शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

बारूळ मंडळातील ढगफुटीतील नुकसान म्हणे निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 01:32 IST

बारूळ, उस्माननगर मंडळात २१ व २२ रोजी मुसळधार पाऊस तर २३ जून रोजी ढगफुटी झाली होती़ यात जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठी झाली़ या नुकसानीत पंचनाम्यामध्ये तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकाने मात्र नुकसान निरंकचा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांमार्फत तहसील कार्यालयाकडे सादर केल्याने शेतकºयात संताप व्यक्त होत आहे़ या घटनेमुळे अधिकारी व पदाधिकाºयांनी केलेली पाहणी हे नाटक होते का? असा प्रश्न शेतकरी व नागरिक करीत आहेत़ या अहवालसाठी तब्बल चार महिने लागल्याने संशय निर्माण होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबारूळ (ता. कंधार) : बारूळ, उस्माननगर मंडळात २१ व २२ रोजी मुसळधार पाऊस तर २३ जून रोजी ढगफुटी झाली होती़ यात जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठी झाली़ या नुकसानीत पंचनाम्यामध्ये तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकाने मात्र नुकसान निरंकचा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांमार्फत तहसील कार्यालयाकडे सादर केल्याने शेतकºयात संताप व्यक्त होत आहे़या घटनेमुळे अधिकारी व पदाधिकाºयांनी केलेली पाहणी हे नाटक होते का? असा प्रश्न शेतकरी व नागरिक करीत आहेत़ या अहवालसाठी तब्बल चार महिने लागल्याने संशय निर्माण होत आहे़बारूळ महसूल मंडळातील २० गावे असून त्यात बारूळ, रहाटी, वरवंट, मजरे वरवंट, चौकीपाया, कौठा, कौठावाडी, शिरूर, काटकळंबा, तेलूर, चिखली, औराळ, हिस्से औराळ, मंगलसांगवी, नंदनवन, हाळदा, भूकमारी, धानोरा कौठा, चौकी महाकाया तर उस्माननगर मंडळात शिराढोण, भुत्याचीवाडी, आलेगाव, दाताळा, सावळेश्वर, लाठी बु़, भंडार कुमठ्याचीवाडी, बामणी (पक़़), दहीकळंबा, लाडका, मुंडा, दिंडा, बिंडा, पांगरा, संगुचीवाडी, खुड्याचीवाडी या गावांत सलग तीन पाऊस व ढगफुटी झाल्याने घराघरांमध्ये पाणीच पाणी, तसेच रस्ते, गल्लीमध्ये तीन फूट ते चार फूट पाणी वाहू लागले होते़ यात संसारोपयोगी सामानासह घरातील शेती उपयोगी व शेतातील खते, साहित्य वाहून गेले़ शेती खरडून गेली़ शेतातील उभी पिके वाहून गेली़ दगडी पऊळ वाहून गेले होते़या ढगफुटीमध्ये बारूळ महावितरण कंपनीचे २ लाख ३० हजारांचे नुकसान झाले होते़ अनेकांची घरे पडली़ या सर्व घटनेने नागरिक भयभीत झाले होते़ या घटनेची माहिती कळताच २४ रोजी आजी-माजी आमदार, उपविभागीय अधिकारी, विविध पक्षाचे लोकप्रतिनिधींनी पाहणी केली व नागरिक-शेतकºयांना दिलासा दिला़ काही लोकप्रतिनिधींनी तातडीने संसारोपयोगी सामानासाठी आर्थिक मदत केली़

  • तालुक्याच्या तत्कालीन तहसीलदार अरुणा संगेवार यांनी संबंधित सज्जाचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांन पत्र काढून सांगितले की बारूळ, उस्माननगर मंडळातील पाहणी केली असता शेती, पिकांची व नागरिकांचे मोठे नुकसान झाले़ त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले़ आदेशानुसार कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांनी पंचनामे केले़ बारूळ, उस्माननगर मंडळातील शेती व पिकांची नुकसान निरंक अशी माहिती मंडळ अधिकारी यांच्या अहवालातून तहसील कार्यालयाकडे देण्यात आली़ तब्बल चार महिन्यांपासून शेतकरी, नागरिक झालेल्या नुकसान भरपाईची मदतीची प्रतीक्षा करत होते.
  • बारूळ, उस्माननगर मंडळात झालेल्या अतिवृष्टीत शेती व पिकांचे नुकसान मंडळ अधिकारी यांच्या अहवालानुसार निरंक आहे - उत्तम जोशी (लिपीक), नैसर्गिक व आपत्ती व्यवस्थापन, तहसील कार्यालय, कंधाऱ
  • तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या पंचनाम्यानुसार सदरील माहिती तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आली़ याकामी १३ तलाठी, १३ कृषी सहाय्यक, १३ ग्रामसेवकांनी काम केले -एम़ई़मेथे (मंडळ अधिकारी, बारूळ)
  • बारूळ, उस्माननगर मंडळातील झालेल्या ढगफुटीमुळे पिकांचे व शेतीचे नुकसान कृषी, तलाठी, ग्रमासेवकाने निरंक दाखविलेली बाब चुकीची असून शेती व पिकांचे अंदाजे ३०० हेक्टर नुकसान झालेला प्राथमिक अंदाज असताना नुकसान निरंक दाखविले़ शेतकºयाला नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल -गुलाब जाधव, छावा तालुका उपाध्यक्ष, कंधाऱ
  • शेतीवरील पंचनामे झालेले व नंतर झालेले पंचनामे वेगळे आहेत? याविषयी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात येईल -सत्यनारायण मानसपुरे (पं़स़ सदस्य )
टॅग्स :NandedनांदेडRainपाऊस