शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:58 IST

जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर बनली असून ग्रामीण व शहरी भागात पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण कण्याच्या सूचना आज जिल्ह्याचे पालक सचिव तथा जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या़

ठळक मुद्देदुष्काळ परिस्थितीचा प्रधान सचिवांनी घेतला आढावा

नांदेड : जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर बनली असून ग्रामीण व शहरी भागात पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण कण्याच्या सूचना आज जिल्ह्याचे पालक सचिव तथा जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या़प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आज मुखेड तालुक्यातील मोटरगा, चांडोळा, भगनूरवाडी तसेच आसना नदी व विष्णूपुरी प्रकल्पाची पाहणी केली़ त्यानंतर त्यांनी दुपारी ४़३० वाजता जिल्हाधिकारी यांच्या कक्षात पत्रकारांशी संवाद साधला़ जिल्ह्यात दुष्काळ दूर करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने कृषी जलसंधारण व रोजगार हमीची कामे हाती घेण्यात आली आहेत़ ग्रामीण भागातील पाणीटंचाई भीषण बनली असून उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे़सध्या १२१ टँकर जिल्ह्यात सुरू असून सर्वाधिक ५१ टँकर मुखेड व लोहा तालुक्यात २३ टँकर सुरू आहेत़ ८७९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून नवीन ५०७ विंधन विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे़ तात्पुरता पाणीपुरवठा योजनेची ६३ कामे हाती घेण्यात आली असून १९३ नळयोजना दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत़ एकूण ६८़२१ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे़जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतर थांबवण्यासाठी व गावातच रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगार हमीची १०२१ कामे सुरू करण्यात आली आहेत़ त्यावर १३८६० मजूर काम करत आहेत़ दुष्काळ परिस्थितीमुळे रोजगार हमी योजनेच्या आदेशात काही बदल करण्यात आले आहेत़ यापूर्वी जलसंधारणावरील रोजगार हमीच्या कामांना तहसील कार्यालय प्रशासकीय मान्यता देण्यात येत होती़ मात्र आता कृषी विभागातच या कामांना मान्यतेचे अधिकार देण्यात आले आहेत़जिल्ह्यात पशूधन मोठ्या प्रमाणात असले तरी चारा टंचाईचा प्रश्न म्हणावा तेवढा गंभीर नाही़ त्यामुळे केवळ एक-दोन ठिकाणी चारा छावणीचे प्रस्ताव आले आहेत़ छावणीच्या रुपात जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढे आले पाहिजे, असेही डवले यांनी आवाहन केले़ दरम्यान, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना, शेतकरीपुत्र तसेच लोकप्रतिनिधींनी भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले़नांदेड शहरातील पाणीटंचाई गंभीरशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात अत्यल्प साठा राहिल्यामुळे जुलै अखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यासाठी प्रशासनाला कडक धोरण राबवावे लागणार आहे़सध्या विष्णुपूरी प्रकल्पात १५ जूनपर्यंत पुरेल एवढा साठा आहे़ त्यासाठी महापालिकेने हे पाणी काटकसरीने पुरवठा करण्याची गरज असल्याचे एकनाथ डवले यांनी सांगितले़

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड