शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचे आमिष दाखविणारी टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:39 IST

नांदेड शहरात अकरावी-बारावीचे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत असून नॅशनल इलिजीबिलीटी इन्ट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षा ५ मे रोजी होणार आहे़ या परीक्षेत नकारात्मक गुणपद्धती असल्यामुळे विद्यार्थी अचूक प्रश्न सोडविण्यावर अधिक भर देतात़

ठळक मुद्देबळी न पडण्याचे आवाहन काही पालकांशी साधला संपर्क

नांदेड : नांदेड शहरात अकरावी-बारावीचे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत असून नॅशनल इलिजीबिलीटी इन्ट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षा ५ मे रोजी होणार आहे़ या परीक्षेत नकारात्मक गुणपद्धती असल्यामुळे विद्यार्थी अचूक प्रश्न सोडविण्यावर अधिक भर देतात़ परंतु, अनावधानाने प्रश्न चुकीचा सोडविला गेल्यास तो प्रश्न बरोबर करुन गुण वाढवून देतो असे आमिष दाखविणारी टोळी नांदेडात सक्रिय झाली आहे़ काही पालकांशीही त्यांनी संपर्क साधल्याची माहिती आली आहे़नांदेड शहर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक हब म्हणून नावारुपास येत आहे़ राज्यभरातून या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत़ नीट, जेईई यासह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांची संख्या नांदेडात लक्षणीय आहे़ त्यात देशभरात रविवार, ५ मे रोजी नीट परीक्षा होत आहे़नीट परीक्षा देवून डॉक्टर होण्याचे अनेकांचे स्वप्न असते़ त्यासाठी विद्यार्थी आणि पालक दोघेही प्रयत्न करीत असतात़नीट परीक्षेत अचूक प्रश्न सोडविण्यावर विद्यार्थ्यांचा अधिक भर असतो़ प्रश्न चुकीचा सोडविल्यास नकारात्मक गुणांकन पद्धती असल्यामुळे विद्यार्थी शक्यतो प्रश्न चुकीचा सोडविला जाणार नाही़, याची खबरदारी घेतात़ चुकीचा प्रश्न सोडविल्यास प्रत्येकी एक गुण कमी होतो़ त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो़परंतु अनावधानाने विद्यार्थ्यांकडून असा प्रश्न चुकीचा सोडविला गेल्यास तर तो आम्ही बरोबर करुन देतो़ तसेच त्याचे गुणही वाढवून देतो असे आमिष काही मंडळी दाखवित आहेत़ त्याचबरोबर एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचेही सांगण्यात येत आहे़ त्यासाठी पालकांकडून पैसे उकळणारी टोळी सध्या सक्रिय झाली आहे़ या टोळीने काही पालकांशी संपर्क साधल्याची माहिती हाती आली आहे़ परंतु पोलीस ठाण्यात मात्र याबाबत अद्याप तरी पालकांनी तक्रार दाखल केली नाही़त्यामुळे अशा टोळीपासून पालकांनी सावध राहण्याची गरज आहे़ अशा टोळीने संपर्क साधल्यास पोलिसांना त्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे़आमिषाला बळी पडू नकाएकदा सोडविलेला प्रश्न पुन्हा दुुरुस्त करण्याची कोणतीही मुभा नीट परीक्षेत नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोडविलेला प्रश्न सोडवितेवेळेसच अचूक सोडविण्याचा प्रयत्न करावा़ सोडविलेला प्रश्न दुरुस्त करुन देण्याचे कुणी आमिष दाखवित असल्यास त्याकडे विद्यार्थी व पालकांनी दुर्लक्ष करावे़ त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे, ओमएआर शीट, पैसे जमा करु नये असे आवाहन ब्रॉडवेचे संचालक गणेश तिडके यांनी केले़

टॅग्स :Nandedनांदेडexamपरीक्षाStudentविद्यार्थी