शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नांदेड जिल्ह्यातील अकरा गावांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:35 IST

प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विकास न झाल्याचा आरोप करून जिल्ह्यातील ११ गावांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला़ यात हदगाव तालुक्यातील सर्वाधिक सात गावांचा समावेश होता़

नांदेड : प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विकास न झाल्याचा आरोप करून जिल्ह्यातील ११ गावांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला़ यात हदगाव तालुक्यातील सर्वाधिक सात गावांचा समावेश होता़देगलूर : तालुक्यातील पुंजरवाडी ग्रामस्थांनी रस्त्याच्या बांधणीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी नांदेड लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला. शहरापासून २३ किलोमीटर अंतरावर असलेल्या पुंजरवाडी गावात २६८ पुरुष तर २२९ महिला मतदार असे एकूण ४९७ मतदार आहेत. मागील अनेक वर्षांपासून लोणी ते पुंजरवाडी कच्चा रस्ता आहे. हा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी वारंवार निवेदने देऊन करण्यात आली एवढेच नव्हे तर ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा मार्ग ही अवलंबला होता. लहान मुले मुली शाळेत कसे जावावे, पक्का रस्ता नसल्यामुळे गावात अंबुलन्स सुद्धा येत नाहीत त्यामुळे आजारी व्यक्तीस दवाखान्यात बाजावर घालून नेण्याची वेळ सुद्धा आमच्यावर अनेक वेळा आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. केवळ रस्ता नसल्यामुळे दुसऱ्या गावात जावून विवाह करण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रस्त्यासाठी आ. सुभाष साबणे यांनी पालकमंत्री रामदास कदम यांना भेटण्यासाठी म्हणून गावातील काही युवक नांदेड येथे गेले होते. केवळ निवेदन घेऊन सोपस्कार पूर्ण करण्यात आले. गावात पोहचण्यास युवकांना खूप रात्र झाली होती़माध्यम प्रतिनिधींनी गाव गाठले परंतु मतदानाच्या दिवशी कुणालाही गावात येवू न देण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. ओळखपत्र दाखवल्यावरच माध्यम प्रतिनिधींना गावात येवून देण्यात आले.मांजरमवाडीकरांचा बहिष्काराने संतापनायगाव बाजार : उन्हाची तीव्रता वाढल्याने सकाळच्या वेळी मतदारांनी रांगा लावून मतदान केले असून नव मतदार मात्र उत्स्फूर्तपणे मतदानाला जाताना दिसून येत होते़ विविध मागण्यांसाठी मात्र मांजरमवाडीने मतदानावर बहिष्कार टाकला़तालुक्यातील घुंगराळा, देगाव, टाकळगाव, हिप्परगा, सोमठाणा, पाटोदा आदी केंद्रांना भेटी दिल्या असता १२ वाजेपर्यंत मतदार रांगा लावून मतदान करीत होते़ यात नवमतदार, महिला, वृद्ध यांची संख्या अधिक होती़ राजगडनगर येथे मतदारांना थांबण्यासाठी म्हणून टेन्ट टाकण्यात आले होत़े़ राष्ट्रवादीचे पांडुरंग गायकवाड, भीमराव झगडे, सुरेश डाकोरे, काँग्रेसचे पालनवार, चोडे हे मतदारांना मतदान करण्याची विनंती करीत होते़ उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारच्या वेळी बहुतांश मतदान केंद्रावर शुकशुकाट होता़ सायंकाळी ४़४५ च्या सुमारास पिंपळगाव येथे सरासरी ६० टक्के मतदान झाले़ ५़१० वाजता खैरगाव येथे ७५ टक्के मतदान झाले़ यावेळी काही मतदान मतदानासाठी येताना दिसत होते़ कार्यकर्ते मतदारांना मतदान करण्याची विनंती करत होते़ भाजपाचे श्रावण भिलवंडे, बालाजी बच्चेवार, शिवराज होटाळकर, अवकाश धुप्पेकर आदी मंडळी देखील गावोगाव भेटी देत होते़तालुक्यातील मांजरमवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकला़ तहसीलदारासह अनेकांनी गावकºयांची भेट घेवून मतदान करण्याची विनंती केली़ पण गावकरी आपल्या मतावर ठामच राहिले़ दरम्यान, मुखेड तालुक्यातील हासनाळ प.मु. ग्रामस्थांनीही मतदानावर बहिष्कार टाकला. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात ग्रामस्थांनी हे पाऊल उचलले. प्रशासनाने संवाद साधला परंतु यश मिळाले नाही.मतदारांच्या प्रतीक्षेत केंद्रातील अधिकारी-कर्मचारीहदगाव : तालुक्यातील मनाठा मंडळातील तरोडा, विठ्ठलवाडी, चोरंबा बु़, चोरंबा खु़, कुसळवाडी व खरबी, केदारगुडा या सात गावातील ग्रामस्थांनी गाव तलावाच्या प्रलंबित मागणीसाठी आज मतदानावर बहिष्कार टाकला़पळसवाडी तांडा शिवारातून मोठा नाला वाहतो़ हा नाला अडवून तलाव बांधावा ही मागणी या परिसरातील सात गावच्या ग्रामस्थांची आहे़ इसापूर धरणाचे पाणी मनाठा व तामसा मंडळामध्ये नाही़ आजूबाजूला कॅनॉल गेला़ परंतु ही दोन्ही मंडळे पाण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांचा आहे़ या परिसरातील नाल्याचे पाणी अडविल्यास शेतकºयांना सिंचनासाठी मोठी मदत होते़ परंतु या मागणीकडे लोकप्रतिनिधी वारंवार निवेदन देवूनही लक्ष देत नाहीत़ त्यामुळे या गावातील पुढाºयांनी मतदानावरच बहिष्कार टाकला़ काँग्रेसचे माजी आ़ माधवराव पाटील व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी ग्रामस्थांना समजून सांगितले़ परंतु ग्रामस्थांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही़प्रशासनाचे तहसीलदार वंदना निकुंभ, मंडळ अधिकारी सी़पी़ कळणे यांनी या गावांना भेट देवून दीड-दोन तास त्यांच्याशी चर्चाही केली़ परंतु चोरंबा खु़ येथील नागरिक आपल्या भूमिकेवर तटस्थ होते़ तरोडा गावात ३६, खरबीत ३५, कुसळवाडीत ३२ असे मतदान झाले़या मतदान केंद्रावर आलेले कर्मचारी दिवसभर मतदाराची प्रतीक्षा करत असल्याचे चित्र बघायला मिळाले़याचवर्षी पहिल्यांदाच मतदान करणाºया अनेक नवमतदारांचा हिरमोड झाला़ गावतलाठी व्यंकटेश कुलकर्णी यांनी तुम्हाला पाच वर्षे मतदान करण्यात येणार नसल्याचे सांगून २३ पैकी १३ मतदान करून घेतले़ चोरंबा खु़ येथील तरुणांनी मशीनला उदबत्ती लावून पूजा केली़ परंतु मशीनचे सील काढण्यासाठीही केंद्रावर कोणी फिरकले नाही़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडVotingमतदान