शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पिके कोमेजून जाण्यास झाली सुरूवात; पावसाच्या विश्रांतीने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 18:54 IST

जिल्हाभरात पावसाने मागील १५ ते २० दिवसांपासून विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देपावसाने घेतलेल्या दीर्घ खंडामुळे पिके पिवळी पडण्यास सुरूवात झाली अनेक ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली आहे.

नांदेड : जिल्हाभरात पावसाने मागील १५ ते २० दिवसांपासून विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाने घेतलेल्या दीर्घ खंडामुळे पिके पिवळी पडण्यास सुरूवात झाली असून अनेक ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली आहे.

यावर्षीच्या मोसमात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. दरम्यान, मोसमाच्या सुरूवातीला जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावली. परंतु, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मात्र पावसाने दडी मारली. दरम्यान, पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे मोसमाच्या सुरूवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. कारण पावसाअभावी पिके कोमेजून जाण्यास सुरूवात झाली असून खरीप हंगाम धोक्यात आला आहे.

दरम्यान, आठ दिवसांपूर्वी एका खाजगी हवामान कंपनीने आॅगस्ट महिना पूर्णपणे कोरडाच राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पावसाने जुलै महिन्याच्या शेवटीपासूनच डोळे वटारल्यामुळे तापमानातही वाढ झाली आहे. परिणामी, अनेक भागातील भूजल पातळीत झपाट्याने घट होत असल्याचे चित्र अनेक भागात बघावयास मिळत आहे.

जिल्हाभरातील बहुतांश ठिकाणच्या पिकांची परिस्थिती सध्या चांगली आहे. परंतु, काही भागात पिकांना पाणी मिळणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी शेतकरी आपली कोवळी पिके जगविण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पिकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आणखी आठ दिवस पावसाने अशीच विश्रांती घेतल्यास याचा दुष्परिणाम संपूर्ण खरीप हंगामावर होणार आहे. त्यामुळे पिकांवर आतापर्यंत केलेला खर्च वाया जाण्याची भीती आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातच कापसावर सध्या गुलाबी बोंडअळीचे संकट घोंगावत आहे. तर दुसरीकडे हे संकट टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असून शेतकऱ्यांसह सामान्यांही आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती