शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

'या' शेतकऱ्यांना स्मशानभूमी ठरतेय वरदान; पावसापासून लाख मोलाच्या शेतमालाचे होतेय संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 14:10 IST

अंत्यविधी एकही झाला नाही पण सोयाबीन ठेवण्यासाठी होतोय उपयोग

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली स्मशानभूमी

- सुनील चौरे

हदगाव ( नांदेड ) : सततच्या पावसामुळे ( Heavy Rainfall in Nanded ) तालुक्यातील सोयाबीन काढणी खोळंबली आहे. जस जमेल तसं शेतकरी पिक काढून घेत आहेत. मात्र, पावसाचा तडाखा सुरुच आहे. यावेळी केदारनाथ येथिल ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत बांधलेली स्मशानभूमी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतकरी काढलेले सोयाबीन येथेच पावसापासून रक्षण करण्यासाठी साठवून ठेवत आहेत. ( crematorium became boon to 'this' farmers )

सन २०१०-११ मध्ये बांधलेल्या ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत या स्मशानभूमीत अद्याप एकही अंत्यविधी झाला नाही. या स्मशानभूमीसमोर खंडु बाजीराव भिसे आणि त्यांच्या भावांची शेती आहे. त्यांना आठ एकर जमीन आहे. शेतीच्या बाजूने नाला आहे. शेतात मळणी यंत्र जात नाही. रस्त्यावर सोयाबीनसजा ढिग करण्यासाठी मुबलक जागा नाही. पण शेतासमोरील बांधलेली स्मशानभूमी रिकामीच असल्याने यांच्या डोक्यात एक कल्पना आली. आपण सोयाबीन येथे आणून जमा केले तर पावसामुळे होणारे नुकसान टाळता येईल. रस्त्यावर सोयाबीन आल्याने मळणी यंत्र ही मिळेल. दिड किमी डोक्यावर सोयाबिन घेऊन दिवसभर आठ दहा चक्करा करत चारही भावांनी सोयाबीन स्मशानभूमीतील सुरक्षित स्थळी ठेवले आहे. पीक सुरक्षित असल्याने त्याचे समाधान या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकू लागले आहे.

स्मशानभूमी ठरतेय वरदानअतिवृष्टी झाली नसती तर मळणी यंत्र शेतात आले असते. पण दोन वर्षांपासून आम्हाला स्मशानभूमीचा आधार घ्यावा लागत आहे. खरं तर ग्रामीण भागात स्मशानभूमीकडे कोणी सहसा फिरकतच नाही. पण केदारनाथ येथील स्मशानभूमी शेतकऱ्यांना मदत करीत असल्याचे चित्र आहे. अनेक शेतकरी आता मागे पुढे या स्मशानभूमीचा उपयोग घेत आहेत. आता हिरवं असलेल सोयाबीन बाजुला काढून दोन दिवस वाळवता येईल. दोन चार दिवस मळणी यंत्र नाही मिळाले तरी अडचण नाही असे खंडु भिसे म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस