शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

हाळणी,कुपटीतील आगीत पाच घरे भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:41 IST

हाळणी येथे मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत पाच घरे जळून भस्मसात झाली़ या दुर्घटनेत संसारोपयोगी साहित्य खाक झाल्याने चार कुटुंबे उघड्यावर आली आहेत़

ठळक मुद्देवाढत्या तापमानाचा परिणाम मुखेड, माहूर तालुक्यातील घटनाकुटुंबे रस्त्यावर; लाखो रुपयांचे नुकसान

मुक्रमाबाद : हाळणी येथे मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत पाच घरे जळून भस्मसात झाली़ या दुर्घटनेत संसारोपयोगी साहित्य खाक झाल्याने चार कुटुंबे उघड्यावर आली आहेत़हाळणी येथील हणमंत यादवराव नामाजी, प्रकाश यादवराव नामाजी, विलास यादवराव नामाजी, पुष्पा नारायण नामाजी या शेतकऱ्यांच्या घरांचेआगीत नुकसान झाले़ गावातील बाळु मामा मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. याठिकाणी सुरू असलेल्या कीर्तनासाठी घरातील महिला, पुरुष गेले होते. तर उन्हाळ्यामुळे काहीजण अंगणात झोपले होते. रात्री उशीरा या चार शेतकरी कुंटूबांच्या घरांना अचानक आग लागली. आगीने झपाट्याने रौद्ररुप धारण केल्याने चारही घरे जळून खाक झाली. उदगीर येथील अग्निशामक दलाची गाडी मागविण्यात आली़ मात्र तोपर्यंत या चारही घरांचे मोठे नुकसान झाले होते़ मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गडीमे, जमादार सुरनर, तलाठी एम़जी़ जमदाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़ यावेळी दत्ता पाटील, गोपाळ पाटील, हणमंत मलापुरे, जळबा देवकत्ते, काशीनाथ राठोड उपस्थित होते.दरम्यान माहूर तालुक्यातील कुपटी येथे दिलीप चोखाजी कवडे यांच्या राहात्या शेतातील घराला मंगळवारला दुपारी दोनच्या सुमारात अचानक लागलेल्या आगीत जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले़यात स्प्रीकरचे ४० पाईप, बैलगाडी, गहू, ज्वारी, घरातील एलसीडी, फॅन, चना, कांदे, लसुण, घराचे दारे, खिडक्या व शेतातील पूर्ण साहित्य जळून खाक झाले़ घरामध्ये पूर्ण कुटूंब दुपारच्या वेळेस आराम करात होते. घरातील सिलेंडर, शेगडी पूर्णपणे जळून खाक झाली़ गावातील एका व्यक्तीने धाडस करुन ते सिलेंडर टाकी घराच्या पत्रावरुन जावून बाहेर काढली़ त्यामुळे मोठी जीवीत हानी टळळी़ घराला आग लागताच गावातील नागरीक धावून आले़ मात्र वा-याचा जोर जास्त असल्याने आग विजविण्यास विलंब लागला़ तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले होते़आगीत ८७ लाखांचे बगॅस खाक

  • लक्ष्मीनगर येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना परिसरातील बगॅसला लाग लागून ८७ लाखाचे नुकसान झाले़ कारखाना परिसरातील बगॅसला ३० एप्रिल रोजी तापमान वाढलेले असताना दुपारी १़४५ च्या सुमारास अचानक आग लागली़
  • या आगीमध्ये कारखान्याचे सुमारे सात हजार मे़टन बगॅस जळून खाक झाला़ या आगीमध्ये कारखान्याचे अंदाजे ८७ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कारखाना प्रशासनाने व्यक्त केला आहे़ या घटनेप्रकरणी विनायक कदम यांच्या तक्रारीवरून बारड पोलिस ठाण्यात प्रकरणाची नोंद घेण्यात आली.
टॅग्स :NandedनांदेडfireआगHomeघरFamilyपरिवार