शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

राज्यातील पाच जिल्ह्यांना हत्तीरोगाचा धोका; आरोग्य यंत्रणा सक्रिय, कशामुळे होतो हा रोग? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 12:02 IST

प्रतिबंधात्मक औषधी वर्षातून एकदा सलग पाच वर्षे घेतल्यास हा आजार दूर करणे शक्य आहे.

नांदेड : राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये हत्तीरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या जिल्ह्यांत हत्तीरोग निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांना घरोघरी जाऊन प्रतिबंधात्मक औषधींचे वाटप केले जाणार आहे. या मोहीमत ४५ लाख नागरिकांना औषधी वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड या ५ जिल्ह्यांत ही मोहीम राबविली जाणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना डीईसी, अल्बेंडाझोल आणि इवरमेक्टिन ही तीन औषधी देण्यात येणार आहेत. गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यात डीईसी आणि अल्बेंडाझोल ही दोन औषधे दिली जातील. प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी बूथवर आणि घरोघरी भेटी देऊन पूर्वनिश्चित डोसनुसार ही औषधे वाटप करणार आहेत. राज्याला हत्तीरोगापासून मुक्त करण्यासाठी प्रभावी आंतरक्षेत्रीय समन्वयाद्वारे सुमारे ४५ लाख ३४ हजार ६५३ व्यक्तींना हत्तीरोग (फायलेरिया) प्रतिबंधक औषधी देण्याचे उद्दिष्ट आरोग्य यंत्रणेकडून निर्धारित केले आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती नागरिकांना औषधी...हत्तीरोगापासून बचावासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून चंद्रपूर- ११ लाख ६१ हजार ४०४, भंडारा- २ लाख ७२ हजार ८३३, गोंदिया- ८ लाख ९६ हजार १५७, नांदेड- १९ लाख ४८ हजार ६१२ आणि गडचिरोली जिल्ह्यातील २ लाख ५५ हजार ६४७ नागरिकांना अँटी-फायलेरियल औषधी देण्यात येणार आहे.

अशी असतील पथकेजिल्हा - पर्यवेक्षक-रॅपीड रिस्पॉन्स टीमचंद्रपूर - १७७ -४५भंडारा- १२८ -५गोंदिया- १२८ -१३४नांदेड- ३८६ -५२गडचिरोली-२०४-११एकूण- १०२४ -२४७

औषधीचा दुष्परिणाम नाही :हत्तीरोग (फायलेरियासिस) प्रतिबंधक औषधी घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. ही औषधी सुरक्षित असून उच्च रक्तदाब, मधुमेह, संधिवातग्रस्त व्यक्तींनी ती घेतली पाहिजे. औषधी घेतल्यानंतर लाभार्थ्याला अडचणी आल्यास, रॅपिड रिस्पॉन्स टीम मदतीसाठी असणार आहे.

कशामुळे होतो हत्तीरोग?क्युलेक्स, मांसोनिया संक्रमित डास चावल्याने फायलेरिया (हत्तीरोग) हा गंभीर आजार होतो. यामध्ये लिम्फॅटिक सिस्टमला हानी पोहोचते. याला प्रतिबंध न केल्यास, शरीराच्या अवयवांमध्ये अत्यंत सूज येते. जगातील १९ देशांमध्ये हत्तीरोगाचे निर्मूलन झाले असून, १० देश निर्मूलनाच्या जवळ आहेत. प्रतिबंधात्मक औषधी वर्षातून एकदा सलग पाच वर्षे घेतल्यास हा आजार दूर करणे शक्य आहे.

यांना दिली जाणार नाही औषधीफायलेरियासिसपासून लोकांचा बचाव करण्यासाठी निवडक पाच जिल्ह्यांमध्ये औषधी वाटप होणार आहेत. ही औषधी रिकाम्या पोटी घेऊ नयेत, तसेच २ वर्षांखालील मुले, गरोदर महिला आणि गंभीर आजारी व्यक्तींना ही औषधी दिली जाणार नाहीत.- डॉ. राधाकिशन पवार, राज्य कार्यक्रम अधिकारी, फायलेरिया निर्मूलन.

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्य