शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयात बसून नांदेडविरुद्ध षड्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:32 IST

या षड्यंत्रात सत्तेत असलेल्या जिल्ह्यातील चमच्यांचा सहभाग असल्याचा घणाघाती आरोप करीत नांदेडचे हाल करु नका. समोरासमोर लढण्यावर आमचा विश्वास आहे. हिंमत असेल तर थेट सामना करा

ठळक मुद्देहिंमत असेल तर थेट लढाअशोक चव्हाण यांचे विरोधकांना आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडकर कायम काँग्रेस आणि चव्हाण परिवाराच्या पाठीशी राहिलेले आहेत. ही बाब विरोधकांना खुपते आहे. त्यामुळेच नांदेडकरांची कोंडी करुन शहराला अधोगतीकडे नेण्याचे काम मागील चार वर्षांपासून सुरु आहे. आता नांदेडवासियांना पिण्याचे पाणीही मिळू नये, याचे षड्यंत्र मंत्रालयात बसून रचले जात आहे. या षड्यंत्रात सत्तेत असलेल्या जिल्ह्यातील चमच्यांचा सहभाग असल्याचा घणाघाती आरोप करीत नांदेडचे हाल करु नका. समोरासमोर लढण्यावर आमचा विश्वास आहे. हिंमत असेल तर थेट सामना करा, असे आव्हान माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले.काँग्रेसच्या विराट जनसंघर्ष यात्रेत ते बोलत होते. मंचावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, नसीम खान, मधुकरराव चव्हाण, राजू वाघमारे, बस्वराज पाटील, आ. डी. पी. सावंत, चारुलता टोकस, आ. अमरनाथ राजूरकर, महापौर शीला भवरे, जि. प. अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, उपमहापौर विनय गिरडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विदर्भ म्हणजे महाराष्टÑ नव्हे, अशा शब्दात सरकारला सुनावत मागील चार वर्षांतील शासनाच्या कारभाराचा त्यांनी पाढा वाचला. भाजपा-सेनेची सत्ता आल्यापासून नांदेड शहरात काहीच होऊ द्यायचे नाही, यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत. आता नांदेडकरांना पिण्याच्या पाण्यापासूनही वंचित ठेवण्याचा डाव रचला जात आहे. मात्र, नांदेडकर जनतेचा अशोक चव्हाण आणि काँग्रेसवर विश्वास आहे. विरोधकांनी कितीही खालच्या थराला जावून राजकारण करु द्या. तुमची साथ आणि नांदेडकरांच्या बळावर या शहराला काहीही कमी पडणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो, असा शब्दही खा. चव्हाण यांनी दिला.भाजप-सेनेच्या कारभारावरही त्यांनी खरमरीत टीका केली. केवळ आश्वासनाचे गाजर दाखविणाºया या सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठीचे एकही काम केले नसल्याचे सांगत आज देशातील सर्वोच्च यंत्रणा सरकारच्या भोंगळ कारभारामुळे संकटात सापडल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन लोकशाही धोक्यात आल्याचे सांगावे लागले. देशाने हे पहिल्यांदाच अनुभवले. हीच बाब आता सीबीआयवरील वादंगावरुन स्पष्ट होते. देशाची सर्वोच्च तपास यंत्रणा असलेल्या सीबीआय कार्यालयाला दिल्ली पोलीस टाळे ठोकते, हा काय प्रकार सुरु आहे. असे सांगत या सरकारचे दिवस भरले आहेत. येणाºया निवडणुकीत विरोधकांना मतदार त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.प्रारंभी माजी मंत्री नसीम खान यांचे भाषण झाले. नागपूरची विचारधारा घेऊन राज्यात विद्वेष पेरण्याचे काम सरकार करीत असल्याची टीका त्यांनी केली. तर हर्षवर्धन पाटील यांनी नांदेडकरांचे कौतुक करीत येणाºया निवडणुकांतही काँग्रेसचा हा बालेकिल्ला अभेद्य राहील, असा विश्वास व्यक्त केला. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात सरकारचा कारभार अंधाधुंद सुरु असल्याची टीका करीत हे सरकार कारभार सांभाळण्यात अपयशी ठरल्याचे सांगत मतदार निवडणुकीची वाट पाहत आहेत. येणा-या निवडणुकीत भाजप-सेनेचा पराभव निश्चित असल्याचे ते म्हणाले. माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसची भूमिका सर्वांना सोबत घेऊन जाण्याची असल्याचे सांगितले. तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याला ‘व्हायरस’ लागलेले हे सरकार कायमचा ‘फॉरमॅट’ मारुन येणा-या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून ‘डिलीट’ करा, असे आवाहन केले. सरकारमधून बाहेर पडण्याची उद्धव ठाकरे यांनी २३५ वेळा घोषणा केल्याचा चिमटाही त्यांनी काढला. मेळाव्याचे प्रास्ताविक आ. डी. पी. सावंत यांनी तर उपस्थितांचे आभार आ. अमरनाथ राजूरकर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले.स्मार्ट सिटी योजनेतून नांदेडला का वगळले ? -विखे पाटीलकाँग्रेसची सत्ता असताना गुरु-त्ता-गद्दी सोहळ्याच्या माध्यमातून नांदेडचा चेहरामोहरा बदलण्याचे काम अशोक चव्हाण यांनी केले. मात्र सेना-भाजप सरकारकडून नांदेडला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत सरकारने स्मार्ट सिटी योजनेतून नांदेडला का वगळले ? असा सवाल विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. चार वर्षांत चार आयुक्त आणि वर्षाला एक पालकमंत्री देवून नांदेडच्या विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न सरकारने केल्याची टीकाही पाटील यांनी केली. मात्र, नांदेड मनपातील विराट विजयानंतर राज्यच नव्हे, तर देशभरातील वातावरण काँग्रेसमय होत असून या सरकारची वेळ भरल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राAshok Chavanअशोक चव्हाणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील