शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

भाजपा सरकार शेतक-यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:44 IST

केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार शेवटी कुणासाठी राज्य करीत आहे, असा थेट सवाल करीत गत साडेतीन वर्षांत एकही हिताचा निर्णय या सरकारने घेतला नाही़ शिक्षक, नोकरदार, उद्योजकासह सर्वजण मेटाकुटीला आले असून हे सरकार शेतक-यांच्या मुळावर उठले असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

ठळक मुद्देमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कउमरी / माहूर : केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार शेवटी कुणासाठी राज्य करीत आहे, असा थेट सवाल करीत गत साडेतीन वर्षांत एकही हिताचा निर्णय या सरकारने घेतला नाही़ शिक्षक, नोकरदार, उद्योजकासह सर्वजण मेटाकुटीला आले असून हे सरकार शेतक-यांच्या मुळावर उठले असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त उमरी आणि माहूर येथे आयोजित सभांमध्ये ते बोलत होते़ उमरीच्या मोंढा मैदानावर झालेल्या हल्लाबोल मोर्चाप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. सतीश चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आ. विक्रम काळे, माजीमंत्री कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, नगराध्यक्षा अनुराधा खांडरे, कल्पना पाटील डोंगळीकर, संग्राम कोते पाटील, बसवराज नागराळकर, ईश्वर बालबुद्धे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पवार म्हणाले, भाजपा सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा केली. आजवर एकाही शेतकºयाच्या खात्यात कर्जाची रक्कम भरण्यात आली नाही. शरदचंद्र पवार यांनी केंद्रात असताना ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली़ परंतु, कसलाच आॅनलाईन फॉर्म भरण्याची सक्ती न करता सरसकट कर्जमाफी दिली. नव्याने निर्माण झालेले तेलंगणा राज्य शेतकºयांना २४ तास मोफत वीज देण्याची घोषणा करते़ परंतु, राज्य निर्मितीला ५७ वर्षे पूर्ण होवून महाराष्ट्रात अद्याप आठ तास वीज बरोबर मिळत नाही. उलट हे सरकार विजेचे कनेक्शन तोडायला निघाले. आम्ही गोदावरी नदीवर नाथसागरपासून बाभळीपर्यंत १२ बॅरेजेस बांधले. नांदेड जिल्ह्यात या भाजपा सरकारने एकही धरण बांधले नसल्याचा आरोप पवार यांनी केला़ महिलांवरील अत्याचार वाढले, शिष्यवृत्तीसाठी यांच्याकडे पैसा नाही. एकाही तरुणाला रोजगार दिला नाही. नांदेडमध्ये एकही नवीन कारखाना या सरकारने आणला नाही. सोयाबीन, कापसाला भाव नाही. पीकविम्याचे पैसे देण्यासाठी सरकार चालढकल करीत आहे. एकंदरीत शेतकºयांच्या कुठल्याच प्रश्नावर भाजप सरकार गंभीर नसून केवळ फसव्या जाहिराती व पोकळ आश्वासने देवून महाराष्टÑातील जनतेला गाजर दाखविले असा आरोप पवारांनी केला.यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारवर टीका करताना राज्यात १४०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन सरकार अनेकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत असून सामान्य माणसाला जगणे कठीण झाल्याचे सांगितले.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यावेळी म्हणाले, ‘देश बदल रहा है’ म्हणणाºयांना आता महाराष्टÑ बदललल्याचे नक्कीच लक्षात येईल. मंत्रिमंडळातील एकही मंत्री शेतकरी नाही. त्यामुळे त्यांना शेतकºयांचे प्रश्न कळणार नाहीत. यावेळी सभापती शिरीषराव गोरठेकर, ईश्वरराव भोसीकर, राजेश देशमुख, प्रवीण सारडा, तालुकाध्यक्ष मारोतराव कवळे, कैलासराव गोरठेकर, राजेश कुंटूरकर, भास्कर भिलवंडे, जि. प. सदस्या ललिता यलमगोंडे, संगीता जाधव, खाजासेठ कुरेशी, पल्लवी मुंगल, रमेश सरोदे, गणेशराव गाढे उपस्थित होते़ सूत्रसंचालन सदाशिव पुपुलवाड यांनी तर डॉ. विक्रम देशमुख यांनी आभार मानले.उद्धव ठाकरे आमदाराला भीत आहेतशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर पूर्वी त्यांचे आमदार उभे राहण्याची हिंमत करीत नव्हते़ आज त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हेच आमदारांसमोर थरथर कापत आहेत. शिवसेनेचा आता कसलाच धाक राहिला नसल्याचे सांगत अजित पवार यांनी शिवसेनेवर टीका केली.