शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाकद शिवारात शेतकऱ्यासह मुलाचा तलावात बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 19:04 IST

भोकर तालूक्यातील वाकद शिवारातील सिताखांडी तलावात एका ५० वर्षीय शेतकऱ्यासह एका १५ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला.

नांदेड : भोकर तालूक्यातील वाकद शिवारातील सिताखांडी तलावात एका ५० वर्षीय शेतकऱ्यासह एका १५ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी १.३० वाजता घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, वाकद शिवारातील गट क्र. ७९ मधील आपल्या शेतात विठ्ठल मारोती मांजळकर (५०) हे शेणखत टाकत होते. यावेळी त्यांनी आपला मुलगा शिवाजी व गावातीलच  गोविंद ग्यानोबा वाकतकर (१५) याला मदतीसाठी सोबत घेतले. शेणखत टाकल्यानंतर गोविंद  व शिवाजी हे दोघे शेता जवळील सिताखांडी तलावात हात-पाय धुण्यासाठी उतरले. यावेळी गोविंद हा अचानक पाण्यात बुडू लागला, हे पासून शिवाजीने आरडाओरडा केली. मुलाच्या आवाजाने मांजळकर तेथे आले आणि त्यांनी तत्काळ गोविंदला वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली. मात्र, गोविंदला वाचविण्यात त्यांना अपयश आले. यासोबतच मांजळकरसुद्धा तलावात बुडाले आणि त्यांचाही मृत्यू झाला. 

घटनेची माहिती शिवाजीने गावात जावून दिल्यानंतर गावातील लोक घटनास्थळी धावून आले. पोहेका उमेश कारामुंगे व  पोलीस कर्मचारी एस.के.कंधारे यांनी पंचनामा करुन भोकर पोलीसात  आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या दुर्दैवी घटनेने वाकद गावावर शोककळा पसरली होती. मयत गोविंद हा सिताखांडी येथील संत गाडगेबाबा आश्रमशाळेत  आठव्या वर्गात शिक्षण घेत होता. आई - वडीलांना एकुलता एक मुलगा होता. तर मयत शेतकरी विठ्ठल मारोती मांजळकर यांच्यावर कुटुंबाची सारी बिस्त होती, त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुली, २ मुले असा परिवार आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूWaterपाणीagricultureशेती