शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

पार्डी नदीला इसापूर धरणाचे पाणी आल्याने उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 01:09 IST

वाहणारी पार्डीची नदी गेल्या काही वर्षांपासून कोरडी पडल्याने नदीकाठावर असलेल्या गावांतील विहीर ,बोअर कोरडे पडले होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासापार्डी, शेणी, देळूब, कामठा, कोंढा, बामणीचा पाणीप्रश्न सुटला

पार्डी : बारा महिने तुडुंब वाहणारी पार्डीची नदी गेल्या काही वर्षांपासून कोरडी पडल्याने नदीकाठावर असलेल्या गावांतील विहीर ,बोअर कोरडे पडले होते. परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा चिंताजनक प्रश्न उभा राहिला होता. यासंदर्भात पार्डी व देळूब येथील नागरिकांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे नदीला पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर दुस-याच दिवशी पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. दरम्यान, हे पाणी पार्डी नदीपर्यंत पोहोचल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी नदी, नाल्याशेजारी ग्रामपंचायतकडून सार्वजनिक विहीर बांधण्यात आले होते. परंतु, नदीला पाणी नसल्याने नळाला पाणी येत नव्हते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. या भागातील विहीर बोअरने तळ गाठण्यास सुरुवात केल्याने विहिरीत पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नव्हते.दरम्यान, पार्डी गावाच्या नदीपात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले असून नदी काठावरील पार्डी, शेणी, देळूब, कामठा बु, कोंढा, देळूब बु , बामणी, शेलगाव बु , शेलगाव खु , पिंपळगाव, सांगवी, मेंढला, निजामपूरवाडी या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. पार्डी गावालगत जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत गावतळ्याचे काम करण्यात आले. या तळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवण झाली आहे. पार्डी परिसरातील गावांना या तळ्याचा फायदा होणार आहे.तीन वर्षांपूर्वी चार बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाºयांनाही या पाण्याचा आता फायदा होणार असल्याने पार्डीसह परिसरातील गावांतील शेतकरी समाधान व्यक्त करीत असून, पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याची गरज आहे़शेतक-यांची एकजुटइसापूरच्या पाण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकºयांनी एकजुट दाखवित पैनगंगा नदीपात्रात अनेक दिवस आंदोलन केले होते़ त्यात आता दोन्ही विभागातील नऊ गावांना पाणी पोहोचलेच नसल्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत़ दोन्ही विभागाच्या शेतकºयांनी एकजुट दाखवित तहसीलवर धडक दिली़ किमान पिण्याच्या पाण्यासाठी तरी प्रशासनाने पाणी देण्याची आवश्यकता व्यक्त होत होती़नऊ गावापर्यंत पाणी पोहोचलेच नाहीविदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील ९० गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर शेतक-यांनी १५ दिवस पैनगंगा नदीपात्रात आंदोलन केले़ त्यानंतर इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडण्यात आले़ परंतु, हे पाणी नऊ गावांपर्यंत पोहोचलेच नाही़ इसापूरचे पैनगंगा नदीत सोडलेले पाणी विदर्भातील पिंपळगाव, पेंधा, लिंगी, मुरली, सहस्त्रकुंड तांडा तर मराठवाड्यातील कौठा, धानोरा, वारंगटाकळी, मंगरुळ या नऊ गावांत पोहोचलेच नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या नऊ गावांतील ग्रामस्थांनी उमरखेड तहसील कार्यालयावर धडक मारली होती़ यावेळी माजी आ़ विजयराव खडसे यांनी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यकारी अभियंता व आ़राजेंद्र नजरधने यांच्याशी संवाद साधून पाणी या गावापर्यंत पोहोचेपर्यंत ते बंद करण्यात येवू नये अशी मागणी केली़ यावेळी रोहिदास राठोड, प्रकाश वाघ मुरली, देवराव गोफणे, रमेश नाईक, युवराज जाधव, बळीराम देवकत्ते, राजू पाटील भोयर, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीFarmerशेतकरीwater scarcityपाणी टंचाई