शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
2
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
3
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
4
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
5
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
6
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
7
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
8
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
9
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
10
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
11
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
12
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
13
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
14
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं
15
ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?
16
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
17
Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!
18
भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ
19
अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी

डझनभर दिग्गजांचे पक्षांतर, पण चर्चा केवळ अशोकराव चव्हाणांचीच का?

By शिवराज बिचेवार | Updated: November 14, 2024 18:24 IST

लोकसभा निवडणुकीवेळी अशोकरावांच्या पक्षांतरावर सडकून टीका करणारे आता मात्र स्वत:च दुसऱ्या पक्षाची पालखी वाहत आहेत.

नांदेड : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत माजी मंत्री, खासदार, आमदार अशा डझनावर दिग्गजांनी पक्षांतर केले आहे. काही जणांनी तर वर्ष-दोन वर्षाला पक्ष बदलले आहेत, परंतु या सर्वांमध्ये चर्चा फक्त एक वेळेस पक्ष बदललेल्या माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाणांचीच होते. 

लोकसभा निवडणुकीवेळी अशोकरावांच्या पक्षांतरावर सडकून टीका करणारे आता मात्र स्वत:च दुसऱ्या पक्षाची पालखी वाहत आहेत. परंतु, त्यांच्या पक्षांतरावर जाहीरपणे कुणीही बोलत नाही. दहा वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माधवराव किन्हाळकर यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपत प्रवेश केला होता, परंतु दहा वर्षांत पक्षाने कोणतीही महत्त्वाची जबाबदारी दिली नसल्याचे सांगून काही महिन्यांपूर्वीच त्यांनी घरवापसी केली. 

माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी, तर यंदा विक्रमी सहाव्या वेळी पक्षांतर करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, लोकस्वराज्य अशा अनेक पक्षांत ते फिरून आले. ते लोहा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शिवसेना, भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि आता शिंदे गट असे पक्षांतराचे एक वर्तुळ पूर्ण केले आहे. 

माजी खासदार भास्करराव खतगावकर हे काँग्रेसकडून तीन वेळा लोकसभेत पोहचले होते, परंतु त्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ते सूनबाई मिनल खतगावकर यांच्यासह काँग्रेसमध्ये आले होते, परंतु माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपत गेल्यानंतर लोकसभेच्या वेळी ते पुन्हा भाजपत आले. अन् आता विधानसभेला भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी सूनबाई मिनल यांच्यासह पुन्हा काँग्रेसची वाट धरली. मिनल खतगावकर सध्या नायगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आहेत. 

माजी आमदार सुभाष साबणे हे अगोदर शिवसेनेत होते. नंतर ते भाजपत गेले. भाजपकडून देगलूरची विधानसभा पोटनिवडणूक लढविली होती. त्यात पराभूत झाले. यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे परिवर्तन आघाडीचा झेंडा हाती घेतला. सध्या ते देगलूरमध्ये प्रहारचे उमेदवार आहेत. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर हे विधान परिषदेला क्रॉस वोटिंग केल्यामुळे चर्चेत आले होते. त्यानंतर अशोकरावांच्या नेतृत्वात भाजपत प्रवेश करून विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. 

किनवटचे भीमराव केराम हे अगोदर भारिप बहुजन महासंघात होते. नंतर अपक्ष म्हणूनही निवडणूक लढविली होती. सध्या भाजपचे आमदार आहेत. नांदेड दक्षिणमध्ये भाजपचे बंडखोर दिलीप कंदकुर्ते हे अगोदर काँग्रेसमध्ये होते. नंतर भाजपत आल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून बंडखोरी करीत ते रिंगणात उतरले होते, परंतु बंडखोरीनंतरही भाजपने त्यांच्यावर महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी बंडाचे निशाण फडकविले असून, पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला पक्षांतराचा मोठा इतिसहा आहे, परंतु या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चा ही अशोकरावांच्या पक्षांतराचीच केली जात आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर अलीकडच्या काळात पक्षातील काही जणांकडून अशोकरावांची अडवणूक करण्याचे षडयंत्र सुरू होते. त्यामुळे पक्षांतर्गत संघर्षाला कंटाळून बाहेर पडल्याचे अशोकरावांनी अनेकवेळा स्पष्ट केले आहे.

सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहणजिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरांचाही बोलबाला आहे. सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. त्यात सर्वाधिक बंडखोरी ही भाजपत झाली आहे. भाजपने आतापर्यंत सहा बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, तर उद्धवसेनापाठोपाठ काँग्रेसनेही बंडखोरांवर कारवाई केली आहे, परंतु बंडखोरांवरही फारशी चर्चा होताना दिसत नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकNandedनांदेडBJPभाजपाbhokar-acभोकर