शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

...अखेर गोदावरी स्वच्छतेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:22 IST

गोदावरी नदी प्रदूषणाचा विषय ‘लोकमत’ ने ऐरणीवर आणल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोन दिवसांपासून गोदावरी नदीतील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेण्यात आले

ठळक मुद्देमहापालिका : जलपर्णी काढण्यासाठी यंत्रणा लागली कामाला

नांदेड : गोदावरीनदी प्रदूषणाचा विषय ‘लोकमत’ ने ऐरणीवर आणल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोन दिवसांपासून गोदावरीनदीतील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेण्यात आले असून २५ एप्रिल रोजी प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी गोदावरी नदीकाठाची पाहणी केली.शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीची दुरवस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली असून पाणी कमी आणि जलपर्णी जास्त अशी अवस्था झाली आहे. धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व असलेल्या गोदावरीचे पावित्र्य शहरातून वाहणारे काही नाले थेट नदीत मिसळत असल्याने नष्ट होत आहेत.गोदावरीची ही दुरवस्था ‘लोकमत’ने जागतिक वसुंधरादिनी मांडली होती. त्यानंतर महापालिका प्रशासन कामाला लागले. जलपर्णी काढण्याचे काम हाती घेण्यात आले असून ३० जीवरक्षक यासाठी काम करीत आहेत. तसेच १ पोकलॅन्ड मशिनही लावण्यात आली आहे. स्वच्छता विभागाचे विशेष पथकही गोदावरीच्या स्वच्छतेसाठी काम करीत आहे.प्रभारी आयुक्त काकडे यांनी गोदावरी नदीकाठाची बुधवारी पाहणी केली. त्याचवेळी गोदावरी स्वच्छतेबाबत आवश्यक त्या सूचनाही दिल्या.यावेळी कार्यकारी अभियंता परवेज कलीम, उपायुक्त अजितपाल संधू, सहायक आयुक्त डॉ. मिर्झा फरहतउल्ला बेग, सुधीर इंगोले, डॉ. रईस बेग आदींची उपस्थिती होती.आयुक्तांच्या या भेटीदरम्यान शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आयुक्तांची भेट घेवून गोदावरी नदी स्वच्छता मोहीम सुरू करण्याची मागणी केली.आयुक्तांचा मॅरेथॉन आढावामहापालिकेच्या कारभाराचा काकडे यांनी बुधवारी पुन्हा एकदा मॅरेथॉन आढावा घेतला. दुपारी झालेल्या या बैठकीत स्वच्छता, थकीत मालमत्ता कर, प्लास्टिक बंदी, गोदावरी स्वच्छता आदी विषयांवर चर्चा झाली. शहराच्या गंभीर झालेल्या पाणीप्रश्नावरही आयुक्तांनी विभागाकडून माहिती घेतली. थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष प्रयत्नांची गरज असल्याचे काकडे यांनी यावेळी सांगितले. प्लास्टिकबंदी निर्णयाची अंमलबजावणीही गांभीर्याने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.गोदावरी स्वच्छतेचा सुधारित आराखडागोदावरी शुद्धीकरणासाठी महापालिकेने २२ कोटींचा आराखडा राज्य शासनाकडे पाठविला होता. हा आराखडा शासनाने परत पाठवताना तो नव्याने सादर करण्याचा आदेश महापालिकेला दिला होता. त्यानुसार महापालिकेकडून सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. आचारसंहितेमुळे हा आराखडा राज्यशासनाला पाठविण्यात आला नाही. आचारसंहिता संपताच तो शासनाकडे पाठविण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता परवेज कलीम यांनी सांगितले. सुधारित आराखडा हा जवळपास ३० कोटींपर्यंत पोहोचला आहे.

टॅग्स :NandedनांदेडgodavariगोदावरीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानriverनदी