शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

मध्यान्ह भोजनापासून विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:08 IST

दुष्काळग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी माहूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. माहूर तालुक्यातील काही गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देश्रीक्षेत्र माहूर : पेसायुक्त तालुक्यातील मध्यान्ह भोजनाच्या आदेशाला शिक्षण विभागाचा ठेंगा

श्रीक्षेत्र माहूर : दुष्काळग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी माहूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. माहूर तालुक्यातील काही गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेत राज्य सरकारने उन्हाळी सुट्यातही या टंचाईग्रस्त गावांतील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याचे आदेश यापूर्वीच जारी केले आहेत.२४ एप्रिल रोजी शिक्षणाधिकारी जि. प. नांदेड यांनी टंचाईग्रस्त गावांची यादी प्रसिद्ध करून गटशिक्षणाधिकारी माहूर यांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले होते़ त्यामध्ये माहूर तालुक्यातील ९२ गावांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वच गावांतील शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्यातही मध्यान्ह भोजन देणे अपेक्षित होते. मात्र माहूर तालुक्यातील काही बोटावर मोजण्याएवढ्या शाळा वगळता इतर अनेक गावांत मध्यान भोजन योजनेबाबतच्या शासन आदेशाची पायमल्ली होत असल्याचे बोलल्या जात आहे. माहूर पं.स.च्या शिक्षण विभागामार्फत मध्यान्ह भोजन वाटप करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे आवश्यक असताना अनेक शिक्षक उन्हाळी सुटीनिमित्त गावाकडे गेले आहेत़ अशावेळी अनेक ठिकाणी खिचडी कामगारावरच सर्व जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे दिसत आहे.जि. प. शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत गटशिक्षणाधिकारी यांना खडे बोल सुनावल्यानंतर मध्यान्ह भोजन नियोजन या शीर्षकाखाली अनेक शिक्षकांच्या ड्युट्या लावण्यात आल्या़प्रत्यक्ष मात्र एकही शिक्षक शाळेवरच नव्हे, तर मुख्यालयीसुद्धा दिसून आले नसल्याने शिक्षण विभागाचे नियोजन म्हणजे कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार असल्याचे संतप्त नागरिकांतून बोलल्या जात आहे. माहूर पं. स. चे प्रभारी गटशिक्षणाधिकारी मसूद खान यांनी मध्यान्ह भोजनाची पाहणीसुद्धा केली नसल्याची माहिती आहे. शिक्षण विभागाने गोपनीय पथक पाठवून प्रत्यक्ष शाळाना भेटी दिल्यास गौडबंगाल समोर येणार आहे.टंचाईग्रस्त यादीत ९२ गावांचा समावेशपेसायुक्त तालुक्यातील अनेक गावांचे शालेय विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित असून अनेक गावांत खिचडी कामगारच कामे करत आहेत़ शिक्षकांच्या ड्युट्या असतानाही प्रत्यक्ष एकही शिक्षक हजर नाही़ मध्यान्ह भोजन ड्युटी पत्रक केवळ नामधारी ठरले आहे़२४ एप्रिल रोजी शिक्षणाधिकारी जि. प. नांदेड यांनी टंचाईग्रस्त गावांची यादी प्रसिद्ध करून गटशिक्षणाधिकारी माहूर यांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले होते़ त्यामध्ये माहूर तालुक्यातील ९२ गावांचा समावेश आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदEducationशिक्षणStudentविद्यार्थी