शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरी-रेल्वे फायद्यात; ४०५ किसान रेल्वेतून देशभरात पोहचला १.२७ लाख टन कृषी माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 15:10 IST

kisan railway: नांदेड रेल्वे विभागास ५८.५७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.

नांदेड : नांदेडरेल्वे विभागात किसान रेल्वे सुरू होऊन ५ जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात नांदेड विभागातून देशातील विविध भागांत ४०५ किसान रेल्वे धावल्या. या माध्यमातून १ लाख २६ हजार ९२६ टन कृषी माल देशाच्या विविध भागांत पोहोचविण्यात आला. ज्यात कांदा, टरबूज, टोमॅटो आणि द्राक्षांचा समावेश आहे. यातून नांदेड रेल्वे विभागास ५८.५७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.

५ जानेवारी २०२१ रोजी नांदेड विभागातून पहिली रेल्वे धावली होती. वर्षपूर्तीनिमित्त विभागीय रेल्वे कार्यालयात विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदरसिंग आणि टीमने केक कापून आनंद व्यक्त केला. यावेळी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक के. नागपूषणराव, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक जय पाटील, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक ए. श्रीधर, वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक उदयनाथ कोटला, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता प्रशांतकुमार, वरिष्ठ विभागीय रेल्वे कार्मिक व्यवस्थापक जयशंकर चौहाण, विभागीय अभियंता रितेशकुमार आदी उपस्थित होते.

किसान रेल्वेला मालवाहतूक भाड्यात ५० टक्के सूट मिळत असल्याबद्दल शेतकरी मित्रांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपिदरसिंग यांनी यावेळी केले. या रेल्वेची वैशिष्टये म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात. साधारणत: ५० किलोमीटर प्रती तास वेगाने धावतात. त्यामुळे शेतीमाल वेळेवर पोहोचतो. शेतकरी यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स टाॅप टू टोटल’ याअंतर्गत किसान रेल्वे गाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वेला वाहतुकीसाठी ५०टक्के दर सवलत देण्यात आली आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेFarmerशेतकरीNandedनांदेड