बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST2020-12-30T04:23:52+5:302020-12-30T04:23:52+5:30
उमरी तालुक्यातील सिंधी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असून त्यामुळे पृथ्वीतलावर ...

बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा
उमरी तालुक्यातील सिंधी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असून त्यामुळे पृथ्वीतलावर मानव जात नष्ट होण्याची भीती निर्माण झाल्याने वनस्पतींचे संवर्धन हे अत्यंत आवश्यक झाले. कसल्याच खर्चाविना अमाप उत्पादन देणारा बांबू लागवडीचा उत्तम पर्याय असून वातावरणातील ३० टक्के कार्बन घेऊन ३२० किलो ऑक्सिजन बांबू बाहेर सोडते. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बांबू लागवडीचा पर्याय पुढे येत आहे. अत्यल्प लागवड खर्च व कमी पावसात अवघ्या तीन वर्षांत तब्बल ६० फूट वाढ होणाऱ्या या बांबूची एका एकरमध्ये २२० झाडे तयार होतात. बांबूपासून इंधनाचा पर्याय असलेले इथेनॉल त्यापासून डिझेल, पेट्रोल, सीएनजी, कागद, कापड, फर्निचर आदी अनेक वस्तूंची निर्मिती होते. आता प्लास्टिक बंद होणार असल्याने बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे . लागवडीसाठी कसलाच खर्च नसलेले बांबू हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत किफायतशीर व अधिक पैसा मिळवून देणारे उत्पादन ठरणार आहे. बांबू लागवडीसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी पाशा पटेल यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव पाटील सिंधीकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे, शिरीषराव देशमुख गोरठेकर, पांडुरंग देशमुख गोरठेकर, सुभाष पाटील कोळगावकर, प्रल्हाद पाटील ढगे, रावसाहेब शिंदे, मल्लिकार्जुन चंदापुरे, साहेबराव शिंदे, सतीश देशमुख तळेगावकर आदींसह परिसरातील असंख्य शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते.