शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईसह चाराटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:20 IST

जिल्ह्यात जूनच्या मध्यातही पाणीटंचाईसह आता चाराटंचाईचेही तीव्र संकट निर्माण झाले आहे. यामुळे पशुधन जगवायचे कसे? असा प्रश्न बळीराजापुढे उभा राहिला आहे.

ठळक मुद्देबळीराजा चिंताक्रांत पावसाचे आगमन लांबल्याने पेरण्याही खोळंबल्या

अनुराग पोवळे।नांदेड : जिल्ह्यात जूनच्या मध्यातही पाणीटंचाईसह आता चाराटंचाईचेही तीव्र संकट निर्माण झाले आहे. यामुळे पशुधन जगवायचे कसे? असा प्रश्न बळीराजापुढे उभा राहिला आहे.‘वायु’ वादळामुळे मान्सून लांबला आहे. १५ जूननंतरही जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठीच ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. आजघडीला १४० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. बळीराजाने खरिपाची तयारी पूर्ण केली असली तरीही पावसाअभावी डोळे आकाशाकडे लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पशुधन आहे त्यांची चिंता दुपटीने वाढली आहे.जिल्ह्यात ११ लाख ४४ हजार ७२५ इतकी पशुधनाची संख्या आहे. जिल्ह्यात १२ लाख ९६ हजार ९४१ मे. चारा उपलब्ध होता. जुलैअखेर ९७ हजार ७४६ मेट्रीक टन चा-याची तूट भासेल, असा अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला होता. मात्र हे कागदावरील आकडे आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामध्ये मोठे अंतर आहे. चा-याची सोय नाही पण पिण्यासाठी पाणीही उपलब्ध करताना बळीराजा मेटाकुटीला आला आहे.शासनाने जनावरांसाठी चारा छावणी उभारण्याचे आदेश दिले होते. मात्र चारा छावणीसाठी एका छावणीत किमान ३०० हून अधिक जनावरे असणे बंधनकारक केले होते. यासह अन्य तांत्रिक बाबीही अडचणीच्या ठरणाºया होत्या. यामुळे या चा-या छावण्या उभारण्याकडे दुर्लक्षच झाले.जसजसा पाऊस लांबत आहे तसतशी चिंता वाढत आहे. जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत २ लाख ८० हजार ४६१ मेट्रीक टन चा-याची आवश्यकता भासणार आहे. यात ९७ हजार ७४६ मेट्रीक टन चा-याची तूट भासणार आहे. जिल्ह्यात जवळपास एक महिन्याचा चारा उपलब्ध असल्याचा अहवाल ४ जूनच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.जिल्ह्यात प्रतिदिन ४६४७ मे. टन चा-याची आवश्यकताच्प्रतिमाह जिल्ह्याला १ लाख ४० हजार २३० मेट्रीक टन चा-याची आवश्यकता आहे. प्रतिदिन ४ हजार ६७४ मेट्रीक टन चारा जिल्ह्यासाठी आवश्यक आहे. जिल्ह्यात जुलैअखेर सर्वाधिक १२ हजार ६०९ मेट्रीक टन चाºयाची कमतरता मुखेड तालुक्यात तर कंधार तालुक्यात ८ हजार ९४७ मे.टन चारा कमी पडणार आहे.

 

टॅग्स :Nandedनांदेडwater shortageपाणीटंचाईFarmerशेतकरीRainपाऊस