शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

बारूळ मंडळातील ढगफुटीतील नुकसान म्हणे निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 01:32 IST

बारूळ, उस्माननगर मंडळात २१ व २२ रोजी मुसळधार पाऊस तर २३ जून रोजी ढगफुटी झाली होती़ यात जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठी झाली़ या नुकसानीत पंचनाम्यामध्ये तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकाने मात्र नुकसान निरंकचा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांमार्फत तहसील कार्यालयाकडे सादर केल्याने शेतकºयात संताप व्यक्त होत आहे़ या घटनेमुळे अधिकारी व पदाधिकाºयांनी केलेली पाहणी हे नाटक होते का? असा प्रश्न शेतकरी व नागरिक करीत आहेत़ या अहवालसाठी तब्बल चार महिने लागल्याने संशय निर्माण होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबारूळ (ता. कंधार) : बारूळ, उस्माननगर मंडळात २१ व २२ रोजी मुसळधार पाऊस तर २३ जून रोजी ढगफुटी झाली होती़ यात जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठी झाली़ या नुकसानीत पंचनाम्यामध्ये तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकाने मात्र नुकसान निरंकचा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांमार्फत तहसील कार्यालयाकडे सादर केल्याने शेतकºयात संताप व्यक्त होत आहे़या घटनेमुळे अधिकारी व पदाधिकाºयांनी केलेली पाहणी हे नाटक होते का? असा प्रश्न शेतकरी व नागरिक करीत आहेत़ या अहवालसाठी तब्बल चार महिने लागल्याने संशय निर्माण होत आहे़बारूळ महसूल मंडळातील २० गावे असून त्यात बारूळ, रहाटी, वरवंट, मजरे वरवंट, चौकीपाया, कौठा, कौठावाडी, शिरूर, काटकळंबा, तेलूर, चिखली, औराळ, हिस्से औराळ, मंगलसांगवी, नंदनवन, हाळदा, भूकमारी, धानोरा कौठा, चौकी महाकाया तर उस्माननगर मंडळात शिराढोण, भुत्याचीवाडी, आलेगाव, दाताळा, सावळेश्वर, लाठी बु़, भंडार कुमठ्याचीवाडी, बामणी (पक़़), दहीकळंबा, लाडका, मुंडा, दिंडा, बिंडा, पांगरा, संगुचीवाडी, खुड्याचीवाडी या गावांत सलग तीन पाऊस व ढगफुटी झाल्याने घराघरांमध्ये पाणीच पाणी, तसेच रस्ते, गल्लीमध्ये तीन फूट ते चार फूट पाणी वाहू लागले होते़ यात संसारोपयोगी सामानासह घरातील शेती उपयोगी व शेतातील खते, साहित्य वाहून गेले़ शेती खरडून गेली़ शेतातील उभी पिके वाहून गेली़ दगडी पऊळ वाहून गेले होते़या ढगफुटीमध्ये बारूळ महावितरण कंपनीचे २ लाख ३० हजारांचे नुकसान झाले होते़ अनेकांची घरे पडली़ या सर्व घटनेने नागरिक भयभीत झाले होते़ या घटनेची माहिती कळताच २४ रोजी आजी-माजी आमदार, उपविभागीय अधिकारी, विविध पक्षाचे लोकप्रतिनिधींनी पाहणी केली व नागरिक-शेतकºयांना दिलासा दिला़ काही लोकप्रतिनिधींनी तातडीने संसारोपयोगी सामानासाठी आर्थिक मदत केली़

  • तालुक्याच्या तत्कालीन तहसीलदार अरुणा संगेवार यांनी संबंधित सज्जाचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांन पत्र काढून सांगितले की बारूळ, उस्माननगर मंडळातील पाहणी केली असता शेती, पिकांची व नागरिकांचे मोठे नुकसान झाले़ त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले़ आदेशानुसार कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांनी पंचनामे केले़ बारूळ, उस्माननगर मंडळातील शेती व पिकांची नुकसान निरंक अशी माहिती मंडळ अधिकारी यांच्या अहवालातून तहसील कार्यालयाकडे देण्यात आली़ तब्बल चार महिन्यांपासून शेतकरी, नागरिक झालेल्या नुकसान भरपाईची मदतीची प्रतीक्षा करत होते.
  • बारूळ, उस्माननगर मंडळात झालेल्या अतिवृष्टीत शेती व पिकांचे नुकसान मंडळ अधिकारी यांच्या अहवालानुसार निरंक आहे - उत्तम जोशी (लिपीक), नैसर्गिक व आपत्ती व्यवस्थापन, तहसील कार्यालय, कंधाऱ
  • तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या पंचनाम्यानुसार सदरील माहिती तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आली़ याकामी १३ तलाठी, १३ कृषी सहाय्यक, १३ ग्रामसेवकांनी काम केले -एम़ई़मेथे (मंडळ अधिकारी, बारूळ)
  • बारूळ, उस्माननगर मंडळातील झालेल्या ढगफुटीमुळे पिकांचे व शेतीचे नुकसान कृषी, तलाठी, ग्रमासेवकाने निरंक दाखविलेली बाब चुकीची असून शेती व पिकांचे अंदाजे ३०० हेक्टर नुकसान झालेला प्राथमिक अंदाज असताना नुकसान निरंक दाखविले़ शेतकºयाला नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल -गुलाब जाधव, छावा तालुका उपाध्यक्ष, कंधाऱ
  • शेतीवरील पंचनामे झालेले व नंतर झालेले पंचनामे वेगळे आहेत? याविषयी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात येईल -सत्यनारायण मानसपुरे (पं़स़ सदस्य )
टॅग्स :NandedनांदेडRainपाऊस