शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

पिके कोमेजून जाण्यास झाली सुरूवात; पावसाच्या विश्रांतीने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 18:54 IST

जिल्हाभरात पावसाने मागील १५ ते २० दिवसांपासून विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देपावसाने घेतलेल्या दीर्घ खंडामुळे पिके पिवळी पडण्यास सुरूवात झाली अनेक ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली आहे.

नांदेड : जिल्हाभरात पावसाने मागील १५ ते २० दिवसांपासून विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाने घेतलेल्या दीर्घ खंडामुळे पिके पिवळी पडण्यास सुरूवात झाली असून अनेक ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली आहे.

यावर्षीच्या मोसमात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. दरम्यान, मोसमाच्या सुरूवातीला जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावली. परंतु, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मात्र पावसाने दडी मारली. दरम्यान, पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे मोसमाच्या सुरूवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. कारण पावसाअभावी पिके कोमेजून जाण्यास सुरूवात झाली असून खरीप हंगाम धोक्यात आला आहे.

दरम्यान, आठ दिवसांपूर्वी एका खाजगी हवामान कंपनीने आॅगस्ट महिना पूर्णपणे कोरडाच राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पावसाने जुलै महिन्याच्या शेवटीपासूनच डोळे वटारल्यामुळे तापमानातही वाढ झाली आहे. परिणामी, अनेक भागातील भूजल पातळीत झपाट्याने घट होत असल्याचे चित्र अनेक भागात बघावयास मिळत आहे.

जिल्हाभरातील बहुतांश ठिकाणच्या पिकांची परिस्थिती सध्या चांगली आहे. परंतु, काही भागात पिकांना पाणी मिळणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी शेतकरी आपली कोवळी पिके जगविण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पिकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आणखी आठ दिवस पावसाने अशीच विश्रांती घेतल्यास याचा दुष्परिणाम संपूर्ण खरीप हंगामावर होणार आहे. त्यामुळे पिकांवर आतापर्यंत केलेला खर्च वाया जाण्याची भीती आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातच कापसावर सध्या गुलाबी बोंडअळीचे संकट घोंगावत आहे. तर दुसरीकडे हे संकट टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असून शेतकऱ्यांसह सामान्यांही आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती