शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पाणीटंचाईने हिरावला सुटीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:06 IST

मार्च महिना उजाडला, की बच्चे कंपनीला वेध लागतात ते उन्हाळी सुट्यांचे़ मग उन्हाळी सुटीत काय काय मज्जा करायची हे अगोदरच ठरविले जाते़ शहरी भागात तर बच्चे कंपनीसाठी वेगवेगळे नियोजन केले जाते़ कोणी पोहण्याचे तर कोणी चित्रकला, निसर्गसहल असे वेगवेगळे नियोजन करुन सुटीचा आनंद घेतात़ मात्र,

ठळक मुद्देबच्चे कंपनीचा हिरमोड : बोधडी परिसरात बालउद्यानाची गरज

बोधडी : मार्च महिना उजाडला, की बच्चे कंपनीला वेध लागतात ते उन्हाळी सुट्यांचे़ मग उन्हाळी सुटीत काय काय मज्जा करायची हे अगोदरच ठरविले जाते़ शहरी भागात तर बच्चे कंपनीसाठी वेगवेगळे नियोजन केले जाते़ कोणी पोहण्याचे तर कोणी चित्रकला, निसर्गसहल असे वेगवेगळे नियोजन करुन सुटीचा आनंद घेतात़ मात्र, ग्रामीण भागात हे चित्र पाहण्यास मिळत नाही़ शाळेला सुटी लागताच विद्यार्थ्यांना पाण्यासाठी आपल्या पालकांसोबत वणवण भटकावे लागणार आहे़ त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद हिरावला आहे़ग्रामीण भागात कुठल्याच भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उन्हाळ्याच्या पूर्ण सुट्यांवर मुले घरीच राहतात़ आजच्या जमान्यात मामाकडे गावाला जाण्याची हिंमत कोणी करीतच नाही़ एकतर पाणीटंचाई, नाहीतर दरवर्षी आमच्याकडेच का यायचे, सुटीला हा प्रश्न मामी नक्कीच मामाला विचारत असेल़ त्यामुळे सुट्यात मामाच्या गावाला न जाता ग्रामीण भागातील मुले ही एकतर टीव्ही किंवा मोबाईल पाहण्यातच अख्खा दिवस घालवतात़ बोधडीत ग्रामपंचायतने एखादे बालउद्यान उभारले तर नक्कीच बच्चे कंपनी आणि ज्येष्ठांसाठी एक विरंगुळ्याचे ठिकाण होईल़ त्यामुळे बालउद्यान तयार करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे़ग्रामीण भागातील मुलांचा पाण्यासाठी संघर्षउन्हाळ्याची सुटी म्हणजे मौज मस्ती, धमाल व आनंदाला उधाण़़़ त्यामुळे मुलांना हे दिवस खूप आवडतात़ दप्तराचे ओझे व अभ्यासाचा ताण विसरून मुले आपल्या आवडीनुसार सुटींचा आनंद घेतात़ शहरामध्ये पालक आपल्या मुलांना सुट्यांचा सदुपयोग म्हणून विविध क्लास लावतात़ विविध कार्यशाळा, शिबिरामध्ये मुले प्रवेश घेतातक़ाही मुले उन्हाळ्याच्या सुटीत सहलीवर जातात़ अशा अनेक उपक्रमांनी शहरातील मुलांच्या उन्हाळी सुट्या साजऱ्या होतात़ तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी उन्हाळी सुटीत गावी परत गेल्यानंतर आपल्या आई, वडिलांसोबत पाण्याच्या शोधार्थ भटकतात़ सुट्यांचा कालावधी म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारची कसोटीचा काळ असतो़ त्यामुळे दरवर्षी येणारा उन्हाळा त्यांना नकोसा वाटतो़ यावर्षीच्या दुष्काळामुळे अनेक गावे स्थलांतरित होत आहेत़ पाण्याच्या शोधार्थ निघालेल्या वाडी, वस्ती, तांड्यांवरील मुलांच्या सुट्याची मात्र होरपळ होत आहे़

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई