शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Drought In Marathwada : मुखेड तालुक्याच्या दारावर दुष्काळाची थाप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 12:43 IST

दुष्काळवाडा : मुखेड तालुक्यात २०१२ ते २०१८ या काळात ५१ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. तालुका चार वर्षापासून दुष्काळाने होरपळत आहे.

- दत्तात्रय कांबळे, मुखेड, जि. नांदेड

दुर्गम आणि डोंगराळ तालुका अशीच मुखेडची ओळख. अशी भौगोलिक पार्श्वभूमी लाभलेल्या या तालुक्याच्या अडचणीत पावसाने गेल्या चार वर्षांपासून आणखी भरच घातली आहे. यंदाही हे चित्र फारस समाधानकारक नाही. जेमतेम पाऊस. त्यामुळे नदी, नाल्यांसह धरणांत शेवटपर्यंत पाणी आलेच नाही. कसेबसे खरीप घेतल्यानंतर रबीचा पेराही घसरला. पिण्याच्या पाण्याच्या अडचणीबरोबर जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न आ वासून शेतकऱ्यांसमोर उभा आहे. पावसाने पाठ फिरवलेल्या मुखेड तालुक्याच्या दारावर दुष्काळाने थाप दिली आहे. 

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वच तलावात ऐन पावसाळ्यात दहा टक्याच्या आत जलसाठा होता़ त्यामुळे  आगामी काळात मुखेड तालुक्यावर पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण होणार आहे.  खरीप पिकांबरोबर रबी पिकावर मोठा परिणाम झाला आहे़  तालुक्यात चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून आॅक्टोबर महिन्यातच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्यात २०१२ ते २०१८ या काळात ५१ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. तालुका चार वर्षापासून दुष्काळाने होरपळत आहे.

तालुक्यात फक्त ५८ टक्के पाऊस झाला़  या पावसात खंड पडल्याने पिके तगली, पण नदी, तलाव, विहिरीत पाणीसाठा झाला नाही. आतापासूनच उन्हाळा सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. काही गावांतून पंचायत समितीला टँकरची मागणी होत आहे. चारा-पाण्याच्या प्रश्नाबरोबरच तालुक्यात मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या शहरांकडे तसेच ऊसतोड काम, विटभट्टी कामासाठी स्थलांतर करू लागले आहे. 

सोयाबीन, कापूस, ज्वारी, तुर, मूग, उडीद या खरीप पिकांवर पावसाआभावी व  रोगांच्या प्रादूर्भावामुळे शेतकऱ्यांच्या शेतात खर्च केलेले लागवडसुध्दा निघत नाही तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, मुग, उडीद, अत्यल्प उत्पादनामुळे शेतातून  बाहेरच काढले नाही.  

टंचाईबाबत बैठक तालुक्यात उद्भवणारी पाणीटंचाईच्या बाबतीत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पाणीटंचाई आराखडा आणि नियोजनसंदर्भात चर्चा  करण्यात येईल.  तसेच पाणीटंचाईचा प्रश्न हाताळण्यासाठी तसेच विविध उपाययोजना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.- सी.एल.रामोड, गटविकास अधिकारी पं.स.मुखेड

बळीराजा काय म्हणतो?- तालुक्यात शेतकरी खरीप आणि रबी या दोन्ही हंगामात पिके घेतात. पण यंदा पाऊस कमी झाला. त्यामुळे खरीप रबी दोन्ही हंगामातील उत्पन्नावर परिणाम झाला. तलाव थोड पाणी आले पण, पिण्यासाठी राखून ठेवत वीज खंडित केल्यामुळे रबीची पिकेही कमी झाली. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने मुखेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा.  - शिवशंकर पाटील कलंबरकर 

- मुखेड तालुका हा डोंगराळ तालुका असून, माळरान जमिनीच जास्त आहेत़ पाणी साठवण्याचे मोठे प्रकल्प नाहीत. त्यामुळे मागील चार वर्षापासून पाऊस अत्यल्प व कमी उत्पादन यामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. तर खरीपही गेले, रबीही गेली. यामुळे चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़  - नारायण चमकुरे, सावरगाव पी.

- माझी कोरडवाहू शेती असून पूर्वी शेतीत कामासाठी आम्ही गडी ठेवला होता. पण मागील चार ते पाच वर्षांपासून सतत दुष्काळ, नापिकी यामुळे लागवडीचा खर्चसुध्दा निघणे कठिण झाले आहे. आता मी स्वत:च शेतात काम करतो. नोकर ठेवणे परवडत नाही. अलीकडे शेतकऱ्यांना फार वाईट दिवस आलेले आहेत. चार वर्षात नदी-नाल्यांना पूर आलेला पाहिला नाही. - आण्णाराव कबीर, सावरगाव पी.  

 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी