शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

नांदेड जिल्हा प्रशासनाचा टंचाई उपाययोजनांवर पाच कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:24 IST

उन्हाच्या तीव्रतेबरोबर पाणीटंचाईनेही गावे होरपळून निघत आहेत. टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून कुपनलिका, विहीर दुरुस्तीसह पूरक नळ योजनांसाठी एप्रिलअखेरपर्यंत ४ कोटी ९४ लाख १३ हजार इतका निधी खर्च झाला आहे.

ठळक मुद्दे४३५ विहिरी घेतल्या : दुरूस्तीची कामेही प्रगतीपथावर

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : उन्हाच्या तीव्रतेबरोबर पाणीटंचाईनेही गावे होरपळून निघत आहेत. टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून कुपनलिका, विहीर दुरुस्तीसह पूरक नळ योजनांसाठी एप्रिलअखेरपर्यंत ४ कोटी ९४ लाख १३ हजार इतका निधी खर्च झाला आहे.ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र होत आहे. या बरोबरच टँकर आणि अधिग्रहणाची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमिवर प्रशासनाने आवश्यकतेनुसार टँकर पुरविण्यास सुरुवात केली असून विविध जलस्त्रोतांचे अधिग्रहणही करण्यात येत आहे. दरम्यान, या बरोबरच जिल्ह्यातील विविध भागांत विंधन विहिरी, कुपनलिका घेणे, पाणीपुरवठा योजनांची तसेच विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरत्या पूरक नळयोजना घेणे, टँकर तसेच बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, विहिरीतील गाळ काढणे आदी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.सद्य:स्थितीत जिल्ह्यात ४ हजार ५३ प्रस्तावित उपाययोजनांची संख्या असून यासाठी प्रस्तावित गावे १२४२ इतकी आहेत. तर ५७६ वाड्यांचाही यात समावेश असून यासाठी ४ हजार ७४६.५७ इतका खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, प्रशासनाने २ हजार २११ गावे आणि २७४ वाड्यांसाठी २ हजार ९२८ उपाययोजनांना मंजुरी दिली असून यासाठी २०३०.७४ लाख इतका खर्च येणार आहे. यातील ११४६ गावे आणि २३२ वाड्यांवर १७९६ उपाययोजनांची कामे प्रगतीपथावर असून ९३८.४२ इतका खर्च करण्यात येत आहे. दरम्यान, १५९० उपाययोजनांची कामे प्रशासनातर्फे पूर्ण करण्यात आली असून यासाठी ४९४.१३ लाख इतका खर्च केल्याचे जि.प. पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले़बिलोली : २२ तात्पुरत्या नळयोजनापाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा ग्रामीण पाणीटंचाई कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात १५८ तात्पुरत्या पूरक नळयोजना प्रस्तावित असून यातील १६० योजनांचे सर्वेक्षणही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यातील १४० योजना कामासाठी पात्र ठरल्या आहेत. पात्र योजनांपैकी १३८ योजनांस प्रपत्र (ब) प्राप्त झाले असून ३ मेपर्यंत १३० योजनांची अंदाजपत्रकेही सादर करण्यात आली आहेत. यातील १०६ योजनांच्या अंदाजपत्रकांना मंजुरी देण्यात आली आहे. यात बिलोली तालुक्यातील सर्वाधिक २२ योजनांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ मुखेड १५, कंधार आणि लोहा प्रत्येकी १४, अर्धापूर ७, देगलूर १०, हदगाव ४, किनवट ६, हिमायतनगर आणि नांदेड ३ तर माहूर तालुक्यातील २ योजनांची अंदाजपत्रके मंजूर आहेत.नवीन विंधन विहिरी घेण्याचा उपक्रम जिल्हा ग्रामीण पाणीटंचाई कार्यक्रमातंर्गत सुरु आहे. प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील १६ तालुक्यांत ९५७ विंधन विहिरी प्रस्तावित असून यातील ८७९ विहिरींना प्रशासनाने मंजूरी दिली आहे. मंजुरी दिली आहे. यापैकी ८७९ विहिरींचे काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मागील दोन महिन्यांत प्रशासनाच्या वतीने ४३५ विंधन विहिरींपैकी ३६५ विहिरींना पाणी लागले असून ५९ कोरड्या निघाल्या. दरम्यान, यशस्वी ३६५ पैकी ४० विंधन विहिरींवर हातपंप बसविण्यात आल्याने टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदwater shortageपाणीटंचाईwater scarcityपाणी टंचाई