शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

राज्यातील पाच जिल्ह्यांना हत्तीरोगाचा धोका; आरोग्य यंत्रणा सक्रिय, कशामुळे होतो हा रोग? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 12:02 IST

प्रतिबंधात्मक औषधी वर्षातून एकदा सलग पाच वर्षे घेतल्यास हा आजार दूर करणे शक्य आहे.

नांदेड : राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये हत्तीरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या जिल्ह्यांत हत्तीरोग निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांना घरोघरी जाऊन प्रतिबंधात्मक औषधींचे वाटप केले जाणार आहे. या मोहीमत ४५ लाख नागरिकांना औषधी वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड या ५ जिल्ह्यांत ही मोहीम राबविली जाणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना डीईसी, अल्बेंडाझोल आणि इवरमेक्टिन ही तीन औषधी देण्यात येणार आहेत. गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यात डीईसी आणि अल्बेंडाझोल ही दोन औषधे दिली जातील. प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी बूथवर आणि घरोघरी भेटी देऊन पूर्वनिश्चित डोसनुसार ही औषधे वाटप करणार आहेत. राज्याला हत्तीरोगापासून मुक्त करण्यासाठी प्रभावी आंतरक्षेत्रीय समन्वयाद्वारे सुमारे ४५ लाख ३४ हजार ६५३ व्यक्तींना हत्तीरोग (फायलेरिया) प्रतिबंधक औषधी देण्याचे उद्दिष्ट आरोग्य यंत्रणेकडून निर्धारित केले आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती नागरिकांना औषधी...हत्तीरोगापासून बचावासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून चंद्रपूर- ११ लाख ६१ हजार ४०४, भंडारा- २ लाख ७२ हजार ८३३, गोंदिया- ८ लाख ९६ हजार १५७, नांदेड- १९ लाख ४८ हजार ६१२ आणि गडचिरोली जिल्ह्यातील २ लाख ५५ हजार ६४७ नागरिकांना अँटी-फायलेरियल औषधी देण्यात येणार आहे.

अशी असतील पथकेजिल्हा - पर्यवेक्षक-रॅपीड रिस्पॉन्स टीमचंद्रपूर - १७७ -४५भंडारा- १२८ -५गोंदिया- १२८ -१३४नांदेड- ३८६ -५२गडचिरोली-२०४-११एकूण- १०२४ -२४७

औषधीचा दुष्परिणाम नाही :हत्तीरोग (फायलेरियासिस) प्रतिबंधक औषधी घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. ही औषधी सुरक्षित असून उच्च रक्तदाब, मधुमेह, संधिवातग्रस्त व्यक्तींनी ती घेतली पाहिजे. औषधी घेतल्यानंतर लाभार्थ्याला अडचणी आल्यास, रॅपिड रिस्पॉन्स टीम मदतीसाठी असणार आहे.

कशामुळे होतो हत्तीरोग?क्युलेक्स, मांसोनिया संक्रमित डास चावल्याने फायलेरिया (हत्तीरोग) हा गंभीर आजार होतो. यामध्ये लिम्फॅटिक सिस्टमला हानी पोहोचते. याला प्रतिबंध न केल्यास, शरीराच्या अवयवांमध्ये अत्यंत सूज येते. जगातील १९ देशांमध्ये हत्तीरोगाचे निर्मूलन झाले असून, १० देश निर्मूलनाच्या जवळ आहेत. प्रतिबंधात्मक औषधी वर्षातून एकदा सलग पाच वर्षे घेतल्यास हा आजार दूर करणे शक्य आहे.

यांना दिली जाणार नाही औषधीफायलेरियासिसपासून लोकांचा बचाव करण्यासाठी निवडक पाच जिल्ह्यांमध्ये औषधी वाटप होणार आहेत. ही औषधी रिकाम्या पोटी घेऊ नयेत, तसेच २ वर्षांखालील मुले, गरोदर महिला आणि गंभीर आजारी व्यक्तींना ही औषधी दिली जाणार नाहीत.- डॉ. राधाकिशन पवार, राज्य कार्यक्रम अधिकारी, फायलेरिया निर्मूलन.

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्य