शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पिके कोमेजून जाण्यास झाली सुरूवात; पावसाच्या विश्रांतीने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 18:54 IST

जिल्हाभरात पावसाने मागील १५ ते २० दिवसांपासून विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देपावसाने घेतलेल्या दीर्घ खंडामुळे पिके पिवळी पडण्यास सुरूवात झाली अनेक ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली आहे.

नांदेड : जिल्हाभरात पावसाने मागील १५ ते २० दिवसांपासून विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाने घेतलेल्या दीर्घ खंडामुळे पिके पिवळी पडण्यास सुरूवात झाली असून अनेक ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली आहे.

यावर्षीच्या मोसमात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. दरम्यान, मोसमाच्या सुरूवातीला जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावली. परंतु, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मात्र पावसाने दडी मारली. दरम्यान, पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे मोसमाच्या सुरूवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. कारण पावसाअभावी पिके कोमेजून जाण्यास सुरूवात झाली असून खरीप हंगाम धोक्यात आला आहे.

दरम्यान, आठ दिवसांपूर्वी एका खाजगी हवामान कंपनीने आॅगस्ट महिना पूर्णपणे कोरडाच राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पावसाने जुलै महिन्याच्या शेवटीपासूनच डोळे वटारल्यामुळे तापमानातही वाढ झाली आहे. परिणामी, अनेक भागातील भूजल पातळीत झपाट्याने घट होत असल्याचे चित्र अनेक भागात बघावयास मिळत आहे.

जिल्हाभरातील बहुतांश ठिकाणच्या पिकांची परिस्थिती सध्या चांगली आहे. परंतु, काही भागात पिकांना पाणी मिळणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी शेतकरी आपली कोवळी पिके जगविण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पिकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आणखी आठ दिवस पावसाने अशीच विश्रांती घेतल्यास याचा दुष्परिणाम संपूर्ण खरीप हंगामावर होणार आहे. त्यामुळे पिकांवर आतापर्यंत केलेला खर्च वाया जाण्याची भीती आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातच कापसावर सध्या गुलाबी बोंडअळीचे संकट घोंगावत आहे. तर दुसरीकडे हे संकट टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असून शेतकऱ्यांसह सामान्यांही आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती