शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

विश्वास गमाविल्यानेच भाजपाची ओहोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:03 IST

अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मते घेतलेल्या भाजपा सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे एकही काम केले नाही़ महागाईने आज कळस गाठला असून सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे़

ठळक मुद्देमुदखेडमध्ये सभा अशोकराव चव्हाण यांचे प्रतिपादन

मुदखेड : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मते घेतलेल्या भाजपा सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे एकही काम केले नाही़ महागाईने आज कळस गाठला असून सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे़ हे सरकार यापुढेही काही करेल, असा विश्वास आता खुद्द जनतेमध्येच राहिला नसल्याने राजस्थान, मध्य प्रदेशच नव्हे तर देशभरात भाजपाची ओहोटी सुरू झाली आहे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़शहरातील भोकर रोडवरील नई आबादी परिसरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते़ मंचावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नगराध्यक्ष मुजिब अन्सारी जहांगीरदार, उपाध्यक्ष बालाजी गोडसे, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे, गटनेते माधव कदम, श्याम चंद्रे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती़ नोटबंदीचा शासनाचा प्रयोग पूर्णपणे फसला आहे़ नोटबंदी जाहीर करताना त्यामुळे दहशतवाद संपेल असा दावा शासनाने केला होता़ पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरी जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोजन केले़ दुसरीकडे देशाचे संरक्षण करणारे जवान दररोज शहीद होत आहेत़ दहशतवाद तर थांबलाच नाही, उलट त्याची व्याप्ती आणि तीव्रता वाढल्याचे सांगत याला सर्वस्वी केंद्र सरकारची धोरणे जबाबदार असल्याचे ते म्हणाले़ शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करू अशा वारंवार घोषणा सरकारकडून केल्या जातात़ प्रत्यक्षात शेतकºयांची अवस्था या सरकारच्या काळात दयनीय झाली आहे़ सुमारे १२ हजारांहून अधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत़ मात्र त्यानंतरही सरकारला जाग येत नसल्याचे सांगत शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिक येणाºया निवडणुकीत या सरकारला धडा शिकवतील, असा विश्वासही खा़चव्हाण यांनी व्यक्त केला़ मोदी सरकारच्या दबावामुळेच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला राजीनामा द्यावा लागल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला़मुदखेड शहर स्वच्छ, सुंदर असावे यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे़ नगरपालिकेच्या माध्यमातून पाणी, स्वच्छतेसह घरकुलाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे़ शहराच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला़ तालुक्याच्या ग्रामीण भागात आमदार निधीतून २० कोटींची तर मुदखेड शहरात १४ कोटींची कामे सुरू असल्याचे सांगत येणाºया काळात सर्वांच्या सहकार्याने शहराचा चेहरामोहरा बदलू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली़

 

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाElectionनिवडणूक