शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
4
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
5
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
6
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
7
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
8
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
9
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
10
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
11
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
12
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
13
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
14
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
15
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
16
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
17
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
18
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
19
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
20
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत

दोनदा अहवाल देवूनही शेतकरी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:28 IST

बारुळ व उस्माननगर मंडळात गत नऊ महिन्यांपूर्वी ढगफुटी होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. यातील नुकसानग्रस्तांना मात्र अद्यापपर्यंत शासकीय आर्थिक मदत मिळाली नाही.

ठळक मुद्देबारुळ- उस्माननगर मंडळ नऊ महिन्यांपूर्वीची ढगफुटीआधी चुकीचा नंतर खरा अहवाल

बारुळ : बारुळ व उस्माननगर मंडळात गत नऊ महिन्यांपूर्वी ढगफुटी होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. यातील नुकसानग्रस्तांना मात्र अद्यापपर्यंत शासकीय आर्थिक मदत मिळाली नाही. सुरुवातीला तर प्रशासनाने नुकसान झालेच नसल्याचा 'निरंक' अहवाल तयार केला होता. 'लोकमत' ने तालुका प्रशासनाच्या या अक्षम्य कारभाराबाबत वृत्त प्रकाशित केल्यानतर पुन्हा दुसरा अहवाल तयार केला मात्र अद्यापपर्यंत नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित आहेत.कंधार तालुक्यातील बारुळ व उस्माननगर महसूल मंडळात जून २०१८ मध्ये मुसळधार पाऊस झाला होता. तीन दिवस झालेल्या पावसानंतर २३ जून रोजी मध्यरात्री सर्वजण झोपेत असताना अक्षरश: ढगफुटी झाली. अचानक झालेल्या प्रचंड पावसामुळे या दोन्ही महसूल मंडळातील जवळपास सर्वच गावांतील शेती खरडून गेली. उभी पिके आडवी पडली. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील संसारोपयोगी साहित्याची नासधूस झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. त्यावेळी प्रशासकीयस्तरावर बारुळ मंडळात १४० व उस्माननगर मंडळात ११० मी.मी.पावसाची नोंदही झाली होती.या घटनेनंतर तालुक्यातील आजी-माजी सर्वच पुढाऱ्यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देवून पाहणी केली. अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगत तात्काळ पंचनामे करण्यास सांगून नुकसान भरपाई तात्काळ मिळून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पुढाऱ्यांनी त्यावेळी दिले होते.तहसीलदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले. प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही पंचनामा करणाºया संबंधित कर्मचाºयांनी मात्र नुकसान झाले नसल्याचे सांगत सुरुवातीला निरंक अहवाल सादर केला होता.तालुका प्रशासनाच्या या चुकीच्या अहवालामुळे नुकसानग्रस्तांच्या हाती 'भोपळा' मिळण्याची भीती 'लोकमत' ने व्यक्त केल्यानंतर वरिष्ठ अधिका-यांनी याची दखल घेतली. यानंतर जागे झालेल्या तालुका प्रशासनाने नुकसान झाल्याचा दुसरा अचूक अहवाल तयार करून जिल्हाधिका-यांकडे पाठविला. त्यासही तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे.ढगफुटीची घटना होऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला असूनही अतिवृष्टीग्रस्त अजूनही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यांना आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यामुळे या कारभाराबद्दल नुकसानग्रस्तांमधून रोष व्यक्त केला जात आहे.‘त्या’ कर्मचा-यांवर कारवाई कधी होणार?ढगफुटीच्या घटनेत प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. वरिष्ठ अधिका-यांनीही आपल्या डोळ्यांनी हे दृश्य पाहिले होते. तहसीलदारांच्या आदेशानंतर पंचनामा करण्यासाठी त्या- त्या भागाचे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांची नेमणूक करण्यात आली होती.सर्व काही वाहून गेले असताना त्या संबंधित कर्मचा-यांनी पंचनामा करून नुकसान झाले नसल्याचा निरंक अहवाल तहसील कार्यालयात सादर केला होता. चुकीचा अहवाल सादर करणा-या त्या कर्मचा-यांवर मात्र कसलीच कार्यवाही प्रशासना- कडून करण्यात आलेली नाही.

बारुळ येथे झालेल्या ढगफुटीचा प्रशासनाने खेळ केला. आधी ढगफुटी नाही म्हणून नुकसान निरंक दाखविले होते.‘लोकमत’ने आवाज उठविला की लगेच नुकसान झालेले दाखविले .या ढगफुटीला आज आठ ते नऊ महिन्यांचा काळ झाला.शेतक-यांचे शेतीचे,नागरिकांचे घरांचे नुकसान होऊनही नुकसान भपाईसाठी रस्त्यावर उतरण्याची वाट शासन बघत आहे का? - मारोती पा.मजरे, शेतकरी बारुळ.बारुळ येथील ढगफुटीचा नुकसान भरपाईचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. येत्या एका महिन्यात नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे -उत्तम जोशी (वरिष्ठ लिपिक), नैसर्गिक अपत्ती व्यवस्थापन तहसील कार्यालय कंधार.

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडFarmerशेतकरी