शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

नांदेडमध्ये ग्राहक तक्रार निवारण समितीचा बेंच एक; दाखल प्रकरणे २० हजारांहून अधिक

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: February 21, 2024 17:37 IST

एका दिवसात एका बेंचवर जास्तीत जास्त ५० ते ६० प्रकरणांवर न्यायनिवाडा होतो; वाचा आणखी किती बेंचची आवश्यकता आहे?

नांदेड : येथील जिल्हा तक्रार निवारण समितीकडे ३१ जानेवारी २०२४ अखेर तब्बल २० हजार २४२ प्रकरणे दाखल झालेली आहेत. या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी एकच बेंच असून, अध्यक्ष आणि दोन सदस्यांना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मोठी दमछाक होत आहे. कुठल्याही जिल्हा तक्रार निवारण समितीकडे एखाद्या ग्राहकाने प्रकरण मंचात दाखल केल्यास त्याचा कमीत कमी ९० ते जास्तीत जास्त १२० दिवसांत निपटारा करावा लागतो. परंतु याठिकाणी सलग दहा महिने अध्यक्ष आणि सदस्यांची पदे रिक्त असल्याने तक्रारींचा खच वाढला. 

एका दिवसात एका बेंचवर जास्तीत जास्त ५० ते ६० प्रकरणांवर न्यायनिवाडा होत असल्याने दिवसेंदिवस पेंडसींची संख्या वाढत आहे. नांदेड जिल्हा तक्रार निवारण समितीकडे एकूण २० हजार २४२ प्रकरणे दाखल असून, त्यापैकी १३ हजार ३३६ प्रकरणांचा निपटारा झालेला आहे. तर ६९०६ प्रकरणे अद्यापही प्रलंबितच आहेत.

जिल्ह्यात तीन बेंचची आवश्यकताजिल्ह्यात दरवर्षी दाखल होणारे इतक्या मोठ्या प्रमाणातील प्रकरणे महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यात नाहीत. प्रकरणे दाखल होण्यात नांदेड जिल्हा हा राज्यात आघाडीवर आहे. एका बेंचवर जास्तीत जास्त वर्षभरात अडीच ते तीन हजार प्रकरणांचा निपटारा होऊ शकतो. पण किमान वर्षभरात चार ते पाच हजारांपर्यंत प्रकरणे दाखल होत असतात. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात किमान दोन ते तीन बेंचची आवश्यकता असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.

अतिरिक्त जिल्हा तक्रार निवारण मंचाची गरजराज्यात कुठेच नव्हे, इतक्या मोठ्या प्रमाणातील प्रकरणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समितीकडे दाखल होत असल्याने दिवसेंदिवस पेंडसी वाढत आहे. त्यासाठी जिल्ह्यात किमान एक ते दोन अतिरिक्त जिल्हा तक्रार निवारण समितीची आवश्यकता आहे.

तीन महिन्यांत १९४ केसेसचा निपटाराजिल्ह्यात जिल्हा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष व सदस्य रुजू झाले तेव्हापासून म्हणजे मागील तीन महिन्यांपासून १९४ केसेसचा निपटारा करण्यात आला आहे. त्यात ऑक्टोबर ६, नोव्हेंबर २४, डिसेंबर ६२, तर जानेवारी महिन्यात १०२ प्रकरणांवर न्यायनिवाडा केला आहे.

टॅग्स :consumerग्राहकNandedनांदेड