शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दोनदा अहवाल देवूनही शेतकरी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:28 IST

बारुळ व उस्माननगर मंडळात गत नऊ महिन्यांपूर्वी ढगफुटी होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. यातील नुकसानग्रस्तांना मात्र अद्यापपर्यंत शासकीय आर्थिक मदत मिळाली नाही.

ठळक मुद्देबारुळ- उस्माननगर मंडळ नऊ महिन्यांपूर्वीची ढगफुटीआधी चुकीचा नंतर खरा अहवाल

बारुळ : बारुळ व उस्माननगर मंडळात गत नऊ महिन्यांपूर्वी ढगफुटी होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. यातील नुकसानग्रस्तांना मात्र अद्यापपर्यंत शासकीय आर्थिक मदत मिळाली नाही. सुरुवातीला तर प्रशासनाने नुकसान झालेच नसल्याचा 'निरंक' अहवाल तयार केला होता. 'लोकमत' ने तालुका प्रशासनाच्या या अक्षम्य कारभाराबाबत वृत्त प्रकाशित केल्यानतर पुन्हा दुसरा अहवाल तयार केला मात्र अद्यापपर्यंत नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित आहेत.कंधार तालुक्यातील बारुळ व उस्माननगर महसूल मंडळात जून २०१८ मध्ये मुसळधार पाऊस झाला होता. तीन दिवस झालेल्या पावसानंतर २३ जून रोजी मध्यरात्री सर्वजण झोपेत असताना अक्षरश: ढगफुटी झाली. अचानक झालेल्या प्रचंड पावसामुळे या दोन्ही महसूल मंडळातील जवळपास सर्वच गावांतील शेती खरडून गेली. उभी पिके आडवी पडली. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील संसारोपयोगी साहित्याची नासधूस झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. त्यावेळी प्रशासकीयस्तरावर बारुळ मंडळात १४० व उस्माननगर मंडळात ११० मी.मी.पावसाची नोंदही झाली होती.या घटनेनंतर तालुक्यातील आजी-माजी सर्वच पुढाऱ्यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देवून पाहणी केली. अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगत तात्काळ पंचनामे करण्यास सांगून नुकसान भरपाई तात्काळ मिळून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पुढाऱ्यांनी त्यावेळी दिले होते.तहसीलदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले. प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही पंचनामा करणाºया संबंधित कर्मचाºयांनी मात्र नुकसान झाले नसल्याचे सांगत सुरुवातीला निरंक अहवाल सादर केला होता.तालुका प्रशासनाच्या या चुकीच्या अहवालामुळे नुकसानग्रस्तांच्या हाती 'भोपळा' मिळण्याची भीती 'लोकमत' ने व्यक्त केल्यानंतर वरिष्ठ अधिका-यांनी याची दखल घेतली. यानंतर जागे झालेल्या तालुका प्रशासनाने नुकसान झाल्याचा दुसरा अचूक अहवाल तयार करून जिल्हाधिका-यांकडे पाठविला. त्यासही तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे.ढगफुटीची घटना होऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला असूनही अतिवृष्टीग्रस्त अजूनही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यांना आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यामुळे या कारभाराबद्दल नुकसानग्रस्तांमधून रोष व्यक्त केला जात आहे.‘त्या’ कर्मचा-यांवर कारवाई कधी होणार?ढगफुटीच्या घटनेत प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. वरिष्ठ अधिका-यांनीही आपल्या डोळ्यांनी हे दृश्य पाहिले होते. तहसीलदारांच्या आदेशानंतर पंचनामा करण्यासाठी त्या- त्या भागाचे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांची नेमणूक करण्यात आली होती.सर्व काही वाहून गेले असताना त्या संबंधित कर्मचा-यांनी पंचनामा करून नुकसान झाले नसल्याचा निरंक अहवाल तहसील कार्यालयात सादर केला होता. चुकीचा अहवाल सादर करणा-या त्या कर्मचा-यांवर मात्र कसलीच कार्यवाही प्रशासना- कडून करण्यात आलेली नाही.

बारुळ येथे झालेल्या ढगफुटीचा प्रशासनाने खेळ केला. आधी ढगफुटी नाही म्हणून नुकसान निरंक दाखविले होते.‘लोकमत’ने आवाज उठविला की लगेच नुकसान झालेले दाखविले .या ढगफुटीला आज आठ ते नऊ महिन्यांचा काळ झाला.शेतक-यांचे शेतीचे,नागरिकांचे घरांचे नुकसान होऊनही नुकसान भपाईसाठी रस्त्यावर उतरण्याची वाट शासन बघत आहे का? - मारोती पा.मजरे, शेतकरी बारुळ.बारुळ येथील ढगफुटीचा नुकसान भरपाईचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. येत्या एका महिन्यात नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे -उत्तम जोशी (वरिष्ठ लिपिक), नैसर्गिक अपत्ती व्यवस्थापन तहसील कार्यालय कंधार.

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडFarmerशेतकरी