शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मध्यान्ह भोजनापासून विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:08 IST

दुष्काळग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी माहूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. माहूर तालुक्यातील काही गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देश्रीक्षेत्र माहूर : पेसायुक्त तालुक्यातील मध्यान्ह भोजनाच्या आदेशाला शिक्षण विभागाचा ठेंगा

श्रीक्षेत्र माहूर : दुष्काळग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी माहूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. माहूर तालुक्यातील काही गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेत राज्य सरकारने उन्हाळी सुट्यातही या टंचाईग्रस्त गावांतील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याचे आदेश यापूर्वीच जारी केले आहेत.२४ एप्रिल रोजी शिक्षणाधिकारी जि. प. नांदेड यांनी टंचाईग्रस्त गावांची यादी प्रसिद्ध करून गटशिक्षणाधिकारी माहूर यांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले होते़ त्यामध्ये माहूर तालुक्यातील ९२ गावांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वच गावांतील शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्यातही मध्यान्ह भोजन देणे अपेक्षित होते. मात्र माहूर तालुक्यातील काही बोटावर मोजण्याएवढ्या शाळा वगळता इतर अनेक गावांत मध्यान भोजन योजनेबाबतच्या शासन आदेशाची पायमल्ली होत असल्याचे बोलल्या जात आहे. माहूर पं.स.च्या शिक्षण विभागामार्फत मध्यान्ह भोजन वाटप करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे आवश्यक असताना अनेक शिक्षक उन्हाळी सुटीनिमित्त गावाकडे गेले आहेत़ अशावेळी अनेक ठिकाणी खिचडी कामगारावरच सर्व जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे दिसत आहे.जि. प. शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत गटशिक्षणाधिकारी यांना खडे बोल सुनावल्यानंतर मध्यान्ह भोजन नियोजन या शीर्षकाखाली अनेक शिक्षकांच्या ड्युट्या लावण्यात आल्या़प्रत्यक्ष मात्र एकही शिक्षक शाळेवरच नव्हे, तर मुख्यालयीसुद्धा दिसून आले नसल्याने शिक्षण विभागाचे नियोजन म्हणजे कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार असल्याचे संतप्त नागरिकांतून बोलल्या जात आहे. माहूर पं. स. चे प्रभारी गटशिक्षणाधिकारी मसूद खान यांनी मध्यान्ह भोजनाची पाहणीसुद्धा केली नसल्याची माहिती आहे. शिक्षण विभागाने गोपनीय पथक पाठवून प्रत्यक्ष शाळाना भेटी दिल्यास गौडबंगाल समोर येणार आहे.टंचाईग्रस्त यादीत ९२ गावांचा समावेशपेसायुक्त तालुक्यातील अनेक गावांचे शालेय विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित असून अनेक गावांत खिचडी कामगारच कामे करत आहेत़ शिक्षकांच्या ड्युट्या असतानाही प्रत्यक्ष एकही शिक्षक हजर नाही़ मध्यान्ह भोजन ड्युटी पत्रक केवळ नामधारी ठरले आहे़२४ एप्रिल रोजी शिक्षणाधिकारी जि. प. नांदेड यांनी टंचाईग्रस्त गावांची यादी प्रसिद्ध करून गटशिक्षणाधिकारी माहूर यांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले होते़ त्यामध्ये माहूर तालुक्यातील ९२ गावांचा समावेश आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदEducationशिक्षणStudentविद्यार्थी