शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 18:51 IST

किरोडा शिवारातील अतिवृष्टी बाधित नुकसानीची उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद

ठळक मुद्देओल्या दुष्काळाची व्यथा मांडताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर आत्महत्या करणार नसल्याचे शेतकऱ्यांकडून घेतले वचन

लोहा : परतीच्या पावसाने अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाकडून प्रत्येक गाव शिवारातील अतिवृष्टी बाधित पिकांचे पहाणी व पंचनामे सुरू केले. तर अनेक प्रमुख पक्षातील पुढाऱ्यांनी थेट बांधावर जात पिकांच्या नुकसानीची पहाणी केली. मंगळवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तालुक्यातील तीन गाव शिवारातील पिकांची पहाणी केली. यावेळी उद्धव ठाकरेंसमोर ओल्या दुष्काळाची व्यथा मांडताना शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचा पाहायला मिळाला. ठाकरे यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत काळजी करू नका असा धीर दिला.  

यंदा परतीच्या पावसाने सर्वत्र कहर केला. क्षमतेपेक्षा अधिक पाऊस अतिवृष्टी ने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे संपूर्णतः नुकसान झाले. सोयाबीन, ज्वारी व कपाशीला कोंब फुटून पिकं हातची गेली. राज्यभर पिकांची पहाणी विविध पक्षातील नेतेमंडळीनी सुरू केली. मंगळवारी सकाळी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी खा.चंद्रकांत खैरे, आ. एकनाथ शिंदे, आ. राहुल पाटील, माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. संतोष बांगर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, उपविभागीय अधिकारी एस.एस. बोरगावकर आदींसह लोहा तालुक्यातील अतिवृष्टी बाधित गावांच्या शिवारातील पिकांची पहाणी केली. त्यामध्ये जनापुरी, आंबेसंगवी व किरोडा येथील थेट बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी, तुम्ही हताश व निराश होऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर देत मनात आत्महत्येचा वाईट विचारसुद्धा आणायचा नाही असे वचन द्या अशी भावनिक साद घातली. 

...अन शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटलाउद्धव ठाकरे किरोडा शिवारात नुकसानीची पाहणी करत होते. यावेळी या भागातील ६० वर्षीय शेतकरी मारुती जाधव ठाकरे यांना माहिती देत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. ते पाहून स्वतः उद्धव ठाकरेसुद्धा भावुक झाले. यानंतर प्रशासनातील अधिकारी व शेतकऱ्यासोबत त्यांनी संवाद साधला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती