोव्हेंबरपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली होती.

यावरही पाणी सोडण्यात आले नसल्याने आज माजी आमदार  शंकरअण्णा धोंडगे यांनी सकाळी अकरा वाजता पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सुरुवातीला त्यांनी अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांना निवेदन दिले यावेळी सब्बीनवार व कार्यकारी अभियंता पत्तेवार यांनी  त्यांच्याशी चर्चा केली. या आंदोलनात राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पवार, माजी सभापती संजय कर्‍हाळे, जि.प.सदस्य अ‍ॅड. विजय धोंडगे, प्रल्हाद पाटील फाजगे, ज्ञानेश्‍वर चोंडे, विष्णु कल्याणकर, छत्रपती स्वामी, शिवराज पवार आदींचा समावेश आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीWaterपाणीwater transportजलवाहतूक