शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

नांदेड जिल्ह्यातील १४ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 17:23 IST

बिलोली, लोहा, हदगाव, किनवट, धर्माबाद आणि नायगाव तालुक्यांतील मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

नांदेड : जिल्ह्यात मुखेड, देगलूर आणि उमरी तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्यानंतर आणखी १४ मंडळांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून बिलोली, लोहा, हदगाव, किनवट, धर्माबाद आणि नायगाव तालुक्यांतील मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यात यापूर्वी १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर आणि उमरी या तीन तालुक्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला होता. राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्येही जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले होते. या कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अशा मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्याचा निर्णय ६ नोव्हेंबर रोजी राज्य शासनाने घेतला आहे.

बिलोली तालुक्यातील बिलोली, सगरोळी, कुंडलवाडी, आदमपूर, लोहा तालुक्यांतील लोहा, हदगाव तालुक्यातील मनाठा, किनवट तालुक्यातील इस्लापूर, जलधारा, शिवणी, धर्माबाद तालुक्यातील करखेली, जारीकोट आणि नायगाव तालुक्यातील कुंटूर, नरसी व मांजरम या महसुली मंडळात मंगळवारी दुष्काळ घोषित करण्यात आला. 

मुखेड, उमरी आणि देगलूर या तीन तालुक्यांसह उपरोक्त १४ मंडळांत दुष्काळ घोषित केल्याने महसूल मंडळात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या वीज कृषिपंपाची जोडणी खंडित न करणे अशा सवलती मिळणार आहेत. 

टॅग्स :droughtदुष्काळState Governmentराज्य सरकारagricultureशेतीFarmerशेतकरी