शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आॅनलाईनच्या घोळात अडकले प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:58 IST

महसूल विभागाकडून दिले जाणारे जात आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्यासाठी महाआॅनलाईनने १ जूनपासून आॅनलाइन पद्धत वापरण्यास सुरुवात केली असून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नसल्यामुळे गोंधळ उडाला आहे.

ठळक मुद्देधर्माबाद तालुका : अनेक फाईली पडूनऐन प्रवेशाच्या तोंडावर प्रमाणपत्र मिळेना पालक-विद्यार्थ्यांत संताप

धर्माबाद : महसूल विभागाकडून दिले जाणारे जात आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्यासाठी महाआॅनलाईनने १ जूनपासून आॅनलाइन पद्धत वापरण्यास सुरुवात केली असून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नसल्यामुळे गोंधळ उडाला आहे.तीन वर्षापासून असलेल्या निर्णयाची अंमलबजावणी दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लागण्याच्या काळातच करण्यात आल्यामुळे आठ दिवसांपासून धर्माबाद शहर, परिसरासह तालुक्यातील पालक व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असणारे उत्पन्न, रहिवाशी, वय, अधिवास, जात, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र महसूल विभागाकडून दिले जातात. २०१५ च्या शासन निर्णयानुसार ही सर्व प्रमाणपत्रे आॅफलाइन ऐवजी आॅनलाइन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीने द्यावे असा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार सध्या तहसील मधून जात व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र वगळता सर्व प्रमाणपत्रे महा आॅनलाईन पोर्टलवरून आॅनलाइन दिली जात आहेत.एक जून पासून ही दोन प्रमाणपत्रे आॅनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय अचानक पणे महा आॅनलाइन ने घेतला आहे. यामुळे सर्व यंत्रणा खोळंबली असून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळत नसल्याची स्थिती आहे. आॅनलाइन पद्धतीत प्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी तहसील स्तरावर नायब तहसीलदार, तहसीलदार यांनी कागदपत्रांची तपासणी करावयाची असून यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जात व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळणार आहे. अधिकाºयांना महा आॅनलाईन कडून आॅफलाइन बंद करून आॅनलाइन चालू करावे याबाबत कोणताच पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. तहसील स्तरावरील अधिकाºयांना त्यांचा लॉगिन आयडी अद्याप मिळालेला नाही. यामुळे कागदपत्रांची तपासणी करता येत नाही.धमार्बाद तहसील कार्यालयात अनेक फाईली पडून असून सेतु व तहसील कार्यालयाकडे पालक, विद्यार्थी हेलपाटे मारून परेशान आहेत. कोणते तरी कारण सांगुन सेतु वाले वापस करतात. काही दलाल आर्थिक लुट करून पोळी भाजून घेतात. सध्या शाळा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी लगबघ चालु असुन विविध प्रमाण पञासाठी गर्दी होत आहे. याकडे तहसीलदार दुर्लक्ष करित आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष घालून सध्या आॅफलाइन पद्धतीने जात व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.आपले सरकार केंद्रावरून प्रमाणपत्र मिळेनासध्या दहावी व बारावी परीक्षेचे निकाल लागल्यामुळे पुढील प्रवेशासाठी ही दोन प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहेत. याच काळात महा आॅनलाईन ने घातलेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तहसील कार्यालयातील सेतू सुविधा, आपले सरकार केंद्रावरून सध्या सदरील प्रमाणपत्रे काढून दिले जात नाहीत.

टॅग्स :NandedनांदेडonlineऑनलाइनInternetइंटरनेट