शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

निवडणुकांच्या तोंडावर दंगली घडविण्याचा भाजपाचा डाव : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 15:14 IST

निवडणुकांच्या तोंडावर दंगली घडविण्याचा भाजपाचा कुटील डाव असल्याचे सांगत यात इलेक्ट्रॉनिक मिडियाही सहभागी असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड़प्रकाश आंबेडकर यांनी केला़

नांदेड : आपण काय बोलतो आहोत, याचे कसलेही ताळतंत्र नसलेल्या माणसाच्या तोंडून चिथावणीखोर वक्तव्य घेऊन त्यांना प्रसिद्धी दिली जात आहे़ हा निवडणुकांच्या तोंडावर दंगली घडविण्याचा भाजपाचा कुटील डाव असल्याचे सांगत यात इलेक्ट्रॉनिक मिडियाही सहभागी असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड़प्रकाश आंबेडकर यांनी केला़

वंचित बहुजन यात्रेच्या निमित्ताने नांदेड येथे आलेल्या अ‍ॅड़आंबेडकर यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला़ सामाजिक स्वातंत्र्यासाठी डॉ़बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे जाहीर दहन केले़ मनुस्मृती सांगत असलेली अमानवी व्यवस्था समाजाच्या हिताची नाही़ त्यामुळेच त्यांनी मनुस्मृतीला नाकारले़ हा इतिहास असताना असंबंध वक्तव्य करणाऱ्या माणसाला प्रसिद्धी दिली जात आहे़ चुकीचा प्रचार केला जात आहे़ यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपासह हिंदूत्ववादी संघटनेचे प्रचारक सामील आहेत़ त्यात इलेक्ट्रॉनिक मिडियाही सहभागी असल्याचे स्पष्ट होत आहे असे अ‍ॅड़आंबेडकर यावेळी म्हणाले़  भाजपा, स्वयंसेवक संघ हे लोकशाहीवादी नाहीत़ तर ते वैदिक विचारसरणीला मानतात़ तर महाराष्ट्रातला वारकरी वर्ग लोकशाहीवादी आहे़ त्यामुळेच आता संघ आणि त्यांचे प्रचारक वारकऱ्यांच्या मागे लागल्याचा आरोपही त्यांनी केला़ 

केंद्र सरकारच्या कारभारामुळे संविधान धोक्यातकेंद्र सरकारच्या एकूण कारभारामुळे देशातील संविधान धोक्यात आले आहे़ त्यामुळेच काँग्रेससह समविचारी पक्षांनी एकत्रित येवून आगामी निवडणुकांना सामोरे जावे अशी आमची भूमिका आहे़ लोकशाहीच्या सामाजिककरणाची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे, असे आम्हाला वाटते़ त्यामुळेच महाराष्ट्रात विखुरलेल्या वंचित समाजाला सोबत घेण्याची आवश्यकता आहे़ काँगे्रसने आघाडीमध्ये वंचित घटकातील धनगर आणि माळी या समाजातील दोघांना, छोट्या ओबीसीतील दोघांना, भटक्या विमुक्तासाठी दोन आणि मुस्लिम समाजातील दोघांना अशा १२ जागा द्यायचे मान्य केल्यास आम्ही काँग्रेससोबत जाऊ़ आम्ही प्रस्ताव दिला आहे, आता निर्णय काँग्रेसने घ्यायचा आहे, असे सांगत राष्ट्रवादीसोबत मात्र सध्या तरी कुठलीही चर्चा नसल्याचे अ‍ॅड़ आंबेडकर यांनी स्पष्ट केले़ राष्ट्रवादीने समाजातील छोट्या घटकाकडे बघण्याची आपली दृष्टी बदलावी, अन्यथा त्यांच्यासोबत पुढेही चर्चा होणार नाही, असे ते म्हणाले़ 

कोणाबरोबर जायचे ते योग्यवेळी ठरवू़ एमआयएम संदर्भात एका मौलवींनी आमच्याकडे आघाडी संदर्भात चर्चा केली़ मात्र ओवेसी अथवा एमआयएममधील इतर कुठल्याही पदाधिकाऱ्यांशी आमची चर्चा झालेली नाही़ मात्र कोणाबरोबर जायचे ते आम्ही योग्यवेळी ठरवू़ एमआयएम संदर्भात कोण काय म्हणते, त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही़ आमचा स्वतंत्र पक्ष आहे़ या देशात ज्यांचा सर्वधर्मसमभावावर विश्वास आहे, देशाचे संविधान जे मानतात, यात एमआयएम बसत असेल तर त्यांनाही सोबत घेऊ, असेही अ‍ॅड़प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले़ लहान ओबीसी समुहात आपल्याला वापरल्या जात आहे़ व्यवस्थेबाहेर ठेवले जात आहे़ याची जाणीव होत आहे़ हा वंचितपणा घालविण्यासाठी अगोदर श्रेष्ठत्वाची संकल्पना संपविली पाहिजे़ हेच काम वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून सुरू केल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले़  यावेळी माजी आ़हरिभाऊ भदे, विजयराव मोरे, रामचंद्र येईलवाड, इलियास सय्यद, नागोराव शेंडगे, प्रा़यशपाल भिंगे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती़ 

वंचित बहुजन आघाडीला वाढता प्रतिसादपोटासाठी भिक्षा मागणाऱ्या पाच जणांची निर्घृण हत्या झाली़ ही घटना अत्यंत दु:खदायक होती़ आजही गावपातळीवरील व्यवस्था कशा पद्धतीची आहे, यातून पुढे झाले़ या घटनेनंतर आम्ही पुण्यामध्ये बैठक घेतली़ या बैठकीत वंचित बहुजन आघाडीची संकल्पना पुढे आली़ गावागावात संख्येने कमी, परंतु मतदारसंघात निर्णायक असणारे हे छोटे घटक आहेत़ या घटकांनी एकमेकांना स्वीकारले पाहिजे़ या विचारातून वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाल्याचे सांगत ११ जिल्ह्यांत या आघाडीला मिळत असलेला प्रतिसाद दिलासादायक असल्याचे सांगत अगोदर सामाजिक बदल आणि त्यानंतर राजकीय अशी यामागची भूमिका असल्याचे अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर म्हणाले़

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाElectionनिवडणूकGovernmentसरकार