शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

नांदेड जिल्हा प्रशासनाचा टंचाई उपाययोजनांवर पाच कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:24 IST

उन्हाच्या तीव्रतेबरोबर पाणीटंचाईनेही गावे होरपळून निघत आहेत. टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून कुपनलिका, विहीर दुरुस्तीसह पूरक नळ योजनांसाठी एप्रिलअखेरपर्यंत ४ कोटी ९४ लाख १३ हजार इतका निधी खर्च झाला आहे.

ठळक मुद्दे४३५ विहिरी घेतल्या : दुरूस्तीची कामेही प्रगतीपथावर

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : उन्हाच्या तीव्रतेबरोबर पाणीटंचाईनेही गावे होरपळून निघत आहेत. टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून कुपनलिका, विहीर दुरुस्तीसह पूरक नळ योजनांसाठी एप्रिलअखेरपर्यंत ४ कोटी ९४ लाख १३ हजार इतका निधी खर्च झाला आहे.ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र होत आहे. या बरोबरच टँकर आणि अधिग्रहणाची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमिवर प्रशासनाने आवश्यकतेनुसार टँकर पुरविण्यास सुरुवात केली असून विविध जलस्त्रोतांचे अधिग्रहणही करण्यात येत आहे. दरम्यान, या बरोबरच जिल्ह्यातील विविध भागांत विंधन विहिरी, कुपनलिका घेणे, पाणीपुरवठा योजनांची तसेच विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरत्या पूरक नळयोजना घेणे, टँकर तसेच बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, विहिरीतील गाळ काढणे आदी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.सद्य:स्थितीत जिल्ह्यात ४ हजार ५३ प्रस्तावित उपाययोजनांची संख्या असून यासाठी प्रस्तावित गावे १२४२ इतकी आहेत. तर ५७६ वाड्यांचाही यात समावेश असून यासाठी ४ हजार ७४६.५७ इतका खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, प्रशासनाने २ हजार २११ गावे आणि २७४ वाड्यांसाठी २ हजार ९२८ उपाययोजनांना मंजुरी दिली असून यासाठी २०३०.७४ लाख इतका खर्च येणार आहे. यातील ११४६ गावे आणि २३२ वाड्यांवर १७९६ उपाययोजनांची कामे प्रगतीपथावर असून ९३८.४२ इतका खर्च करण्यात येत आहे. दरम्यान, १५९० उपाययोजनांची कामे प्रशासनातर्फे पूर्ण करण्यात आली असून यासाठी ४९४.१३ लाख इतका खर्च केल्याचे जि.प. पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले़बिलोली : २२ तात्पुरत्या नळयोजनापाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा ग्रामीण पाणीटंचाई कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात १५८ तात्पुरत्या पूरक नळयोजना प्रस्तावित असून यातील १६० योजनांचे सर्वेक्षणही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यातील १४० योजना कामासाठी पात्र ठरल्या आहेत. पात्र योजनांपैकी १३८ योजनांस प्रपत्र (ब) प्राप्त झाले असून ३ मेपर्यंत १३० योजनांची अंदाजपत्रकेही सादर करण्यात आली आहेत. यातील १०६ योजनांच्या अंदाजपत्रकांना मंजुरी देण्यात आली आहे. यात बिलोली तालुक्यातील सर्वाधिक २२ योजनांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ मुखेड १५, कंधार आणि लोहा प्रत्येकी १४, अर्धापूर ७, देगलूर १०, हदगाव ४, किनवट ६, हिमायतनगर आणि नांदेड ३ तर माहूर तालुक्यातील २ योजनांची अंदाजपत्रके मंजूर आहेत.नवीन विंधन विहिरी घेण्याचा उपक्रम जिल्हा ग्रामीण पाणीटंचाई कार्यक्रमातंर्गत सुरु आहे. प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील १६ तालुक्यांत ९५७ विंधन विहिरी प्रस्तावित असून यातील ८७९ विहिरींना प्रशासनाने मंजूरी दिली आहे. मंजुरी दिली आहे. यापैकी ८७९ विहिरींचे काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मागील दोन महिन्यांत प्रशासनाच्या वतीने ४३५ विंधन विहिरींपैकी ३६५ विहिरींना पाणी लागले असून ५९ कोरड्या निघाल्या. दरम्यान, यशस्वी ३६५ पैकी ४० विंधन विहिरींवर हातपंप बसविण्यात आल्याने टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदwater shortageपाणीटंचाईwater scarcityपाणी टंचाई