शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आर्थिक चणचणीमुळे शेतकऱ्याच्या मुलाने संपवले जीवन; मृतदेह पाहून वडिलांचेही टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:56 IST

कर्जबाजारीपणामुळे शेतकरी पिता-पुत्राने संपवले जीवन

बिलोली- कर्जबाजारीपणा तसेच सततच्या नापिकीमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या मिनकी येथील शेतकरी पिता-पुत्राने ९ जानेवारीला सकाळी नऊ वाजता स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार (वय ४३) व ओमकार राजेंद्र पैलवार (१६) असे मृत पिता-पुत्राचे नावे आहेत.

तालुक्यातील मिनकी येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र पैलवार यांना दोन एकर जमीन आहे. त्या शेतावर चार लाखांचे कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँक (खतगाव) या शाखेकडून घेतले होते. शेतावरील कर्ज व सततची होत असलेली नापिकी, यामुळे मुलाच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा याची चिंता होती. याबाबत सतत घरात आर्थिक ताणतणाव असायचा. त्यांचा मुलगा ओमकार हा उदगीर येथे शिक्षणास होता.

मुलगा ओमकार हा संक्रांतीनिमित्त गावाकडे आला होता. त्याने ८ जानेवारीला वडिलांना नवीन कपडे व शालेय साहित्य तसेच नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी पैशांची मागणी केली परंतु वडिलांनी त्यांना पैसे नाहीत, थोडे दिवस थांब, नंतर घेऊन देतो, असे सांगितले. त्यामुळे मुलगा नाराज झाला. वडिलांनी पैसे दिले नाहीत म्हणून त्याने बुधवारी रात्रीच्या वेळेस त्यांच्या शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा घरी नसल्याचे पाहून वडील राजेंद्र पैलवार गुरुवारी सकाळी शोधाशोध करत शेताकडे गेले तेव्हा शेतातील लिंबाच्या झाडाला मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते पाहताच वडिलांनीसुद्धा मुलाने गळफास घेतलेला दोरखंड सोडून त्याच दोरखंडाने, त्याच झाडाला गळफास घेऊन स्वतः ची जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याNandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्र