शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

नांदेडमध्ये ग्राहक तक्रार निवारण समितीचा बेंच एक; दाखल प्रकरणे २० हजारांहून अधिक

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: February 21, 2024 17:37 IST

एका दिवसात एका बेंचवर जास्तीत जास्त ५० ते ६० प्रकरणांवर न्यायनिवाडा होतो; वाचा आणखी किती बेंचची आवश्यकता आहे?

नांदेड : येथील जिल्हा तक्रार निवारण समितीकडे ३१ जानेवारी २०२४ अखेर तब्बल २० हजार २४२ प्रकरणे दाखल झालेली आहेत. या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी एकच बेंच असून, अध्यक्ष आणि दोन सदस्यांना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मोठी दमछाक होत आहे. कुठल्याही जिल्हा तक्रार निवारण समितीकडे एखाद्या ग्राहकाने प्रकरण मंचात दाखल केल्यास त्याचा कमीत कमी ९० ते जास्तीत जास्त १२० दिवसांत निपटारा करावा लागतो. परंतु याठिकाणी सलग दहा महिने अध्यक्ष आणि सदस्यांची पदे रिक्त असल्याने तक्रारींचा खच वाढला. 

एका दिवसात एका बेंचवर जास्तीत जास्त ५० ते ६० प्रकरणांवर न्यायनिवाडा होत असल्याने दिवसेंदिवस पेंडसींची संख्या वाढत आहे. नांदेड जिल्हा तक्रार निवारण समितीकडे एकूण २० हजार २४२ प्रकरणे दाखल असून, त्यापैकी १३ हजार ३३६ प्रकरणांचा निपटारा झालेला आहे. तर ६९०६ प्रकरणे अद्यापही प्रलंबितच आहेत.

जिल्ह्यात तीन बेंचची आवश्यकताजिल्ह्यात दरवर्षी दाखल होणारे इतक्या मोठ्या प्रमाणातील प्रकरणे महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यात नाहीत. प्रकरणे दाखल होण्यात नांदेड जिल्हा हा राज्यात आघाडीवर आहे. एका बेंचवर जास्तीत जास्त वर्षभरात अडीच ते तीन हजार प्रकरणांचा निपटारा होऊ शकतो. पण किमान वर्षभरात चार ते पाच हजारांपर्यंत प्रकरणे दाखल होत असतात. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात किमान दोन ते तीन बेंचची आवश्यकता असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.

अतिरिक्त जिल्हा तक्रार निवारण मंचाची गरजराज्यात कुठेच नव्हे, इतक्या मोठ्या प्रमाणातील प्रकरणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समितीकडे दाखल होत असल्याने दिवसेंदिवस पेंडसी वाढत आहे. त्यासाठी जिल्ह्यात किमान एक ते दोन अतिरिक्त जिल्हा तक्रार निवारण समितीची आवश्यकता आहे.

तीन महिन्यांत १९४ केसेसचा निपटाराजिल्ह्यात जिल्हा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष व सदस्य रुजू झाले तेव्हापासून म्हणजे मागील तीन महिन्यांपासून १९४ केसेसचा निपटारा करण्यात आला आहे. त्यात ऑक्टोबर ६, नोव्हेंबर २४, डिसेंबर ६२, तर जानेवारी महिन्यात १०२ प्रकरणांवर न्यायनिवाडा केला आहे.

टॅग्स :consumerग्राहकNandedनांदेड