शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 10:36 IST

एमआयएमची उमेदवारी काँग्रेसचे टेन्शन वाढविणारी असून, आता तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 नांदेड : नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना गुरुवारी  उमेदवारी जाहीर केल्यानंतर काही तासांतच ‘एमआयएम’नेदेखील ही पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा केली. ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील हे पोटनिवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. एमआयएमची उमेदवारी काँग्रेसचे टेन्शन वाढविणारी असून, आता तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात साेेडून भाजपचे कमळ हाती धरले. त्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर झाले होते; परंतु काँग्रेसने माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या रूपाने अनुभवी चेहरा पुढे करत त्यांना ताकद देण्याचे काम केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चव्हाणांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत पन्नास हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला. त्यामुळे मरगळलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली होती; मात्र दुर्दैवाने खासदार वसंतराव चव्हाण यांचे २६ ऑगस्ट रोजी निधन झाले. तद्नंतर आता नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. 

काँग्रेसने गुरुवारी सकाळी दिवंगत वसंतराव यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर सायंकाळी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत उभे राहणार असल्याची घोषणा केली. 

भाजपने मात्र, अद्याप ही पोटनिवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. असे असले तरी भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी खासदार प्रतापराव चिखलीकर या दोघांची नावे चर्चेत आहेत.  

२०१९ मध्ये मतविभाजन ठरले होते निर्णायकमोदी लाटेत २०१४ मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव करणाऱ्या अशोक चव्हाण यांना २०१९ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यांना ४ लाख ८६ हजार ८०६ मते मिळाली होती. तर चव्हाणांना ४ लाख ४६ हजार ६५८ मते मिळाली होती.

एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांनी १ लाख ६६ हजार १९६ मते घेतली होती. या ठिकाणी झालेल्या सेक्युलर मतांच्या विभाजनामुळे अशोक चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 

वंचित आणि जरांगे फॅक्टर निर्णायक ठरणार का?- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास लाखांचा पल्लादेखील पार करता आला नव्हता. तसेच, मराठा आरक्षण आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या जरांगे फॅक्टरमुळे काँग्रेसला यश मिळविणे सोपे झाले होते. - मात्र, आता पोटनिवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारीने काँग्रेसने टेन्शन वाढले असून वंचित आघाडी काय भूमिका घेणार? तसेच, जरांगे फॅक्टरही आता किती निर्णायक ठरेल याचीही उत्सुकता आहे.  

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक 2024Nandedनांदेड