शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नांदेड जिल्ह्यातील १४ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 17:23 IST

बिलोली, लोहा, हदगाव, किनवट, धर्माबाद आणि नायगाव तालुक्यांतील मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

नांदेड : जिल्ह्यात मुखेड, देगलूर आणि उमरी तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्यानंतर आणखी १४ मंडळांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून बिलोली, लोहा, हदगाव, किनवट, धर्माबाद आणि नायगाव तालुक्यांतील मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यात यापूर्वी १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर आणि उमरी या तीन तालुक्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला होता. राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्येही जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले होते. या कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अशा मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्याचा निर्णय ६ नोव्हेंबर रोजी राज्य शासनाने घेतला आहे.

बिलोली तालुक्यातील बिलोली, सगरोळी, कुंडलवाडी, आदमपूर, लोहा तालुक्यांतील लोहा, हदगाव तालुक्यातील मनाठा, किनवट तालुक्यातील इस्लापूर, जलधारा, शिवणी, धर्माबाद तालुक्यातील करखेली, जारीकोट आणि नायगाव तालुक्यातील कुंटूर, नरसी व मांजरम या महसुली मंडळात मंगळवारी दुष्काळ घोषित करण्यात आला. 

मुखेड, उमरी आणि देगलूर या तीन तालुक्यांसह उपरोक्त १४ मंडळांत दुष्काळ घोषित केल्याने महसूल मंडळात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या वीज कृषिपंपाची जोडणी खंडित न करणे अशा सवलती मिळणार आहेत. 

टॅग्स :droughtदुष्काळState Governmentराज्य सरकारagricultureशेतीFarmerशेतकरी