शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे रबी उत्पादन घटण्याची भीती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 16:27 IST

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी संकटाने हिरावून घेतले जात आहे़ यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच पार बिगडून गेले

ठळक मुद्देधुक्यामुळे रबी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला 

पार्डी (जि़नांदेड) : अर्धापूर तालुक्याला मागील वर्षी कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक संकटाला सामोरे जात आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी संकटाने हिरावून घेतले जात आहे़ यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच पार बिगडून गेले आहे. यंदा ढगाळ वातावरणामुळे रबीचे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे़ 

सध्या रबी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी झालेली असून पिके समाधानकारक असली तरी सततच्या ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ यामुळेही शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार की का? या चिंतेत आहे. यावर्षी पावसाळा समाधानकारक झाल्याने शेतकरी आनंदित असताना परतीच्या पावसाने हाहाकार माजविला होता़ शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला़ खरीप हंगाम गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला़ यातून सावरून रबी हंगामातील पिकांची पेरणी केली़ मात्र मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पुन्हा नैसर्गिक आपत्ती आली आहे़ ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, आंबा व तुरीला फटका बसत आहे़ तर केळी व ज्वारी करिता पोषण वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यात ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून तीन पाणी पाळ्या रबीकरीता मिळणार आहेत़ यामुळे शेतकऱ्यांनी रबी पिकांची पेरणी केली़ मात्र सततच ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने गव्हाची वाढ खुंटली़ तर काही शेतकरी गव्हाची पेरणी करण्याकरिता मागेपुढे पाहत आहेत हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे व आंब्याच्या आबेमोहर गळून जात आहे आणि तुरीच्या शेंगा अळीने फस्त केल्या जात आहेत़ यामुळे रबीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहेत़

अर्धापूर तालुका इसापूर धरणाच्या लाभ क्षेत्रात येत असल्याने तालुक्यात बागायतदार शेतकरी जास्त असून नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे केळी, हळद, ऊस या पिकांसह सोयाबीन, कापूस, गहू, ज्वारी, हरभरा आणि भाजीपाला घेतला जातो. यंदा पावसाळा समाधानकारक झाल्याने नदी ,नाले ,विहीर व बोअरवेल पाण्याने भरलेली आहेत़ त्यामुळे रबीच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे तसेच इसापूर धरणातून पाणी पाळ्या मिळत असल्याने कोरडवाहू शेतीही ओलायती खाली आली आहे त्यामुळेही रबीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली, मात्र मागील काही दिवसांपासून रबीसाठी पोषक वातावरण उपलब्ध होत नसल्याचे दिसून येते़ 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीweatherहवामानNandedनांदेड