शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे रबी उत्पादन घटण्याची भीती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 16:27 IST

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी संकटाने हिरावून घेतले जात आहे़ यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच पार बिगडून गेले

ठळक मुद्देधुक्यामुळे रबी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला 

पार्डी (जि़नांदेड) : अर्धापूर तालुक्याला मागील वर्षी कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक संकटाला सामोरे जात आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी संकटाने हिरावून घेतले जात आहे़ यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच पार बिगडून गेले आहे. यंदा ढगाळ वातावरणामुळे रबीचे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे़ 

सध्या रबी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी झालेली असून पिके समाधानकारक असली तरी सततच्या ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ यामुळेही शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार की का? या चिंतेत आहे. यावर्षी पावसाळा समाधानकारक झाल्याने शेतकरी आनंदित असताना परतीच्या पावसाने हाहाकार माजविला होता़ शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला़ खरीप हंगाम गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला़ यातून सावरून रबी हंगामातील पिकांची पेरणी केली़ मात्र मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पुन्हा नैसर्गिक आपत्ती आली आहे़ ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, आंबा व तुरीला फटका बसत आहे़ तर केळी व ज्वारी करिता पोषण वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यात ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून तीन पाणी पाळ्या रबीकरीता मिळणार आहेत़ यामुळे शेतकऱ्यांनी रबी पिकांची पेरणी केली़ मात्र सततच ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने गव्हाची वाढ खुंटली़ तर काही शेतकरी गव्हाची पेरणी करण्याकरिता मागेपुढे पाहत आहेत हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे व आंब्याच्या आबेमोहर गळून जात आहे आणि तुरीच्या शेंगा अळीने फस्त केल्या जात आहेत़ यामुळे रबीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहेत़

अर्धापूर तालुका इसापूर धरणाच्या लाभ क्षेत्रात येत असल्याने तालुक्यात बागायतदार शेतकरी जास्त असून नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे केळी, हळद, ऊस या पिकांसह सोयाबीन, कापूस, गहू, ज्वारी, हरभरा आणि भाजीपाला घेतला जातो. यंदा पावसाळा समाधानकारक झाल्याने नदी ,नाले ,विहीर व बोअरवेल पाण्याने भरलेली आहेत़ त्यामुळे रबीच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे तसेच इसापूर धरणातून पाणी पाळ्या मिळत असल्याने कोरडवाहू शेतीही ओलायती खाली आली आहे त्यामुळेही रबीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली, मात्र मागील काही दिवसांपासून रबीसाठी पोषक वातावरण उपलब्ध होत नसल्याचे दिसून येते़ 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीweatherहवामानNandedनांदेड