शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

दुष्काळी अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:28 IST

जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी या तीन दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी शासनाने दुष्काळी अनुदान दिले असून या अनुदानासाठी ८६ कोटी ९१ लाख ७ हजार २९६ रुपयांचा निधी बँक खात्यात जमा केला आहे.

ठळक मुद्देतीन दुष्काळी तालुके ८६ कोटी ९१ लाखांचा निधी बँक खात्यात जमा

अनुराग पोवळे।नांदेड : जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी या तीन दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी शासनाने दुष्काळी अनुदान दिले असून या अनुदानासाठी ८६ कोटी ९१ लाख ७ हजार २९६ रुपयांचा निधी बँक खात्यात जमा केला आहे. हे दुष्काळी अनुदान आता कधी वाटप होईल, याकडे शेतक-यांचे लक्ष लागले असून खरीप पेरणीपूर्वी हे अनुदान वाटप करण्यासाठी बँकांनी नियोजन करण्याच्या सूचना खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिल्या आहेत.जिल्ह्यात २०१८ मध्ये देगलूर, मुखेड आणि उमरी या तीन तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला होता. या दुष्काळामध्ये देगलूर तालुक्यातील १०८ गावांमधील ५७ हजार ७३७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. मुखेड तालुक्यात १३५ गावांत ७७ हजार ८६४ आणि उमरी तालुक्यात ६३ गावामध्ये ३४ हजार ९९१ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके बाधित झाली होती. या तीन तालुक्यांत १ लाख ७० हजार ५९२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. याचा फटका तीन तालुक्यांतील १ लाख ५५ हजार ७४१ शेतकºयांना बसला होता. त्यात मुखेड तालुक्यातील सर्वाधिक ७१ हजार १७६ शेतकºयांचा समावेश आहे. देगलूर तालुक्यातील ५४ हजार २३७ आणि उमरी तालुक्यातील ३० हजार ३२८ शेतकरी दुष्काळामुळे होरपळले होते.या दुष्काळी तालुक्यातील बाधित शेतक-यांना मदतीचे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला. हे अनुदान वाटप करताना शेती पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक शेती पिकाच्या नुकसानीबाबत ६ हजार ८०० रुपये प्रतिहेक्टर किंवा किमान १ हजार रुपये यापैकी अधिक असेल ती रक्कम तसेच बहुवार्षिक पिकाच्या ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसानीबाबत १८ हजार रुपये प्रतिहेक्टर किंवा किमान २ हजार रुपये यापैकी अधिक असेल ती रक्कम शेतक-यांना वितरीत केली जाणार आहे. हे अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत असलेल्या शेतकºयांना दिले जाणार आहे.देगलूर तालुक्यातील ५४ हजार २३७ शेतक-यांसाठी ३० कोटी ४ लाख ५२ हजार रुपये अनुदान शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केले आहे. मुखेड तालुक्यातील ७१ हजार १७६ शेतक-यांसाठी ४० कोटी ६४ लाख १६ हजार आणि उमरी तालुक्यातील २० हजार ३२८ शेतक-यांसाठी १६ कोटी २३ लाख रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. हा निधी शेतक-यांच्या खात्यातही जमा करण्यात आला आहे.दुष्काळी अनुदान उचलण्यासाठी शेतक-यांची उमरी, देगलूर आणि मुखेड तालुक्यांतील जिल्हा बँकेच्या शाखामधून गर्दी होत आहे. खात्यात अनुदान जमा झाले असले तरी ते उचलण्यासाठी जिल्हा बँकेच्या दुष्काळी तालुक्यांतील शाखामध्ये उपलब्ध मनुष्यबळ लक्षात घेता शेतक-यांची गर्दी होत आहे. मुखेडचे आ. तुषार राठोड यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी जिल्हा बँकेद्वारे वेळेत अनुदान वाटप करण्याच्या सूचना खा. चिखलीकर यांनी केली़

जून अखेरपर्यंत अनुदान वाटप होणारच्शासनाने दुष्काळी अनुदानापोटी ८२ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. हा निधी दुष्काळी तालुक्यातील शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आतापर्यत २६ कोटी रुपये शेतक-यांनी उचलले आहेत. उर्वरित रक्कमही पेरणीपूर्वी शेतक-यांना उचलता यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जून अखेरपर्यंत सर्व रक्कम वितरित होईल-अजय कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा मध्यवर्ती बँक

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीdroughtदुष्काळ