शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर सत्ता परिवर्तनाची नांदी ठरावी : अशोकराव चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 18:24 IST

काँग्रेस पक्षाने मागील साठ वर्षात सर्वच आघाड्यांवर देशाला प्रगतीपथावर नेले आहे.

नांदेड : काँग्रेस पक्षाने मागील साठ वर्षात सर्वच आघाड्यांवर देशाला प्रगतीपथावर नेले आहे. विकासाचा रथ वेगाने पुढे जात असताना खोटी आश्वासनं देणारे मोदी सरकार सत्तेत आले आणि देश पुन्हा एकदा गरीबी व अन्य प्रश्‍नांच्या खाईत लोटला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी व लोकांपर्यंत काँग्रेसचा विचार रुजविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे जिल्हानिहाय प्रशिक्षण आयोजित केले असून हे प्रशिक्षण सत्ता परिवर्तनाची नांदी ठरावी, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने सध्या राज्यभर जिल्हानिहाय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याअनुषंगाने सलग दुसर्‍या दिवशी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांना प्रशिक्षित करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या शिबिराचे उद्घाटन खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. 

पुढे बोलताना खा.चव्हाण म्हणाले की, लोकांचा वाढलेला काँग्रेसमधील जोश आता मतात रूपांतरीत करण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आपण खूप केले आहे, पण सांगण्यासाठी कमी पडतो. त्यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत देश आणि राज्य वाचविण्यासाठी सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी निवडणुका जिंकणे गरजेचे आहे. जनता शासनावर नाराज आहे. अशावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात जाऊन काँग्रेसचा विचार प्रभावीपणे सांगितला पाहिजे, असे मार्गदर्शन केले. 

या प्रशिक्षण शिबिरात जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायती, बाजार समितीचे संचालक, सहकारी साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा बँकेचे संचालक, मजूर फेडरेशनचे संचालक, संपूर्ण शहर व जिल्हा कार्यकारिणी, ब्लॉग काँग्रेसचे अध्यक्ष, विविध फ्रंटलचे पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणElectionनिवडणूक