शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

पाणीटंचाईने हिरावला सुटीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:06 IST

मार्च महिना उजाडला, की बच्चे कंपनीला वेध लागतात ते उन्हाळी सुट्यांचे़ मग उन्हाळी सुटीत काय काय मज्जा करायची हे अगोदरच ठरविले जाते़ शहरी भागात तर बच्चे कंपनीसाठी वेगवेगळे नियोजन केले जाते़ कोणी पोहण्याचे तर कोणी चित्रकला, निसर्गसहल असे वेगवेगळे नियोजन करुन सुटीचा आनंद घेतात़ मात्र,

ठळक मुद्देबच्चे कंपनीचा हिरमोड : बोधडी परिसरात बालउद्यानाची गरज

बोधडी : मार्च महिना उजाडला, की बच्चे कंपनीला वेध लागतात ते उन्हाळी सुट्यांचे़ मग उन्हाळी सुटीत काय काय मज्जा करायची हे अगोदरच ठरविले जाते़ शहरी भागात तर बच्चे कंपनीसाठी वेगवेगळे नियोजन केले जाते़ कोणी पोहण्याचे तर कोणी चित्रकला, निसर्गसहल असे वेगवेगळे नियोजन करुन सुटीचा आनंद घेतात़ मात्र, ग्रामीण भागात हे चित्र पाहण्यास मिळत नाही़ शाळेला सुटी लागताच विद्यार्थ्यांना पाण्यासाठी आपल्या पालकांसोबत वणवण भटकावे लागणार आहे़ त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद हिरावला आहे़ग्रामीण भागात कुठल्याच भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उन्हाळ्याच्या पूर्ण सुट्यांवर मुले घरीच राहतात़ आजच्या जमान्यात मामाकडे गावाला जाण्याची हिंमत कोणी करीतच नाही़ एकतर पाणीटंचाई, नाहीतर दरवर्षी आमच्याकडेच का यायचे, सुटीला हा प्रश्न मामी नक्कीच मामाला विचारत असेल़ त्यामुळे सुट्यात मामाच्या गावाला न जाता ग्रामीण भागातील मुले ही एकतर टीव्ही किंवा मोबाईल पाहण्यातच अख्खा दिवस घालवतात़ बोधडीत ग्रामपंचायतने एखादे बालउद्यान उभारले तर नक्कीच बच्चे कंपनी आणि ज्येष्ठांसाठी एक विरंगुळ्याचे ठिकाण होईल़ त्यामुळे बालउद्यान तयार करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे़ग्रामीण भागातील मुलांचा पाण्यासाठी संघर्षउन्हाळ्याची सुटी म्हणजे मौज मस्ती, धमाल व आनंदाला उधाण़़़ त्यामुळे मुलांना हे दिवस खूप आवडतात़ दप्तराचे ओझे व अभ्यासाचा ताण विसरून मुले आपल्या आवडीनुसार सुटींचा आनंद घेतात़ शहरामध्ये पालक आपल्या मुलांना सुट्यांचा सदुपयोग म्हणून विविध क्लास लावतात़ विविध कार्यशाळा, शिबिरामध्ये मुले प्रवेश घेतातक़ाही मुले उन्हाळ्याच्या सुटीत सहलीवर जातात़ अशा अनेक उपक्रमांनी शहरातील मुलांच्या उन्हाळी सुट्या साजऱ्या होतात़ तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी उन्हाळी सुटीत गावी परत गेल्यानंतर आपल्या आई, वडिलांसोबत पाण्याच्या शोधार्थ भटकतात़ सुट्यांचा कालावधी म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारची कसोटीचा काळ असतो़ त्यामुळे दरवर्षी येणारा उन्हाळा त्यांना नकोसा वाटतो़ यावर्षीच्या दुष्काळामुळे अनेक गावे स्थलांतरित होत आहेत़ पाण्याच्या शोधार्थ निघालेल्या वाडी, वस्ती, तांड्यांवरील मुलांच्या सुट्याची मात्र होरपळ होत आहे़

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई