शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची मनपाकडून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 1:06 AM

जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात समाज परिवर्तनाचे व्यापक काम केले. त्यांनी सामाजिक समतेचा जगाला संदेश दिला. नांदेड शहरात त्यांच्या पुतळा निर्मितीचे अभिवचन काँग्रेसने दिले होते़

नांदेड : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात समाज परिवर्तनाचे व्यापक काम केले. त्यांनी सामाजिक समतेचा जगाला संदेश दिला. नांदेड शहरात त्यांच्या पुतळा निर्मितीचे अभिवचन काँग्रेसने दिले होते़ त्यादृष्टीने महापालिकेच्या पातळीवरील सर्व मान्यतेच्या व जागा उपलब्धतेच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत़ परंतु शासनस्तरावर मान्यता रखडल्यामुळेच पुतळा बसविण्याचे काम प्रलंबित आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी केले.नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर व भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी सभापती माधवराव पांडागळे होते. तर आ. डी. पी. सावंत, महापौर शीलाताई भवरे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, उपमहापौर विनय गिरडे पाटील, शैलजा स्वामी, मेळाव्याचे संयोजक संतोष पांडागळे, संजय बेळगे, बालाजीराव पांडागळे यांच्यासह राजू शेट्टे, दिलीप डांगे, कैलास जाकापुरे, सुभाषअप्पा सराफ, पंडित लंगडे, विनोद कांचनगिरे, हरिहर पाटील कुरुळेकर, रितेश बुरांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.खा.चव्हाण म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांनी समानतेची शिकवण दिली. सामाजिक समतेची बीजे रोवली. संत बसवेश्वरांच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने देशाला गरज आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या विचारश्रेणीवर चालण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. समाजातील सर्व समाजघटकांना सोबत घेवून त्यांना मूलभूत गरजा पुरविल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, असे सांगतानाच कोणत्याही कामात राजकारण करणे योग्य नव्हे़ शहरातील बसेवश्वर पुतळा उभारणीची मनपास्तरावरील प्रक्रिया पूर्ण झाली आहे़ परंतु, शासनस्तरावर मान्यता न मिळाल्याने पुढील काम रखडले आहे. असे असतानासुद्धा काही मंडळी यातही राजकारण करुन याचे खापर काँग्रेस पक्षावर फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही बाब दुर्दैवी आहे. शासनाकडून मान्यता येताच शहरात बसवेश्वरांचा पुतळा बसविण्यात येईल,असे खा.चव्हाण यांनी सांगितले़अध्यक्षीय समारोपात माधवराव पांडागळे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन केले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पांडागळे यांनी केले.

टॅग्स :NandedनांदेडSocialसामाजिक