शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

ढगाळ वातावरणामुळे रबी उत्पादन घटण्याची भीती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 16:27 IST

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी संकटाने हिरावून घेतले जात आहे़ यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच पार बिगडून गेले

ठळक मुद्देधुक्यामुळे रबी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला 

पार्डी (जि़नांदेड) : अर्धापूर तालुक्याला मागील वर्षी कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक संकटाला सामोरे जात आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी संकटाने हिरावून घेतले जात आहे़ यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच पार बिगडून गेले आहे. यंदा ढगाळ वातावरणामुळे रबीचे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे़ 

सध्या रबी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी झालेली असून पिके समाधानकारक असली तरी सततच्या ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ यामुळेही शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार की का? या चिंतेत आहे. यावर्षी पावसाळा समाधानकारक झाल्याने शेतकरी आनंदित असताना परतीच्या पावसाने हाहाकार माजविला होता़ शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला़ खरीप हंगाम गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला़ यातून सावरून रबी हंगामातील पिकांची पेरणी केली़ मात्र मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पुन्हा नैसर्गिक आपत्ती आली आहे़ ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, आंबा व तुरीला फटका बसत आहे़ तर केळी व ज्वारी करिता पोषण वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यात ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून तीन पाणी पाळ्या रबीकरीता मिळणार आहेत़ यामुळे शेतकऱ्यांनी रबी पिकांची पेरणी केली़ मात्र सततच ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने गव्हाची वाढ खुंटली़ तर काही शेतकरी गव्हाची पेरणी करण्याकरिता मागेपुढे पाहत आहेत हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे व आंब्याच्या आबेमोहर गळून जात आहे आणि तुरीच्या शेंगा अळीने फस्त केल्या जात आहेत़ यामुळे रबीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहेत़

अर्धापूर तालुका इसापूर धरणाच्या लाभ क्षेत्रात येत असल्याने तालुक्यात बागायतदार शेतकरी जास्त असून नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे केळी, हळद, ऊस या पिकांसह सोयाबीन, कापूस, गहू, ज्वारी, हरभरा आणि भाजीपाला घेतला जातो. यंदा पावसाळा समाधानकारक झाल्याने नदी ,नाले ,विहीर व बोअरवेल पाण्याने भरलेली आहेत़ त्यामुळे रबीच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे तसेच इसापूर धरणातून पाणी पाळ्या मिळत असल्याने कोरडवाहू शेतीही ओलायती खाली आली आहे त्यामुळेही रबीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली, मात्र मागील काही दिवसांपासून रबीसाठी पोषक वातावरण उपलब्ध होत नसल्याचे दिसून येते़ 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीweatherहवामानNandedनांदेड