शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

नगरपालिकेतील टोकाच्या राजकारणामुळे कंधार शहराच्या विकासाचा वेग खुंटला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:41 PM

विकासासाठी प्रत्येक जण आपआपले राजकीय गणित मांडू लागल्याने मोठी कोंडी निर्माण झाली आहे़ त्यामुळे शहराची अवस्था विचित्र होत असल्याचे चित्र आहे़

ठळक मुद्देनगरपालिकेत नळगे गटाकडे नगराध्यक्ष दिले तर आ़ चिखलीकर गटाचे १० नगरसेवक आहेतराज्य शासनाने २०१६ अखेरपर्यंतचा अखर्चिक निधी परत घेण्याची हालचाल सुरू केली आहे

कंधार ( नांदेड ) : शहराचा कायापालट करून सुंदर शहराचे स्वप्न मृगजळ ठरत आहे. आ. प्रताप पा. चिखलीकर व माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांच्यातील टोकाचे राजकारण विकासाचा खेळखंडोबा करणारे ठरत आहे, अशी भावना शहरात पसरल्याने विकासाचा वेग कधी वाढणार, असा सवाल केला जात आहे़

कंधार ऩप़ निवडणूक अतिशय अटीतटीची झाली़ मतदारांनी आ़ प्रताप पाटील चिखलीकर व माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांना नाराज केले नाही़ विकासासाठी सतर्क असणा-या नळगे गटाकडे नगराध्यक्ष दिले़ तर आ. चिखलीकर समर्थक १० जण निवडून दिले़ काँग्रेस विरूद्ध शिवसेना अशी लढत न राहता वैेयक्तिक राजकीय अस्तित्वाच्या लढाईचे स्वरूप या निवडणुकीला आले होते. विकासासाठी प्रत्येक जण आपआपले राजकीय गणित मांडू लागल्याने मोठी कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराची अवस्था विचित्र होत असल्याचे चित्र आहे़

व्यापारी गाळे, महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक रस्ता, मुख्य रस्त्यावरील आठवडी बाजार वाहतुकीची बेशिस्त, पाणीपुरवठा इ. प्रश्नांची उकल करण्यास राजकारण नडत आहे. दोन्ही नेतृत्वाला एकत्रित आणणारा राजकीय दुवा नाही़ जो होता तो एक बाजू धरल्याने तशी शक्यता आता दिसत नाही़ विकास करण्याच्या आश्वासनाने आता नगरसेवकांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे. आगामी राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती अनेक नगरसेवकांत बळावत चालली आहे. तसेच शहरवासियांना विकासाचे राजकारण असेच होणार का? असा प्रश्न पडला आहे़विकासासाठी निधी मिळत नसल्याची ओरड सातत्याने होत असते़, परंतु निधी असताना विकास साधता येत नसल्यास दोष कोणाचा, हा खरा प्रश्न आहे.

राज्य शासनाने २०१६ अखेरपर्यंतचा अखर्चिक निधी परत घेण्याची हालचाल सुरू केली असताना टोकाचे राजकारण विकासकामाच्या आड येणे, ही शहरवासियांना खटकणारी बाब ठरत आहे़ सर्वांगसुंदर शहर विकास टोकदार राजकारणात अडकला आहे़ आ़प्रताप पाटील चिखलीकरांना मतदारसंघाकडे लक्ष पुरवून २०१९ ची निवडणूक लढवायची आहे़ शहर विकासाचे मॉडेल विधानसभा मतदारसंघात रुजविण्यासाठी उपयोगात आणण्याची गरज आहे. त्यासाठी येथील कार्यकर्त्यांसह प्रमुख पदाधिका-यांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न आ. चिखलीकरांनी करणे गरजेच आहे़ अरविंद  नळगे यांनीही विकासासाठी एक पाऊल मागे घेणे निकडीचे आहे़ अशी राजकीय वर्तुळात चर्चा झडत आहे़ दोन्ही नेत्यांनी एकत्रित न येता टोकाची भूमिका कायम ठेवल्यास आगामी काळात राजकीय किंमत चुकवावी लागण्याचा धोका असून शहर विकासाचा वेगही दिवसेंदिवस कमी होण्याची चिन्हे आहेत. 

व्यापारी गाळे, महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक रस्ता, मुख्य रस्त्यावरील आठवडी बाजार वाहतुकीची बेशिस्त, पाणीपुरवठा आदी प्रश्नांची उकल करण्यास राजकारण नडत आहे़ दोन्ही नेतृत्वाला एकत्रित आणणारा राजकीय दुवा नाही. जो होता तो एक बाजू धरल्याने तशी शक्यता आता दिसत नाही़ विकास करण्याच्या आश्वासनाने आता नगरसेवकांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे़ आगामी राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती अनेक नगरसेवकांत बळावत चालली आहे़ तसेच शहरवासियांना विकासाचे राजकारण असेच होणार का, असा प्रश्न पडला आहे.