शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

नांदेड जिल्ह्यात १ हजार १६८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:46 IST

वर्ष २०१७-२०१८ च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आलेल्या कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव या १० तालुक्यांतील १ हजार १६८ गावांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या गावांना विविध सवलती लागू केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वर्ष २०१७-२०१८ च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आलेल्या कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव या १० तालुक्यांतील १ हजार १६८ गावांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या गावांना विविध सवलती लागू केल्या आहेत.महसूल व वन विभागाचा शासन निर्णय २८ फेब्रुवारी २०१८ अन्वये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात खरीप पिकांची हंगामी पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षाही कमी आहे. यामध्ये कंधार तालुक्यातील- १२६, लोहा- १२७, हदगाव- १४५, हिमायतनगर- ६४, किनवट- १९१, माहूर- ९२, देगलूर- १०८, मुखेड- १३५, बिलोली- ९१ तर नायगाव तालुक्यांतील ८९ याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण १ हजार १६८ गावांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने गावांना जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाची पुनर्रचना, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी यासह रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल. त्याचप्रमाणे आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर तसेच टंचाईग्रस्त शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करणे या सवलतींचा समावेश आहे.दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांतील गावांतील खातेदारांना टंचाईसंदर्भात शासनाच्या प्रचलीत धोरणानुसार अनुज्ञेय सवलती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिले आहेत.

टॅग्स :WaterपाणीcollectorतहसीलदारMONEYपैसाFarmerशेतकरीTaxकर