शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

सगळी कामे फोनवर होत नाहीत म्हणून दिल्ली दौरे; शिंदे-ठाकरेंच्या दौऱ्यांवर पवारांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:38 IST

वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना त्यांच्या विभागातील किंवा राज्यातील कामांसाठी केंद्रातील मंत्र्यांना भेटावे लागते.

नांदेड : दिल्ली देशाची राजधानी आहे. तिथे लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन सुरू आहे. या काळात विरोधी पक्षालाही बैठक लावण्याचा अधिकार आहे. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना त्यांच्या विभागातील किंवा राज्यातील कामांसाठी केंद्रातील मंत्र्यांना भेटावे लागते. अशा कामांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर इतर नेतेही जातात. सगळी कामे फोनवर होत नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष चर्चा करावी लागते. त्यासाठी दिल्ली दौरे करावे लागतात, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी नांदेडात आले होते. यावेळी ते म्हणाले, न्यायाधीशपदी स्वाती साठे यांच्या नियुक्तीवर न्याय व्यवस्था आपले काम करीत असते. काय निर्णय घ्यायचा, यामध्ये केंद्र किंवा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो. बेस्ट व्यवस्थापकपदी दोन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. हा निर्णय राज्याचा प्रमुख घेत असतो. एकनाथराव ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यावेळी तेदेखील निर्णय घेत होते. आता देवेंद्र फडणवीस आहेत. महत्त्वाच्या पोस्टिंगचे डिपार्टमेंट त्यांच्याकडे असते. पण महायुतीत घटक पक्ष असल्याने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करतात. परंतु तरीही मी जेईडींना विचारेल, असे काही घडले आहे काय? पण हा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच असतो. कबुतर खाना आणि माधुरी हत्तीबाबत मुख्यमंत्र्यांची कालच बैठक झाली आहे. राज्य सरकार दोन्हीबाबत सकारात्मक आहे. राज्यात निधी नसल्यामुळे कोणतीही कामे थांबली नाहीत. आजच सार्वजनिक बांधकाम विभागाला मोठी रक्कम देण्यात आली आहे. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. टप्प्याटप्प्याने निधी जात असतो, असेही पवार म्हणाले.

दारूच्या परवान्याबाबत कोणताही निर्णय झाला नाहीदारूच्या दरवाढीबद्दल निर्णय झाला आहे. परंतु दारूच्या परवान्याबाबत विनाकारण चर्चा केली जात असल्याबद्दल पवारांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेNandedनांदेड