शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:58 IST

जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर बनली असून ग्रामीण व शहरी भागात पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण कण्याच्या सूचना आज जिल्ह्याचे पालक सचिव तथा जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या़

ठळक मुद्देदुष्काळ परिस्थितीचा प्रधान सचिवांनी घेतला आढावा

नांदेड : जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर बनली असून ग्रामीण व शहरी भागात पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण कण्याच्या सूचना आज जिल्ह्याचे पालक सचिव तथा जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या़प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आज मुखेड तालुक्यातील मोटरगा, चांडोळा, भगनूरवाडी तसेच आसना नदी व विष्णूपुरी प्रकल्पाची पाहणी केली़ त्यानंतर त्यांनी दुपारी ४़३० वाजता जिल्हाधिकारी यांच्या कक्षात पत्रकारांशी संवाद साधला़ जिल्ह्यात दुष्काळ दूर करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने कृषी जलसंधारण व रोजगार हमीची कामे हाती घेण्यात आली आहेत़ ग्रामीण भागातील पाणीटंचाई भीषण बनली असून उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे़सध्या १२१ टँकर जिल्ह्यात सुरू असून सर्वाधिक ५१ टँकर मुखेड व लोहा तालुक्यात २३ टँकर सुरू आहेत़ ८७९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून नवीन ५०७ विंधन विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे़ तात्पुरता पाणीपुरवठा योजनेची ६३ कामे हाती घेण्यात आली असून १९३ नळयोजना दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत़ एकूण ६८़२१ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे़जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतर थांबवण्यासाठी व गावातच रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगार हमीची १०२१ कामे सुरू करण्यात आली आहेत़ त्यावर १३८६० मजूर काम करत आहेत़ दुष्काळ परिस्थितीमुळे रोजगार हमी योजनेच्या आदेशात काही बदल करण्यात आले आहेत़ यापूर्वी जलसंधारणावरील रोजगार हमीच्या कामांना तहसील कार्यालय प्रशासकीय मान्यता देण्यात येत होती़ मात्र आता कृषी विभागातच या कामांना मान्यतेचे अधिकार देण्यात आले आहेत़जिल्ह्यात पशूधन मोठ्या प्रमाणात असले तरी चारा टंचाईचा प्रश्न म्हणावा तेवढा गंभीर नाही़ त्यामुळे केवळ एक-दोन ठिकाणी चारा छावणीचे प्रस्ताव आले आहेत़ छावणीच्या रुपात जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढे आले पाहिजे, असेही डवले यांनी आवाहन केले़ दरम्यान, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना, शेतकरीपुत्र तसेच लोकप्रतिनिधींनी भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले़नांदेड शहरातील पाणीटंचाई गंभीरशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात अत्यल्प साठा राहिल्यामुळे जुलै अखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यासाठी प्रशासनाला कडक धोरण राबवावे लागणार आहे़सध्या विष्णुपूरी प्रकल्पात १५ जूनपर्यंत पुरेल एवढा साठा आहे़ त्यासाठी महापालिकेने हे पाणी काटकसरीने पुरवठा करण्याची गरज असल्याचे एकनाथ डवले यांनी सांगितले़

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड