शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
4
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
5
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
6
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
7
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
8
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
9
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
10
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
11
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
12
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
14
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
15
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
16
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
17
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
18
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
19
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
20
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?

डझनभर दिग्गजांचे पक्षांतर, पण चर्चा केवळ अशोकराव चव्हाणांचीच का?

By शिवराज बिचेवार | Updated: November 14, 2024 18:24 IST

लोकसभा निवडणुकीवेळी अशोकरावांच्या पक्षांतरावर सडकून टीका करणारे आता मात्र स्वत:च दुसऱ्या पक्षाची पालखी वाहत आहेत.

नांदेड : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत माजी मंत्री, खासदार, आमदार अशा डझनावर दिग्गजांनी पक्षांतर केले आहे. काही जणांनी तर वर्ष-दोन वर्षाला पक्ष बदलले आहेत, परंतु या सर्वांमध्ये चर्चा फक्त एक वेळेस पक्ष बदललेल्या माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाणांचीच होते. 

लोकसभा निवडणुकीवेळी अशोकरावांच्या पक्षांतरावर सडकून टीका करणारे आता मात्र स्वत:च दुसऱ्या पक्षाची पालखी वाहत आहेत. परंतु, त्यांच्या पक्षांतरावर जाहीरपणे कुणीही बोलत नाही. दहा वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माधवराव किन्हाळकर यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपत प्रवेश केला होता, परंतु दहा वर्षांत पक्षाने कोणतीही महत्त्वाची जबाबदारी दिली नसल्याचे सांगून काही महिन्यांपूर्वीच त्यांनी घरवापसी केली. 

माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी, तर यंदा विक्रमी सहाव्या वेळी पक्षांतर करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, लोकस्वराज्य अशा अनेक पक्षांत ते फिरून आले. ते लोहा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शिवसेना, भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि आता शिंदे गट असे पक्षांतराचे एक वर्तुळ पूर्ण केले आहे. 

माजी खासदार भास्करराव खतगावकर हे काँग्रेसकडून तीन वेळा लोकसभेत पोहचले होते, परंतु त्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ते सूनबाई मिनल खतगावकर यांच्यासह काँग्रेसमध्ये आले होते, परंतु माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपत गेल्यानंतर लोकसभेच्या वेळी ते पुन्हा भाजपत आले. अन् आता विधानसभेला भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी सूनबाई मिनल यांच्यासह पुन्हा काँग्रेसची वाट धरली. मिनल खतगावकर सध्या नायगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आहेत. 

माजी आमदार सुभाष साबणे हे अगोदर शिवसेनेत होते. नंतर ते भाजपत गेले. भाजपकडून देगलूरची विधानसभा पोटनिवडणूक लढविली होती. त्यात पराभूत झाले. यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे परिवर्तन आघाडीचा झेंडा हाती घेतला. सध्या ते देगलूरमध्ये प्रहारचे उमेदवार आहेत. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर हे विधान परिषदेला क्रॉस वोटिंग केल्यामुळे चर्चेत आले होते. त्यानंतर अशोकरावांच्या नेतृत्वात भाजपत प्रवेश करून विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. 

किनवटचे भीमराव केराम हे अगोदर भारिप बहुजन महासंघात होते. नंतर अपक्ष म्हणूनही निवडणूक लढविली होती. सध्या भाजपचे आमदार आहेत. नांदेड दक्षिणमध्ये भाजपचे बंडखोर दिलीप कंदकुर्ते हे अगोदर काँग्रेसमध्ये होते. नंतर भाजपत आल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून बंडखोरी करीत ते रिंगणात उतरले होते, परंतु बंडखोरीनंतरही भाजपने त्यांच्यावर महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी बंडाचे निशाण फडकविले असून, पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला पक्षांतराचा मोठा इतिसहा आहे, परंतु या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चा ही अशोकरावांच्या पक्षांतराचीच केली जात आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर अलीकडच्या काळात पक्षातील काही जणांकडून अशोकरावांची अडवणूक करण्याचे षडयंत्र सुरू होते. त्यामुळे पक्षांतर्गत संघर्षाला कंटाळून बाहेर पडल्याचे अशोकरावांनी अनेकवेळा स्पष्ट केले आहे.

सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहणजिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरांचाही बोलबाला आहे. सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. त्यात सर्वाधिक बंडखोरी ही भाजपत झाली आहे. भाजपने आतापर्यंत सहा बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, तर उद्धवसेनापाठोपाठ काँग्रेसनेही बंडखोरांवर कारवाई केली आहे, परंतु बंडखोरांवरही फारशी चर्चा होताना दिसत नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकNandedनांदेडBJPभाजपाbhokar-acभोकर