शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Bandh : अन्नदात्याच्या आंदोलनाला नांदेडकरांचा पाठिंबा; जिल्ह्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 17:06 IST

Bharat Bandh In Nanded : नांदेडकरांनी स्वत : हून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला.

ठळक मुद्देआजच्या बंदमध्ये कुठेही अनुचित प्रकार झाला नाही.राजकीय पक्ष आणि संघटना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.

नांदेड- केंद्र सरकारने मंजूरी दिलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकर्यांनी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला नांदेड जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. नांदेडकरांनी स्वत : हून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला. तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, डावी आघाडी यासह इतर पक्ष आणि संघटना शेतकर्यांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.

आजच्या बंदमध्ये कुठेही अनुचित प्रकार झाला नाही.केंद्र सरकारने आणलेला कृषी कायदा हा शेतकर्यांच्या विरोधात असल्यामुळे पंजाब, हरियाणासह अनेक राज्यातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेर्या झाल्यानंतरही त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. नांदेडात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी व डावी आघाडीचे कार्यकर्ते शेतकर्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी चौक येथून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत महिला कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग होता.

आयटीआय चौक येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ आंदोलनकर्त्यांनी निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर डावी लोकशाही आघाडी व समविचारी संघटनेने निदर्शने केली. देगलूर नाका येथे काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. या आंदोलनात माजी मंत्री डी.पी.सावंत, महापौर मोहिनी येवनकर, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, शिवसेना जिल्हाप्रमुखदत्ता कोकाटे, राष्ट्रवादीचे डॉ.सुनिल कदम, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले, , डावी लोकशाही आघाडीचे डॉ.लक्ष्मण शिंदे, डॉ.पी.डी.जोशी पाटोदेकर, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.जामकर, प्रा.राजू सोनसळे, ॲड.अविनाश भोसीकर, ॲड.यशोनिल मोगले यांची यावेळी उपस्थिती होती. सकाळपासून शहरासह जिल्हाभरातील बहुतांश बाजारपेठा बंदच होत्या. सायंकाळी चार वाजेनंतर मात्र तुरळक ठिकाणी दुकाने उघडण्यात आली होती. या बंद दरम्यान कुठेही अनूचित प्रकार झाला नाही.बाजार समित्यांमध्ये शुकशुकाटशेतकर्यांच्या आंदोलनाला कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही पाठींबा दर्शविला होता. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंदच होत्या. दिवसभर बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट असल्याचे पहावयास मिळाले.बसससेवाही होती ठप्पभारत बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणनू एसटी महामंडळाने मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून बस सेवा बंद केली होती. त्यामुळे बाहेरगावी जाणार्या प्रवाशांची गैरसोय झाली. सायंकाळनंतर मात्र काही मार्गावरील बसेस सोडण्यात आल्या होत्या.तर दुसरीकडे खाजगी वाहतुक, ऑटो मात्र सुरु होते. शहरातील रस्त्यावरील गर्दीही आज तुरळक होती.

टॅग्स :NandedनांदेडagricultureशेतीFarmerशेतकरी