शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

बारावीला चार वेळा नापास पण तो हरला नाही; जिद्दी शेतकरी पुत्राचा MPSC मध्ये यशाचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 11:38 IST

बारावी परीक्षेत पेपर अवघड गेला, नापास झाले तर अनेक तरुण-तरुणी टोकाचा निर्णय घेतात त्यांच्यासाठी ही घटना प्रेरणा देणारी आहे.

- मारोती चिलपिपरे कंधार (नांदेड) : अखंड मेहनत आणि जिद्दीने सगळं काही साध्य करता येतं असं म्हणतात. सातत्य पूर्ण मेहनत केली असता कोणतंही अपयश आलं तरी ते आपल्या स्वप्नांना पूर्ण होण्यापासून रोखू शकत नाही. अपयश आलं म्हणून हार मानून न जाता पुन्हा हिमतीने उभं राहून तो प्रवास करावा लागतो तेव्हाच यश हाती लागतं. आज आपण अशाच एका हरहुन्नरी तरुणाची प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत, ज्याने बारावीमध्ये चार वेळा नापास होऊनसुद्धा हार न मानता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC)  परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गुंटूर येथील शेतकरी पुत्र आकाश सुरेश शिंदे हा बारावीला सलग चार वेळा नापास झाला. मात्र, हार न मानता तो परीक्षा देत राहिला. पाचव्या वेळेस त्याने बारावी उत्तीर्ण केली. मोठ्या कष्टाने बारावी पास झालेल्या आकाश आता आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करायचं यासाठी झपाटून गेला. अपयश पचवून यश मिळालेल्या आकाशने MPSC मार्फत सरकारी नोकरी मिळवायचा चंग बांधला. त्यासाठी आकाशने २०१७ पासून स्पर्धा परीक्षेचे तयारी सुरू केली. तसेच मुक्त विद्यापीठातून पदवीसाठी प्रवेश घेतला.

दरम्यान, २०१९ मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आकाशची लढाई सुरू झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आकाशने दिवसरात्र एक केला. मागील अपयश विसरून झोकून देऊन अभ्यास करण्याचा सल्ला आई वडिलांनी देत मोठी हिंमत आकाशला दिली. दरम्यान, आकाश स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे गाठले येथेच त्याने जीव तोडून मेहनत केली. आखरे आकाशची जिद्द फळाला आली अन् त्याची एमपीएससी च्या माध्यमातून महसूल सहाय्यक पदी निवड झाली. आकाशने यश संपादन केल्यानंतर ही घटना न केवळ त्याच्या कुटुंबासाठी तर संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. बारावी परीक्षेत पेपर अवघड गेला, नापास झाले तर अनेक तरुण-तरुणी टोकाचा निर्णय घेतात त्यांच्यासाठी ही घटना प्रेरणा देणारी आहे.

गावात जल्लोषात स्वागतप्रत्येकाची अनेक स्वप्न असतात. पण हि स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मेहनतीची जोड लागते. याच मेहनतीच्या जोरावर गुंटूर गावातील आकाश शिंदे याने एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. या परिक्षेसाठी आकाशने अखंड मेहनत घेतली. स्वत:ला अनेक गोष्टींपासून लांब ठेवले. अखेर आकाशच्या पदरी यश पडले. सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करून गावी पोहोचताच आकाशचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. आई-वडिलांनी मुलाच्या यशाचा आनंद गावभर साजरा केला.

यशासाठी संयम हवादहावी-बारावीत एखादा गुण इकडे तिकडे झाला तरी मुलं थेट आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचताना दिसतात. पण दहावी-बारावी ही आयुष्याची अंतिम परीक्षा नव्हे. मी बारावीत एक नव्हे, चार वेळा सपशेल नापास झालो. पण जिद्द सोडली नाही त्यानंतर पाचव्या प्रयत्नातून बारावी पास झालो. २०१७ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यानंतर आता यश मिळाले. तुम्ही हि स्वप्न पाहा. पण त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनतीची जोड द्या. त्यासोबत ते स्वप्न पुर्ण होण्याची वाट पाहण्यासाठी तुमच्याकडे तसाच संयम देखील हवा. दहावी-बारावीला नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्दीने मेहनत घेतली तर यश नक्की मिळेल.- आकाश सुरेश शिंदे, गुंटूर

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाNandedनांदेडFarmerशेतकरी