शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

भाजपा सरकार शेतक-यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:44 IST

केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार शेवटी कुणासाठी राज्य करीत आहे, असा थेट सवाल करीत गत साडेतीन वर्षांत एकही हिताचा निर्णय या सरकारने घेतला नाही़ शिक्षक, नोकरदार, उद्योजकासह सर्वजण मेटाकुटीला आले असून हे सरकार शेतक-यांच्या मुळावर उठले असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

ठळक मुद्देमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कउमरी / माहूर : केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार शेवटी कुणासाठी राज्य करीत आहे, असा थेट सवाल करीत गत साडेतीन वर्षांत एकही हिताचा निर्णय या सरकारने घेतला नाही़ शिक्षक, नोकरदार, उद्योजकासह सर्वजण मेटाकुटीला आले असून हे सरकार शेतक-यांच्या मुळावर उठले असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त उमरी आणि माहूर येथे आयोजित सभांमध्ये ते बोलत होते़ उमरीच्या मोंढा मैदानावर झालेल्या हल्लाबोल मोर्चाप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. सतीश चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आ. विक्रम काळे, माजीमंत्री कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, नगराध्यक्षा अनुराधा खांडरे, कल्पना पाटील डोंगळीकर, संग्राम कोते पाटील, बसवराज नागराळकर, ईश्वर बालबुद्धे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पवार म्हणाले, भाजपा सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा केली. आजवर एकाही शेतकºयाच्या खात्यात कर्जाची रक्कम भरण्यात आली नाही. शरदचंद्र पवार यांनी केंद्रात असताना ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली़ परंतु, कसलाच आॅनलाईन फॉर्म भरण्याची सक्ती न करता सरसकट कर्जमाफी दिली. नव्याने निर्माण झालेले तेलंगणा राज्य शेतकºयांना २४ तास मोफत वीज देण्याची घोषणा करते़ परंतु, राज्य निर्मितीला ५७ वर्षे पूर्ण होवून महाराष्ट्रात अद्याप आठ तास वीज बरोबर मिळत नाही. उलट हे सरकार विजेचे कनेक्शन तोडायला निघाले. आम्ही गोदावरी नदीवर नाथसागरपासून बाभळीपर्यंत १२ बॅरेजेस बांधले. नांदेड जिल्ह्यात या भाजपा सरकारने एकही धरण बांधले नसल्याचा आरोप पवार यांनी केला़ महिलांवरील अत्याचार वाढले, शिष्यवृत्तीसाठी यांच्याकडे पैसा नाही. एकाही तरुणाला रोजगार दिला नाही. नांदेडमध्ये एकही नवीन कारखाना या सरकारने आणला नाही. सोयाबीन, कापसाला भाव नाही. पीकविम्याचे पैसे देण्यासाठी सरकार चालढकल करीत आहे. एकंदरीत शेतकºयांच्या कुठल्याच प्रश्नावर भाजप सरकार गंभीर नसून केवळ फसव्या जाहिराती व पोकळ आश्वासने देवून महाराष्टÑातील जनतेला गाजर दाखविले असा आरोप पवारांनी केला.यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारवर टीका करताना राज्यात १४०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन सरकार अनेकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत असून सामान्य माणसाला जगणे कठीण झाल्याचे सांगितले.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यावेळी म्हणाले, ‘देश बदल रहा है’ म्हणणाºयांना आता महाराष्टÑ बदललल्याचे नक्कीच लक्षात येईल. मंत्रिमंडळातील एकही मंत्री शेतकरी नाही. त्यामुळे त्यांना शेतकºयांचे प्रश्न कळणार नाहीत. यावेळी सभापती शिरीषराव गोरठेकर, ईश्वरराव भोसीकर, राजेश देशमुख, प्रवीण सारडा, तालुकाध्यक्ष मारोतराव कवळे, कैलासराव गोरठेकर, राजेश कुंटूरकर, भास्कर भिलवंडे, जि. प. सदस्या ललिता यलमगोंडे, संगीता जाधव, खाजासेठ कुरेशी, पल्लवी मुंगल, रमेश सरोदे, गणेशराव गाढे उपस्थित होते़ सूत्रसंचालन सदाशिव पुपुलवाड यांनी तर डॉ. विक्रम देशमुख यांनी आभार मानले.उद्धव ठाकरे आमदाराला भीत आहेतशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर पूर्वी त्यांचे आमदार उभे राहण्याची हिंमत करीत नव्हते़ आज त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हेच आमदारांसमोर थरथर कापत आहेत. शिवसेनेचा आता कसलाच धाक राहिला नसल्याचे सांगत अजित पवार यांनी शिवसेनेवर टीका केली.