शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

सुप्रिया सुळेंची छोटी कृती, मोठा संदेश; यात्रा मार्गातील कचरा उचलत जागरूकतेची झलक

By सुमेध उघडे | Updated: November 10, 2022 18:51 IST

राहुल गांधींच्या साथीला राष्ट्रवादी; खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील यात्रेत सहभागी

नांदेड : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा आज नांदेड शहरात दाखल झाली. यावेळी त्यांच्या साथीला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिसून येत आहेत. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहभागाने यात्रेत उत्साह संचारला होता. दरम्यान, खा. सुळे यांच्या एका छोट्या कृतीने पदयात्रेत मोठा संदेश गेला आहे. यात्रेच्या मार्गात प्लास्टिक बॅगचा कचरा दिसताच नकळत खा. सुळे यांनी उचलून घेतला. 

महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा राहुल गांधी नांदेडात घेणार असून, त्यांच्या सभेची उत्सुकता ताणली गेली आहे. आज दुपारी पदयात्रा नांदेड शहरात दाखल झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसचे नेते खा. सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी यात्रेत सहभाग घेतला. त्यांच्या सहभागाने यात्रेस आणखी बळ मिळाल्याचे चित्र होते. खा. सुळे आणि जयंत पाटील यांनी यात्रेकरुंसोबत संवाद साधला. खा. सुळे मनमोकळ्या संवादासाठी प्रसिद्ध आहेत. यामुळे त्यांच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांची गर्दी होती. यात्रा शिवाजी नगर येथे आली असता खा. सुळे यांना समोरील मार्गात प्लास्टिकचा बॅगचा कचरा दिसला. सर्वजण त्यावरून जात असताना खा. सुळे यांनी ती बॅग खाली वाकून उचलली. खूप गर्दी असतानाही रस्त्यात पडलेला कचरा दिसताच एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडत त्यांनी सहज प्लास्टिक बॅग उचलली. त्यांच्या या छोट्या कृतीने सहभागी सर्वांना मोठा संदेश दिला आहे. साधेपणासोबत खा. सुळे यांच्या जागरूकतेची चर्चा यानिमित्ताने यात्रेकरूंमध्ये सुरु होती. 

राहुल गांधी काय बोलणार ?

कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला. ६० दिवसांचा प्रवास करून या यात्रेने ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून महाराष्ट्रात प्रवेश केला. दोन दिवसांपासून ही यात्रा जिल्ह्यात आहे. देगलूर या तालुक्यातील वेन्नाळी, आटकळी, बिलोली तालुक्यांतील खतगाव फाटा, भोपाळामार्गे ही यात्रा ९ नोव्हेंबर रोजी नायगाव तालुक्यातील शंकरनगर येथे पोहोचली आहे. आज शंकरनगर, नायगाव आणि कृष्णूरपर्यंतचा प्रवास करून ही यात्रा दुपारी नांदेड शहरातील देगलूर नाका येथे पोहोचली. संध्याकाळी शहरातील नवा मोंढा येथे राहुल गांधी राज्यातील पहिल्या जाहीर सभेस संबोधित करणार आहेत. 

राज्याच्या राजकारणावर काय बोलणार?महाराष्ट्रात शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. शिवसेनेतील बंडाळीनंतर हे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे गट- भाजपचे सरकार स्थापन झाले. यावर राहुल गांधी काय बोलतात? देशातील महागाई, बेरोजगारी, शिक्षणाच्या प्रश्नावरही त्यांची भूमिका गुरुवारी जाहीर सभेतून पुढे येणार आहे. त्यामुळे या जाहीर सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राNandedनांदेडSupriya Suleसुप्रिया सुळेRahul Gandhiराहुल गांधी